शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सिन्नरला बिले कमी करण्यासाठी वीज कार्यालयात ग्राहकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:35 IST

सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाले, छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रोजीरोटीला लागलेल्या सर्वसामान्यांना वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीजबिलांची भेट देऊन झटका दिला.

ठळक मुद्देअर्थचक्र ठप्प : लॉकडाऊननंतर बिल रकमेचा ‘जोर का झटका’; व्यावसायिक अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाले, छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रोजीरोटीला लागलेल्या सर्वसामान्यांना वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीजबिलांची भेट देऊन झटका दिला.लॉकडाउन काळात सरासरी वीजबिले देणाऱ्या वीज वितरण कंपनीने लॉकडाऊननंतर सर्वसामान्यांना चार ते पाच पटीने अधिक रक्कमेची बिले पाठविल्याने ग्राहक त्रस्त झाले असून, बिले कमी करण्यासाठी ग्राहकांनी वीज वितरणच्या आडवा फाटा येथील कार्यालयावर गर्दी केली होती.लॉकडाऊनमुळे छोटे-मोठे व्यावसायिक, नोकरदार, कामगार, मोलमजुरी करून उदर निर्वाह करणारे लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असतानाही या काळातील वाढीव वीजबिलांमुळे व्यावसायिक अधिकच अडचणीत आले आहेत.लॉकडाऊन काळात त्यांच्या नियमित वीजबिलापेक्षा चार पाच पट अधिकची बिले आली आहेत. अनेक ग्राहकांनी लॉकडाऊन काळात आॅनलाइन पद्धतीने वीजबिले भरूनही अव्वाच्या सव्वा बिलं पाठविण्यात आली. लॉकडाऊन काळात आर्थिकचा सामना करावा लागत आहे. वितरणने पाठवलेले वाढीव वीज देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, सदर बिले चौकशीसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घेऊन गेले असता अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरत अपमानास्पद वागणूक दिल्याची अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे. बिल पाहून ग्राहक अवाक्...एरवी ८०० ते १००० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकांना २० हजारांचे बिल पाठवून महावितरण कंपनीने अजब कारभाराचा गहजब नमुनाच पेश केला आहे. शहरातील सुमनबाई अर्जुन खैरे या महिलेला जून महिन्यात तब्बल २० हजार ७७० रुपये वीजबिल आले. यापूर्वी सरासरी १००० रुपये बिल येत होते.लॉकडाऊनच्या काळात एवढे काय झाले की, बिल एकदम २० हजार पार गेले. याशिवाय सरासरी ५०० ते ५५० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकास जूून महिन्याचे ५ ते ६ हजार रुपये बिल आल्याने या ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत. एखाद-दुसºया ग्राहकाच्या बाबतीत चूक होऊ शकते मात्र शहरासह तालुक्यातील अनेक ग्राहकांच्या बाबतीत हाच प्रकार घडल्याने महावितरणच्या कार्यालयासमोर बिले कमी करण्यासाठी ग्राहकांची दररोज गर्दी होत आहे. अधिक देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.सामान्यांचे हाललॉकडाऊन काळात शेतकरी, कामगार, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे राज्य शासनाने रोजगार व उत्पादनाचे कुठलेही नियोजन केले नसल्याने सर्वांना उपासमारीला सामोरे जावे लागले आहे.या काळात सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बुडाल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. हे सर्व घडत असतानाच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने व्यवसाय करणारे दुकाने बंद आहेत.बंदकाळात विजेचा कोणताही वापर झालेला नसताना अंदाजे मीटर रीडिंग दाखवून एकत्रित तीन महिन्यांचे बिले काढून व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना वीज वितरणकंपनीने मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रास देण्याचे काम सुरू केले आहे. अर्थचक्र ठप्प : लॉकडाऊननंतर बिल रकमेचा ‘जोर का झटका’; व्यावसायिक अडचणीतसिन्नरला बिले कमी करण्यासाठी वीज कार्यालयात ग्राहकांची झुंबड लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाले, छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रोजीरोटीला लागलेल्या सर्वसामान्यांना वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीजबिलांची भेट देऊन झटका दिला.लॉकडाउन काळात सरासरी वीजबिले देणाºया वीज वितरण कंपनीने लॉकडाऊननंतर सर्वसामान्यांना चार ते पाच पटीने अधिक रक्कमेची बिले पाठविल्याने ग्राहक त्रस्त झाले असून, बिले कमी करण्यासाठी ग्राहकांनी वीज वितरणच्या आडवा फाटा येथील कार्यालयावर गर्दी केली होती.लॉकडाऊनमुळे छोटे-मोठे व्यावसायिक, नोकरदार, कामगार, मोलमजुरी करून उदर निर्वाह करणारे लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असतानाही या काळातील वाढीव वीजबिलांमुळे व्यावसायिक अधिकच अडचणीत आले आहेत.लॉकडाऊन काळात त्यांच्या नियमित वीजबिलापेक्षा चार पाच पट अधिकची बिले आली आहेत. अनेक ग्राहकांनी लॉकडाऊन काळात आॅनलाइन पद्धतीने वीजबिले भरूनही अव्वाच्या सव्वा बिलं पाठविण्यात आली. लॉकडाऊन काळात आर्थिकचा सामना करावा लागत आहे. वितरणने पाठवलेले वाढीव वीज देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, सदर बिले चौकशीसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घेऊन गेले असता अधिकाºयांनी अरेरावीची भाषा वापरत अपमानास्पद वागणूक दिल्याची अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे. बिल पाहून ग्राहक अवाक्...एरवी ८०० ते १००० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकांना २० हजारांचे बिल पाठवून महावितरण कंपनीने अजब कारभाराचा गहजब नमुनाच पेश केला आहे. शहरातील सुमनबाई अर्जुन खैरे या महिलेला जून महिन्यात तब्बल २० हजार ७७० रुपये वीजबिल आले. यापूर्वी सरासरी १००० रुपये बिल येत होते.लॉकडाऊनच्या काळात एवढे काय झाले की, बिल एकदम २० हजार पार गेले. याशिवाय सरासरी ५०० ते ५५० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकास जूून महिन्याचे ५ ते ६ हजार रुपये बिल आल्याने या ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत. एखाद-दुसºया ग्राहकाच्या बाबतीत चूक होऊ शकते मात्र शहरासह तालुक्यातील अनेक ग्राहकांच्या बाबतीत हाच प्रकार घडल्याने महावितरणच्या कार्यालयासमोर बिले कमी करण्यासाठी ग्राहकांची दररोज गर्दी होत आहे. अधिक देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.सामान्यांचे हाललॉकडाऊन काळात शेतकरी, कामगार, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे राज्य शासनाने रोजगार व उत्पादनाचे कुठलेही नियोजन केले नसल्याने सर्वांना उपासमारीला सामोरे जावे लागले आहे.या काळात सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बुडाल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. हे सर्व घडत असतानाच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने व्यवसाय करणारे दुकाने बंद आहेत.बंदकाळात विजेचा कोणताही वापर झालेला नसताना अंदाजे मीटर रीडिंग दाखवून एकत्रित तीन महिन्यांचे बिले काढून व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना वीज वितरण कंपनीने मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रास देण्याचे काम सुरू केले आहे.

टॅग्स :sinnar-acसिन्नरelectricityवीज