शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
3
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
4
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
5
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
6
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
7
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
8
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
9
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
10
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
11
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
12
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
13
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
14
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
15
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
16
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
17
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
18
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
19
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
20
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती

सिन्नरला बिले कमी करण्यासाठी वीज कार्यालयात ग्राहकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:35 IST

सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाले, छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रोजीरोटीला लागलेल्या सर्वसामान्यांना वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीजबिलांची भेट देऊन झटका दिला.

ठळक मुद्देअर्थचक्र ठप्प : लॉकडाऊननंतर बिल रकमेचा ‘जोर का झटका’; व्यावसायिक अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाले, छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रोजीरोटीला लागलेल्या सर्वसामान्यांना वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीजबिलांची भेट देऊन झटका दिला.लॉकडाउन काळात सरासरी वीजबिले देणाऱ्या वीज वितरण कंपनीने लॉकडाऊननंतर सर्वसामान्यांना चार ते पाच पटीने अधिक रक्कमेची बिले पाठविल्याने ग्राहक त्रस्त झाले असून, बिले कमी करण्यासाठी ग्राहकांनी वीज वितरणच्या आडवा फाटा येथील कार्यालयावर गर्दी केली होती.लॉकडाऊनमुळे छोटे-मोठे व्यावसायिक, नोकरदार, कामगार, मोलमजुरी करून उदर निर्वाह करणारे लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असतानाही या काळातील वाढीव वीजबिलांमुळे व्यावसायिक अधिकच अडचणीत आले आहेत.लॉकडाऊन काळात त्यांच्या नियमित वीजबिलापेक्षा चार पाच पट अधिकची बिले आली आहेत. अनेक ग्राहकांनी लॉकडाऊन काळात आॅनलाइन पद्धतीने वीजबिले भरूनही अव्वाच्या सव्वा बिलं पाठविण्यात आली. लॉकडाऊन काळात आर्थिकचा सामना करावा लागत आहे. वितरणने पाठवलेले वाढीव वीज देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, सदर बिले चौकशीसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घेऊन गेले असता अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरत अपमानास्पद वागणूक दिल्याची अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे. बिल पाहून ग्राहक अवाक्...एरवी ८०० ते १००० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकांना २० हजारांचे बिल पाठवून महावितरण कंपनीने अजब कारभाराचा गहजब नमुनाच पेश केला आहे. शहरातील सुमनबाई अर्जुन खैरे या महिलेला जून महिन्यात तब्बल २० हजार ७७० रुपये वीजबिल आले. यापूर्वी सरासरी १००० रुपये बिल येत होते.लॉकडाऊनच्या काळात एवढे काय झाले की, बिल एकदम २० हजार पार गेले. याशिवाय सरासरी ५०० ते ५५० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकास जूून महिन्याचे ५ ते ६ हजार रुपये बिल आल्याने या ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत. एखाद-दुसºया ग्राहकाच्या बाबतीत चूक होऊ शकते मात्र शहरासह तालुक्यातील अनेक ग्राहकांच्या बाबतीत हाच प्रकार घडल्याने महावितरणच्या कार्यालयासमोर बिले कमी करण्यासाठी ग्राहकांची दररोज गर्दी होत आहे. अधिक देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.सामान्यांचे हाललॉकडाऊन काळात शेतकरी, कामगार, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे राज्य शासनाने रोजगार व उत्पादनाचे कुठलेही नियोजन केले नसल्याने सर्वांना उपासमारीला सामोरे जावे लागले आहे.या काळात सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बुडाल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. हे सर्व घडत असतानाच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने व्यवसाय करणारे दुकाने बंद आहेत.बंदकाळात विजेचा कोणताही वापर झालेला नसताना अंदाजे मीटर रीडिंग दाखवून एकत्रित तीन महिन्यांचे बिले काढून व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना वीज वितरणकंपनीने मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रास देण्याचे काम सुरू केले आहे. अर्थचक्र ठप्प : लॉकडाऊननंतर बिल रकमेचा ‘जोर का झटका’; व्यावसायिक अडचणीतसिन्नरला बिले कमी करण्यासाठी वीज कार्यालयात ग्राहकांची झुंबड लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाले, छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रोजीरोटीला लागलेल्या सर्वसामान्यांना वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीजबिलांची भेट देऊन झटका दिला.लॉकडाउन काळात सरासरी वीजबिले देणाºया वीज वितरण कंपनीने लॉकडाऊननंतर सर्वसामान्यांना चार ते पाच पटीने अधिक रक्कमेची बिले पाठविल्याने ग्राहक त्रस्त झाले असून, बिले कमी करण्यासाठी ग्राहकांनी वीज वितरणच्या आडवा फाटा येथील कार्यालयावर गर्दी केली होती.लॉकडाऊनमुळे छोटे-मोठे व्यावसायिक, नोकरदार, कामगार, मोलमजुरी करून उदर निर्वाह करणारे लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असतानाही या काळातील वाढीव वीजबिलांमुळे व्यावसायिक अधिकच अडचणीत आले आहेत.लॉकडाऊन काळात त्यांच्या नियमित वीजबिलापेक्षा चार पाच पट अधिकची बिले आली आहेत. अनेक ग्राहकांनी लॉकडाऊन काळात आॅनलाइन पद्धतीने वीजबिले भरूनही अव्वाच्या सव्वा बिलं पाठविण्यात आली. लॉकडाऊन काळात आर्थिकचा सामना करावा लागत आहे. वितरणने पाठवलेले वाढीव वीज देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, सदर बिले चौकशीसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घेऊन गेले असता अधिकाºयांनी अरेरावीची भाषा वापरत अपमानास्पद वागणूक दिल्याची अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे. बिल पाहून ग्राहक अवाक्...एरवी ८०० ते १००० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकांना २० हजारांचे बिल पाठवून महावितरण कंपनीने अजब कारभाराचा गहजब नमुनाच पेश केला आहे. शहरातील सुमनबाई अर्जुन खैरे या महिलेला जून महिन्यात तब्बल २० हजार ७७० रुपये वीजबिल आले. यापूर्वी सरासरी १००० रुपये बिल येत होते.लॉकडाऊनच्या काळात एवढे काय झाले की, बिल एकदम २० हजार पार गेले. याशिवाय सरासरी ५०० ते ५५० रुपये दरमहा वीजबिल भरणाºया ग्राहकास जूून महिन्याचे ५ ते ६ हजार रुपये बिल आल्याने या ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत. एखाद-दुसºया ग्राहकाच्या बाबतीत चूक होऊ शकते मात्र शहरासह तालुक्यातील अनेक ग्राहकांच्या बाबतीत हाच प्रकार घडल्याने महावितरणच्या कार्यालयासमोर बिले कमी करण्यासाठी ग्राहकांची दररोज गर्दी होत आहे. अधिक देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.सामान्यांचे हाललॉकडाऊन काळात शेतकरी, कामगार, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे राज्य शासनाने रोजगार व उत्पादनाचे कुठलेही नियोजन केले नसल्याने सर्वांना उपासमारीला सामोरे जावे लागले आहे.या काळात सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बुडाल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. हे सर्व घडत असतानाच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने व्यवसाय करणारे दुकाने बंद आहेत.बंदकाळात विजेचा कोणताही वापर झालेला नसताना अंदाजे मीटर रीडिंग दाखवून एकत्रित तीन महिन्यांचे बिले काढून व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना वीज वितरण कंपनीने मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रास देण्याचे काम सुरू केले आहे.

टॅग्स :sinnar-acसिन्नरelectricityवीज