शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:16 IST

नाशिक तालुक्यात यंदा दीडशे टक्के पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे तसेच द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना मदत जाहीर करा, अशी मागणी राष्टवादी कॉँग्रेसने केली आहे.

नाशिक : नाशिक तालुक्यात यंदा दीडशे टक्के पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे तसेच द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना मदत जाहीर करा, अशी मागणी राष्टवादी कॉँग्रेसने केली आहे.  राष्टÑवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासंदर्भात सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, यंदा नाशिक तालुक्यात नेहमीपेक्षा दीडपट पाऊस झाला आहे. तालुक्यात द्राक्ष, डाळींब, पेरू, टोमॅटो ही फळबागाची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात तसेच कांदा, सोयाबीन, भात, भुईमूग, नागली, मका, बाजरी, उडीद, मूग, इतर भाजीपाल्याची पिके घेतली जातात. जूनपासून सलग पाऊस पडतो आहे. सप्टेंबरचा शेवटचा आठवडा व १ ते १६ आॅक्टोबर या कालावधीत झालेल्या पावसाने फळबागांचे व धान्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बºयाच गावांना शंभर टक्केपर्यंत नुकसान झालेले आहे.  शेजारील तालुक्यांमध्ये तहसील व कृषी विभाग पंचनामे करत आहेत, मात्र नाशिक तालुक्यात अजूनही नुकसान पाहणी व पंचनामे केले जात नाहीत. त्यामुळे तातडीने नुकसानीचे पंचनामे करून आपत्तीग्रस्त शेतकºयांना दिलासा द्यावा व नुकसानभरपाई देण्यात यावी. त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफीची रक्कम अद्यापही शेतकºयांच्या खात्यात जमा झालेली नाही.  यावेळी पंचायत समितीचे सभापती रत्नाकर चुंभळे, यशवंत ढिकले, ढवळू फसाळे, निवृत्ती महाराज कापसे, विलास कांडेकर, दौलत पाटील, रामदास पिंगळे, साहेबराव पेखळे, गणेश वलवे, दीपक वाघ, रमेश डबाळे आदी उपस्थित होते.चावडी वाचन नाहीकर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरलेल्या शेतकºयांच्या गावावर चावडी वाचन झालेले नाही. शासनाच्या आकडेमोडीच्या खेळात व शासन निर्णयाच्या घोळात पात्र शेतकºयांच्या यादीचा मेळ बसत नाही. आपत्ग्रस्त व कर्जबाजारी शेतकरी वंचित राहू नये याची काळजी शासनाने घ्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.