शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
5
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
6
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
7
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
8
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
9
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
10
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
11
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
12
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
13
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
14
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
15
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
16
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
17
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
18
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
19
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
20
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना

समाजाने समाजासाठी निर्माण केलेला सांस्कृतिक सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 00:56 IST

आषाढी वारी ही महाराष्ट्राची प्रसिद्ध परंपरा आहे़ कित्येक काळापासून ही परंपरा सुरू आहे़ संत म्हणतात, ‘आम्हा सापडले वर्म, करू स्थापन भागवत धर्म’ या वचनानुसार संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी वारकरी संप्रदायाचे सर्वसमावेशक असे धर्म मंदिर उभारले आणि विठ्ठलनामाची कीर्ती पताका जगभर फडकविण्याची किमया केली़

ठळक मुद्देजाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा ही वारकºयांची श्रद्धा आहे़

आषाढी वारी ही महाराष्ट्राची प्रसिद्ध परंपरा आहे़ कित्येक काळापासून ही परंपरा सुरू आहे़ संत म्हणतात, ‘आम्हा सापडले वर्म, करू स्थापन भागवत धर्म’ या वचनानुसार संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी वारकरी संप्रदायाचे सर्वसमावेशक असे धर्म मंदिर उभारले आणि विठ्ठलनामाची कीर्ती पताका जगभर फडकविण्याची किमया केली़ कित्येक शतकांपासून सामाजिक परिस्थितीत बदल होत गेले़; परंतु वारी करण्याची वारकऱ्यांची परंपरा अखंडितपणे सुरू आहे़ वारीला जाणारा वारकरी हा मुळात विठोबाला भेटण्यासाठी उत्सुक असतो़ त्यातही आपल्या जिवाची पर्वा न करता, सुख-दु:खाचा विचार न करता एकनिष्ठेने वारीत चालत राहतो़ त्याची वारी तो विसरत नाही़ कारण वारी हा सामुदायिक भक्तीचा सर्वमान्य संकेत आहे़ वारी हा समाजाने समाजासाठी निर्माण केलेला एक सांस्कृतिक सोहळा आहे़ वारीतून आत्मजाणिवा स्वच्छ होतात़़, असा माझा अनुभव आहे़ जगण्याचे व्यवस्थापन कसे असते ते वारीतून कळते़ तसेच मन ताजेतवाणे होते़ जगण्याची सद्वृत्ती आणि निसर्गाचे भान वारीतून येते़ वारी हा वारकऱ्यांचा प्राण आहे़ पंढरपूर हे वारकºयांचे आद्यपीठ आहे़ वारकरी ज्या विठ्ठलाच्या भेटीला जातो तो विठ्ठल आनंदाची रास असतो़ एकदा विठ्ठलाचे रूप पाहिले आणि विठ्ठलाच्या चरणावर डोेके ठेवले की वारकरी आनंदात डुंबून जातो़ त्याच्या डोळ्याचे पारणे फिटते़ विठ्ठल दर्शनामुळे त्याचा जीवभाव विरून जातो़ ‘डोळियांचे दैव आजि उभे केले। निधान देखिले पंढरीचे ।’ अशी त्याची स्थिती होते़साधारणत: बाराव्या शतकापासून वारीला महत्त्व प्राप्त झाले. या वारीसंबंधी संत ज्ञानदेव, संत निवृत्तिनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांनी विशेष महिमा वर्णन केला आहे. संत ज्ञानदेव म्हणतात, ‘माझे जीवीची आवडी । पंढरपूर नेईन गुढी ।’, त्याप्रमाणे संत चोखोबा महाराज यांनीदेखील पंढरीच्या वारीचे वर्णन केले आहे. सकल संतांनी आपल्या वाङ्मयात पंढरपूरप्रमाणेच वारीचादेखील वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख केलेला दिसून येतो. वारकरी संप्रदायात आध्यात्माविषयी उदार दृष्टिकोन असल्याने त्याचा परिणाम महाराष्टÑातील जनमनावर झालेला दिसून येतो.वारकरी संप्रदायात वारीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पंढरीची वारी वर्षातून चार वेळा येते. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री अशा चार वेळा वारीला जाण्याची प्रथा आहे. त्यात आषाढी वारीचे महत्त्व अधिक आहे. कारण हिंदू धर्मात आणि वारकरी संप्रदायात आषाढ-श्रावण या महिन्याला धार्मिक, आध्यात्मिकदृष्ट्या अधिक महत्त्व आहे. आषाढी वारीला जाण्यासाठी महाराष्टÑाच्या कानाकोपºयातील भाविक वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. अन्य सण -उत्सवालादेखील पंढरपुरात गर्दी असते; परंतु आषाढी वारीला होणारी गर्दी ही लक्षणीय असते. लाखो वारकºयांची पंढरपुरात होणारी ही मांदियाळी अलौकिक असते. हा अनुभव मी गेली अनेक वर्षे घेत आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या देहू-आळंदी येथून निघतात. त्याच्याही काही दिवस आधी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांची पालखी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघते. सात मानाच्या पालख्यांमध्ये या पालखीचा समावेश असतो. या पालखीसोबत दिंड्यांमध्ये वारकºयांची संख्या जास्त असते. तसेच लांबचा प्रवास असल्याने मुक्कामाची ठिकाणेही जास्त असतात.संत तुकाराम महाराजांनी पंढरपूरचे आध्यात्मिकरीतीने वर्णन केले आहे़ त्यांनी सांगितले की, आतील आत्म्यातून पांडुरंगाचे दर्शन होते ही जाणीव वारीतून मिळते़ आत्मसुखाचा बोध होतो़ सर्वात्मक भावाचा अनुभव येतो़ आत्मस्वरूपाची ओळख होते़ माणूसपणाचे भान या वारीमुळे येते आणि ऐक्याचे दर्शन घडते़ म्हणून जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा ही वारकºयांची श्रद्धा आहे़- डॉ़ तुळशीराम गुट्टे महाराज, लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.