नाशिकरोड : भक्तीचे नऊ मार्ग असून, त्यामध्ये श्रवण हादेखील एक महत्त्वाचा प्रकार आहे. श्रवणामुळे मन व शरीर पवित्र होते. संस्कृतीतून सुसंस्कृत समाज निर्माण करणाऱ्या पुराणांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे महाराज यांनी केले. जेलरोड श्रीहरी लॉन्स येथे माउली प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिवपुराण व्याख्यानात बोलताना आफळे महाराज यांनी बारा ज्योतिर्लिंगांची कथा व महत्त्व सांगितले. महाशिवरात्र व्रताची कथा, दत्तजन्म, शिव मानसपूजा, स्तोत्रपाठ, शिवपिंडीचे वैज्ञानिक महात्म्य सांगून लोककल्याणासाठी देव वेळोवेळी एकत्र आले. त्यांचा आदर्श समाजानेही घ्यावा, असे असे आवाहन आफळे महाराज यांनी केले.माउली प्रतिष्ठानने अठरा पुराणांची माहिती देण्याचा उपक्रम हाती घेतला असून, गेल्यावर्षी गणेशपुराण तर यंदा शिवपुराणावर व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदेव नवगिरे, डॉ. गणेश गोविलकर, जनुकाका कुलथे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नामदेव आढाव यांनी केले आहे. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रसाद आढाव व सूत्रसंचालन रवींद्र शिंदे व विलास आढाव यांनी केले. यावेळी सुभाष शिंदे, माधव चौधरी, श्रीकांत आढाव, विलास वारूंगसे, ज्ञानेश्वर भोर, राजेश आढाव, ओंकार आढाव, सौरभ खैरनार, रमेश करंजकर, ऋषिकेश आढाव, शिवम् आढाव आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
संस्कृतीमुळेच सुसंस्कृत समाज निर्माण होतो
By admin | Updated: December 2, 2015 22:20 IST