शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्याची अफवा असल्याची दवंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:51 IST

गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होतो म्हणून जिल्हा प्रशासनाने गटविकास अधिकाºयाला नोटीस बजावली असताना दुसरीकडे मात्र बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे ग्रामपंचायतीने दूषित पाण्याची अफवा असल्याची दवंडी दिल्याचा प्रकार रविवारी (दि. २५) घडला.

सटाणा : गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होतो म्हणून जिल्हा प्रशासनाने गटविकास अधिकाºयाला नोटीस बजावली असताना दुसरीकडे मात्र बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे ग्रामपंचायतीने दूषित पाण्याची अफवा असल्याची दवंडी दिल्याचा प्रकार रविवारी (दि. २५) घडला.  जिल्हा स्वच्छता व आरोग्य विभागाच्या वतीने दर महिन्याला सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या पाण्याचे नमुने गोळा करण्यात येतात. जानेवारी २०१८ च्या अहवालानुसार जिल्ह्यातील ९ टक्के पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहेत.  या गंभीर प्रकाराकडे संबंधित अधिकाºयांनी दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिलेल्या नोटिसीत नमूद केले आहे. संबंधित ग्रामपंचायतीने पाणी शुद्धीकरणाबाबत वेळीच लक्ष न दिल्यास याला जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे म्हणून प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र डांगसौंदाणे ग्रामपंचायत आपल्या कारभारावर पांघरून घालण्यासाठी चक्क नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे.  रविवारी (दि.२५) सकाळी ७ वाजेच्या सुमारास सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेमधून गावाला पिण्यासाठी पाणी सोडण्यात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने डांगसौंदाणे येथील पाणी दूषित आल्याचे जाहीर केले. पाणी असताना तेथील ग्रामपंचायत प्रशासनाने दवंडी पिटवून दूषित पाणी ही अफवा असल्याचा दावा करत नागरिकांनी पिण्याचे पाणी भरावे, असे आवाहन केले. संबंधित सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक असा दावा करून जिल्हा प्रशासनालाच खोटे ठरवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे बोबले जात आहे. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन ग्रामपंचायत बरखास्त करून संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांविरु द्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी माजी सरपंच कैलास बोरसे यांनी केली आहे.१४० पाणी नमुने दूषित  बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे पाणीदेखील तीन महिन्यांपासून दूषित झाले आहे. जानेवारीत तपासण्यात आलेल्या १५०३ नमुन्यांपैकी १४० नमुने दूषित आल्याने बागलाणचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांना नोटीस बाजावण्यात आली आहे.

टॅग्स :Waterपाणी