शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

गर्दीचा उच्चांक आज मोडणार

By admin | Updated: September 24, 2016 01:50 IST

मराठा क्रांती मोर्चा : हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाचीही परीक्षाच

 किरण अग्रवाल ल्ल नाशिक गोल्फ क्लब ग्राउण्डच्या नावाने परिचित हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान... या मैदानाने आजवर अनेक मान्यवरांच्या सभा पाहिल्या. त्यासाठी हजारोंची गर्दी अंगावर घेतली. त्या मैदानाचीच आज जणू परीक्षा आहे. कारण, यात प्रथमच मावू न शकणाऱ्या गर्दीचे साक्षीदार होण्याचे भाग्य या मैदानाला आज लाभणार आहे. त्यासाठी निमित्त आहे ते मराठा क्रांती मोर्चाचे. गर्दी, शिस्तबद्धता व कुणाही एका व्यक्ती अगर राजकीय पक्ष- संघटनेचे नेतृत्व नसणारे ठिकठिकाणचे मराठा क्रांती मोर्चे सर्वांसाठीच उत्सुकता व आश्चर्याचेच विषय ठरले आहेत. याच संदर्भाने नाशिककरांचीही ताणली गेलेली उत्कं ठा आज शमणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यासाठी सुरू असलेल्या नियोजनाची पूर्तता आज होऊ घातली आहे. तपोवनातून सुरू होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचा समारोप कान्हेरे मैदानावर होणार आहे. नाशकात यापूर्वी १९९५मधे शिवसेनेचे जे चौथे अधिवेशन पंचवटीतील आर.पी. विद्यालयाच्या प्रांगणात झाले होते, तेव्हा रस्त्यांवर शिवसैनिकांची अलोट गर्दी वाहिल्याचे दिसले होते. ती राजकारण प्रेरित गर्दी होती. दर बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यातील शाही पर्वण्यांच्या दिवशीही मोठी गर्दी होते. ती भाविकांची, श्रद्धाळूंची असते. परंतु सामाजिक जाणिवेतून व मनामनात खदखदणारा असंतोष घेऊनही ‘मूक’पणे त्याचे दर्शन घडविणारी आजपर्यंतच्या गर्दीपेक्षाही मोठी गर्दी आज बघावयास मिळणार आहे. ती समाजाच्या एकसंधतेचा आविष्कार घडविणारी असेल. राजकारण असो की समाजकारण, त्यातील यशापयश अगर चढउतार हे तसे पचवण्यासारखे असतात. परंतु जेव्हा सामाजिक अस्मितांनाच धक्का लागू पहातो किंवा उपेक्षेचा दबलेला हुंकार आक्रोश बनून उसळू पाहतो तेव्हा नेतृत्वाच्याही भिंती मोडून पडतात. एकीच्या सामूहिक बळाचा साक्षात्कार अशावेळी घडून येतो. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने नाशकातील गर्दीचे इतिहासातील सारे विक्रम आज मोडले जाणार आहेत तेही त्यामुळेच. या विराट मराठा महासागराच्या पूर्वतयारीसाठी सामूहिक स्तरावर जे जे परिश्रम घेतले गेल्याचे दिसून आले त्याची फलश्रुती आज गर्दीचा विक्रम मोडण्यात घडून आल्याशिवाय राहणार नाही. कान्हेरे मैदानानेही भविष्यात या गर्दीचा अभिमान मिरवावा अशीच ती असेन. पण तसे असताना ही गर्दी, गर्दी राहणार नसून राजकारण व समाजकारणालाही वेगळी दिशा देणारी लाट ठरेल याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही. वेगवेगळ्या ठिकाणी, विविध राजकीय पक्षात, सहकारी संस्थांत तसेच सेवा क्षेत्रात असलेल्या मराठा बांधवांनी यासाठी सारे पक्षभेद व स्पर्धा विसरून परिश्रम घेतले आहेत. ज्येष्ठ, श्रेष्ठ वा कनिष्ठतेची कसलीही चर्चा न करता, कुणाच्या निरोपाची वा कुणाकडून मनधरणीची वाट न बघता प्रत्येकजण आपापल्या पातळीवर स्वयंस्फूर्तीने मोर्चाच्या यशस्वीतेसाठी कामाला लागलेला दिसून येत आहे. असे घडण्याची अपेक्षाच कुणी केली नसेल; पण ते घडले आहे. पुन्हा हे घडताना यापैकी कुणीही आपल्या नावाची, म्हणजे प्रसिद्धीची हौस ठेवली नाही. उलट आपले नाव देऊ नका, असेच आवर्जून सांगितले जात आहे. त्यातून जाणारा सकारात्मक संदेश महत्त्वाचा आहे. शिवाय, महिला-भगिनींसह तरुणवर्गाने मोठ्या प्रमाणात यासाठी पुढाकार घेतला. आजवर जे सोसले, त्याबद्दल बोलायची संधीही न मिळाल्याचा रोष व त्वेष त्यामागे आहे हे खरे; परंतु महिला व युवकांची सक्रियता तसेच सामाजिक दायित्वाबद्दलची सजगता या निमित्ताने पुढे आली असून, त्याचाच प्रत्यय नाशकातील आजच्या क्रांती मोर्चात येऊ घातला आहे.निर्णायक वज्रमूठ एक मराठा, लाख मराठा, अशी सार्थ ओळख व महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असलेला मराठा समाज एका कोपर्डीतील दुर्दैवी घटनेने एकवटला असला, तरी त्यामागे वर्षानुवर्षांपासूनच्या उपेक्षेचीही अनेक कारणे आहेत. शेतजमिनींचे पडलेले तुकडे, उद्योग-नोकऱ्यांमधील पिछाडी व राजकारणात घडून येत असलेले ध्रुवीकरण यासारख्या अनेक मुद्द्यांमुळे मराठा समाजातील बहुसंख्य वर्गाला उपेक्षा व अडचणींना सामोरे जावे लागते आहे. तरुणवर्गाची अवस्था तर ‘सहनही होईना व सांगताही येईना’, अशी झाली आहे. ठिकठिकाणी लाखो-लाखोंचे मोर्चे त्यामुळेच निघत आहेत. नाशिक जिल्ह्यातही मराठा समाज मोठ्या संख्येत व प्रभावशाली आहे; पण तो तितकाच मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. या मोर्चाच्या निमित्ताने तो एकवटला असून, आगामी काळात ही एकसंधतेची वज्रमूठच निर्णायक ठरणार आहे.