शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

सिन्नरला बिले कमी करण्यासाठी वीज कार्यालयात ग्राहकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:35 IST

सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाले, छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रोजीरोटीला लागलेल्या सर्वसामान्यांना वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीजबिलांची भेट देऊन झटका दिला.

ठळक मुद्देअर्थचक्र ठप्प : लॉकडाऊननंतर बिल रकमेचा ‘जोर का झटका’; व्यावसायिक अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाले, छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रोजीरोटीला लागलेल्या सर्वसामान्यांना वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीजबिलांची भेट देऊन झटका दिला.लॉकडाउन काळात सरासरी वीजबिले देणाऱ्या वीज वितरण कंपनीने लॉकडाऊननंतर सर्वसामान्यांना चार ते पाच पटीने अधिक रक्कमेची बिले पाठविल्याने ग्राहक त्रस्त झाले असून, बिले कमी करण्यासाठी ग्राहकांनी वीज वितरणच्या आडवा फाटा येथील कार्यालयावर गर्दी केली होती.लॉकडाऊनमुळे छोटे-मोठे व्यावसायिक, नोकरदार, कामगार, मोलमजुरी करून उदर निर्वाह करणारे लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असतानाही या काळातील वाढीव वीजबिलांमुळे व्यावसायिक अधिकच अडचणीत आले आहेत.लॉकडाऊन काळात त्यांच्या नियमित वीजबिलापेक्षा चार पाच पट अधिकची बिले आली आहेत. अनेक ग्राहकांनी लॉकडाऊन काळात आॅनलाइन पद्धतीने वीजबिले भरूनही अव्वाच्या सव्वा बिलं पाठविण्यात आली. लॉकडाऊन काळात आर्थिकचा सामना करावा लागत आहे. वितरणने पाठवलेले वाढीव वीज देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, सदर बिले चौकशीसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घेऊन गेले असता अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरत अपमानास्पद वागणूक दिल्याची अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे. बिल पाहून ग्राहक अवाक्...एरवी ८०० ते १००० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकांना २० हजारांचे बिल पाठवून महावितरण कंपनीने अजब कारभाराचा गहजब नमुनाच पेश केला आहे. शहरातील सुमनबाई अर्जुन खैरे या महिलेला जून महिन्यात तब्बल २० हजार ७७० रुपये वीजबिल आले. यापूर्वी सरासरी १००० रुपये बिल येत होते.लॉकडाऊनच्या काळात एवढे काय झाले की, बिल एकदम २० हजार पार गेले. याशिवाय सरासरी ५०० ते ५५० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकास जूून महिन्याचे ५ ते ६ हजार रुपये बिल आल्याने या ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत. एखाद-दुसºया ग्राहकाच्या बाबतीत चूक होऊ शकते मात्र शहरासह तालुक्यातील अनेक ग्राहकांच्या बाबतीत हाच प्रकार घडल्याने महावितरणच्या कार्यालयासमोर बिले कमी करण्यासाठी ग्राहकांची दररोज गर्दी होत आहे. अधिक देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.सामान्यांचे हाललॉकडाऊन काळात शेतकरी, कामगार, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे राज्य शासनाने रोजगार व उत्पादनाचे कुठलेही नियोजन केले नसल्याने सर्वांना उपासमारीला सामोरे जावे लागले आहे.या काळात सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बुडाल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. हे सर्व घडत असतानाच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने व्यवसाय करणारे दुकाने बंद आहेत.बंदकाळात विजेचा कोणताही वापर झालेला नसताना अंदाजे मीटर रीडिंग दाखवून एकत्रित तीन महिन्यांचे बिले काढून व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना वीज वितरणकंपनीने मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रास देण्याचे काम सुरू केले आहे. अर्थचक्र ठप्प : लॉकडाऊननंतर बिल रकमेचा ‘जोर का झटका’; व्यावसायिक अडचणीतसिन्नरला बिले कमी करण्यासाठी वीज कार्यालयात ग्राहकांची झुंबड लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाले, छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रोजीरोटीला लागलेल्या सर्वसामान्यांना वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीजबिलांची भेट देऊन झटका दिला.लॉकडाउन काळात सरासरी वीजबिले देणाºया वीज वितरण कंपनीने लॉकडाऊननंतर सर्वसामान्यांना चार ते पाच पटीने अधिक रक्कमेची बिले पाठविल्याने ग्राहक त्रस्त झाले असून, बिले कमी करण्यासाठी ग्राहकांनी वीज वितरणच्या आडवा फाटा येथील कार्यालयावर गर्दी केली होती.लॉकडाऊनमुळे छोटे-मोठे व्यावसायिक, नोकरदार, कामगार, मोलमजुरी करून उदर निर्वाह करणारे लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असतानाही या काळातील वाढीव वीजबिलांमुळे व्यावसायिक अधिकच अडचणीत आले आहेत.लॉकडाऊन काळात त्यांच्या नियमित वीजबिलापेक्षा चार पाच पट अधिकची बिले आली आहेत. अनेक ग्राहकांनी लॉकडाऊन काळात आॅनलाइन पद्धतीने वीजबिले भरूनही अव्वाच्या सव्वा बिलं पाठविण्यात आली. लॉकडाऊन काळात आर्थिकचा सामना करावा लागत आहे. वितरणने पाठवलेले वाढीव वीज देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, सदर बिले चौकशीसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घेऊन गेले असता अधिकाºयांनी अरेरावीची भाषा वापरत अपमानास्पद वागणूक दिल्याची अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे. बिल पाहून ग्राहक अवाक्...एरवी ८०० ते १००० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकांना २० हजारांचे बिल पाठवून महावितरण कंपनीने अजब कारभाराचा गहजब नमुनाच पेश केला आहे. शहरातील सुमनबाई अर्जुन खैरे या महिलेला जून महिन्यात तब्बल २० हजार ७७० रुपये वीजबिल आले. यापूर्वी सरासरी १००० रुपये बिल येत होते.लॉकडाऊनच्या काळात एवढे काय झाले की, बिल एकदम २० हजार पार गेले. याशिवाय सरासरी ५०० ते ५५० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकास जूून महिन्याचे ५ ते ६ हजार रुपये बिल आल्याने या ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत. एखाद-दुसºया ग्राहकाच्या बाबतीत चूक होऊ शकते मात्र शहरासह तालुक्यातील अनेक ग्राहकांच्या बाबतीत हाच प्रकार घडल्याने महावितरणच्या कार्यालयासमोर बिले कमी करण्यासाठी ग्राहकांची दररोज गर्दी होत आहे. अधिक देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.सामान्यांचे हाललॉकडाऊन काळात शेतकरी, कामगार, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे राज्य शासनाने रोजगार व उत्पादनाचे कुठलेही नियोजन केले नसल्याने सर्वांना उपासमारीला सामोरे जावे लागले आहे.या काळात सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बुडाल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. हे सर्व घडत असतानाच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने व्यवसाय करणारे दुकाने बंद आहेत.बंदकाळात विजेचा कोणताही वापर झालेला नसताना अंदाजे मीटर रीडिंग दाखवून एकत्रित तीन महिन्यांचे बिले काढून व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना वीज वितरण कंपनीने मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रास देण्याचे काम सुरू केले आहे.

टॅग्स :sinnar-acसिन्नरelectricityवीज