शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

सांस्कृतिक आतंकवाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 15:30 IST

आपला अजातशत्रू असलेला नेपाळ अचानक विचित्र वागायला लागला तो चीनच्या विस्तारवादी धोरणाचा बळी झाला म्हणून. नेपाळला आजपर्यंत आपणच मोठा केला. जसा हिंदुराष्ट्र म्हणून मान त्यांनी घालवला. कम्युनिस्ट धोरण अवलंबल्यामुळे सांस्कृतिक इतिहास बदलायचा प्रयत्न करत आहेत.

आपला अजातशत्रू असलेला नेपाळ अचानक विचित्र वागायला लागला तो चीनच्या विस्तारवादी धोरणाचा बळी झाला म्हणून. नेपाळला आजपर्यंत आपणच मोठा केला. जसा हिंदुराष्ट्र म्हणून मान त्यांनी घालवला. कम्युनिस्ट धोरण अवलंबल्यामुळे सांस्कृतिक इतिहास बदलायचा प्रयत्न करत आहेत.मुळात श्रीराम म्हणजे भारताचा आत्मा!तुलसी रामायण --बंदउँ अवध पुरी अति पाविन। सरजू सरि कलि कलुष नसाविन॥प्रनवउँ पुर नर नारि बहोरी। ममता जिन्ह पर प्रभुहि न थोरी॥1॥भावार्थ:-मी अति पवित्र श्री अयोध्यापुरी आणि कालियुगाच्या पापांचा नाश करणारी शरयू नदीला मी वंदन करतो,आण िआयोध्यापुरीतील पुरु ष व स्त्रियांना वंदन करतो ज्यांच्यावर श्रीरामाची अतीव ममता आहे .त्यावरच आघात करण्याचा अत्यंत लांच्छनास्पद प्रयत्न नेपाळचे कोली करत आहेत. हा चीनची सगळी धोरणं राबवायचा फाजील प्रयत्न आहे.पण उगीच काड्या घालून वाद निर्माण करायचे आणि मूळ प्रश्नावरून लक्ष वळवायचे काम चालू आहे. श्रीराम भारताचा! भारत श्रीरामाचा! यात काहीच दुमत नाही. रामायण, तुलसी रामायण, आध्यात्म रामायण, आनंद रामायण हे सर्व ग्रंथ ह्या शर्मा ओली ह्यांना नावाने तरी माहीत आहेत का?. हे सर्व ग्रंथ रामायणाची पर्यायाने श्रीराम आणि भरतकुळाची इत्थंभूत माहिती देतात.श्रीरामाचा जन्म शरयू तीरावर, शरयू नदी कुठे, सर्व ग्रंथ ज्या गोष्टीची साक्ष देतात ती शरयू माता अयोध्येत, मग पंतप्रधान कोलीनी कुठल्या आधारावर श्री राम नेपाळी होते असं विधान केलं ते त्या पशुपतींनाथाला ठाऊक. मुळात श्री. ओली हे कम्युनिस्ट त्यांचा मुळात राजे राजघराणे ह्यांचा संबंधच नाही,आणि ते रामायणासारख्या विषयावर बोलणार हेच पटत नाही. रामायणामध्ये उल्लेखलेले श्रीराम जन्माचे स्थान मुळात आजच्या उत्तरप्रदेशातील अयोध्येतच आहे, असा पुरावा देणारे लाखोंनी हास्तलिखितांचे आधार - पुरावे आपण सगळे देऊ शकतो. मुळात श्रीराम जन्मासबंधीत झालेले पुत्रकामेष्टी याग ज्या स्थानी झाला त्या अग्निहोत्राशी संबधीत यागाची जागा त्यांच्या महालाजवळील होती, हे रामायाणामध्ये उल्लेख आहे. पुत्र कामेष्टी यज्ञ झाल्यानंतर तो नैवेद्य-पायस भक्षण करण्यासंदर्भात जी कथा येते त्यातही निसर्ग आणि आजूबाजूच्या परिसराची माहिती दिली ती अयोध्याच आहे. तुलसी रामायणामध्येही परिसर वर्णन आले आहे. पायस प्राशनानंतर श्रीराम जन्म आण िजन्मानंतरचा पूर्ण काळ हा वरील रामायणाच्या सर्वच ग्रंथात आला आहे, रामायणाचा संपूर्ण काळ ते मिथिला नरेशाची मुलगी सीता ह्यांचा विवाह ज्या वेळी झाला त्यावेळचा परिसराचाही उल्लेख रामायणामध्ये आलेला आहे, पण एक अगदी पक्के सांगता येते की यात कोठेही नेपाळ मधील कुठल्याही परिसराचा उल्लेख नाही. या वादात पडण्यापेक्षा नेपाळी पंतप्रधानाला पुराव्यानिशी बोलण्याची विनंती करावी.दिनेश वैद्य, संचालक, व्यास रिसर्च सेंटर

टॅग्स :NashikनाशिकReligious Placesधार्मिक स्थळेAyodhyaअयोध्या