शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला बिले कमी करण्यासाठी वीज कार्यालयात ग्राहकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:35 IST

सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाले, छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रोजीरोटीला लागलेल्या सर्वसामान्यांना वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीजबिलांची भेट देऊन झटका दिला.

ठळक मुद्देअर्थचक्र ठप्प : लॉकडाऊननंतर बिल रकमेचा ‘जोर का झटका’; व्यावसायिक अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाले, छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रोजीरोटीला लागलेल्या सर्वसामान्यांना वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीजबिलांची भेट देऊन झटका दिला.लॉकडाउन काळात सरासरी वीजबिले देणाऱ्या वीज वितरण कंपनीने लॉकडाऊननंतर सर्वसामान्यांना चार ते पाच पटीने अधिक रक्कमेची बिले पाठविल्याने ग्राहक त्रस्त झाले असून, बिले कमी करण्यासाठी ग्राहकांनी वीज वितरणच्या आडवा फाटा येथील कार्यालयावर गर्दी केली होती.लॉकडाऊनमुळे छोटे-मोठे व्यावसायिक, नोकरदार, कामगार, मोलमजुरी करून उदर निर्वाह करणारे लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असतानाही या काळातील वाढीव वीजबिलांमुळे व्यावसायिक अधिकच अडचणीत आले आहेत.लॉकडाऊन काळात त्यांच्या नियमित वीजबिलापेक्षा चार पाच पट अधिकची बिले आली आहेत. अनेक ग्राहकांनी लॉकडाऊन काळात आॅनलाइन पद्धतीने वीजबिले भरूनही अव्वाच्या सव्वा बिलं पाठविण्यात आली. लॉकडाऊन काळात आर्थिकचा सामना करावा लागत आहे. वितरणने पाठवलेले वाढीव वीज देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, सदर बिले चौकशीसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घेऊन गेले असता अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरत अपमानास्पद वागणूक दिल्याची अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे. बिल पाहून ग्राहक अवाक्...एरवी ८०० ते १००० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकांना २० हजारांचे बिल पाठवून महावितरण कंपनीने अजब कारभाराचा गहजब नमुनाच पेश केला आहे. शहरातील सुमनबाई अर्जुन खैरे या महिलेला जून महिन्यात तब्बल २० हजार ७७० रुपये वीजबिल आले. यापूर्वी सरासरी १००० रुपये बिल येत होते.लॉकडाऊनच्या काळात एवढे काय झाले की, बिल एकदम २० हजार पार गेले. याशिवाय सरासरी ५०० ते ५५० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकास जूून महिन्याचे ५ ते ६ हजार रुपये बिल आल्याने या ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत. एखाद-दुसºया ग्राहकाच्या बाबतीत चूक होऊ शकते मात्र शहरासह तालुक्यातील अनेक ग्राहकांच्या बाबतीत हाच प्रकार घडल्याने महावितरणच्या कार्यालयासमोर बिले कमी करण्यासाठी ग्राहकांची दररोज गर्दी होत आहे. अधिक देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.सामान्यांचे हाललॉकडाऊन काळात शेतकरी, कामगार, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे राज्य शासनाने रोजगार व उत्पादनाचे कुठलेही नियोजन केले नसल्याने सर्वांना उपासमारीला सामोरे जावे लागले आहे.या काळात सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बुडाल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. हे सर्व घडत असतानाच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने व्यवसाय करणारे दुकाने बंद आहेत.बंदकाळात विजेचा कोणताही वापर झालेला नसताना अंदाजे मीटर रीडिंग दाखवून एकत्रित तीन महिन्यांचे बिले काढून व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना वीज वितरणकंपनीने मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रास देण्याचे काम सुरू केले आहे. अर्थचक्र ठप्प : लॉकडाऊननंतर बिल रकमेचा ‘जोर का झटका’; व्यावसायिक अडचणीतसिन्नरला बिले कमी करण्यासाठी वीज कार्यालयात ग्राहकांची झुंबड लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाले, छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रोजीरोटीला लागलेल्या सर्वसामान्यांना वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीजबिलांची भेट देऊन झटका दिला.लॉकडाउन काळात सरासरी वीजबिले देणाºया वीज वितरण कंपनीने लॉकडाऊननंतर सर्वसामान्यांना चार ते पाच पटीने अधिक रक्कमेची बिले पाठविल्याने ग्राहक त्रस्त झाले असून, बिले कमी करण्यासाठी ग्राहकांनी वीज वितरणच्या आडवा फाटा येथील कार्यालयावर गर्दी केली होती.लॉकडाऊनमुळे छोटे-मोठे व्यावसायिक, नोकरदार, कामगार, मोलमजुरी करून उदर निर्वाह करणारे लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असतानाही या काळातील वाढीव वीजबिलांमुळे व्यावसायिक अधिकच अडचणीत आले आहेत.लॉकडाऊन काळात त्यांच्या नियमित वीजबिलापेक्षा चार पाच पट अधिकची बिले आली आहेत. अनेक ग्राहकांनी लॉकडाऊन काळात आॅनलाइन पद्धतीने वीजबिले भरूनही अव्वाच्या सव्वा बिलं पाठविण्यात आली. लॉकडाऊन काळात आर्थिकचा सामना करावा लागत आहे. वितरणने पाठवलेले वाढीव वीज देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, सदर बिले चौकशीसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घेऊन गेले असता अधिकाºयांनी अरेरावीची भाषा वापरत अपमानास्पद वागणूक दिल्याची अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे. बिल पाहून ग्राहक अवाक्...एरवी ८०० ते १००० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकांना २० हजारांचे बिल पाठवून महावितरण कंपनीने अजब कारभाराचा गहजब नमुनाच पेश केला आहे. शहरातील सुमनबाई अर्जुन खैरे या महिलेला जून महिन्यात तब्बल २० हजार ७७० रुपये वीजबिल आले. यापूर्वी सरासरी १००० रुपये बिल येत होते.लॉकडाऊनच्या काळात एवढे काय झाले की, बिल एकदम २० हजार पार गेले. याशिवाय सरासरी ५०० ते ५५० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकास जूून महिन्याचे ५ ते ६ हजार रुपये बिल आल्याने या ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत. एखाद-दुसºया ग्राहकाच्या बाबतीत चूक होऊ शकते मात्र शहरासह तालुक्यातील अनेक ग्राहकांच्या बाबतीत हाच प्रकार घडल्याने महावितरणच्या कार्यालयासमोर बिले कमी करण्यासाठी ग्राहकांची दररोज गर्दी होत आहे. अधिक देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.सामान्यांचे हाललॉकडाऊन काळात शेतकरी, कामगार, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे राज्य शासनाने रोजगार व उत्पादनाचे कुठलेही नियोजन केले नसल्याने सर्वांना उपासमारीला सामोरे जावे लागले आहे.या काळात सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बुडाल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. हे सर्व घडत असतानाच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने व्यवसाय करणारे दुकाने बंद आहेत.बंदकाळात विजेचा कोणताही वापर झालेला नसताना अंदाजे मीटर रीडिंग दाखवून एकत्रित तीन महिन्यांचे बिले काढून व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना वीज वितरण कंपनीने मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रास देण्याचे काम सुरू केले आहे.

टॅग्स :sinnar-acसिन्नरelectricityवीज