शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

मद्यालयांसमोरील तळीरामांची गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:58 IST

सिन्नर : जवळपास ४०-४५ दिवस बंद असलेली दारू विक्रीची दुकाने सुरू झाल्यानंतर दोन दिवस तेथे दिसणारी तळीरामांची गर्दी ओसरली असून, आता मद्य विक्रेत्यांवर ग्राहकांची वाट बघण्याची वेळ आली आहे.

सिन्नर : जवळपास ४०-४५ दिवस बंद असलेली दारू विक्रीची दुकाने सुरू झाल्यानंतर दोन दिवस तेथे दिसणारी तळीरामांची गर्दी ओसरली असून, आता मद्य विक्रेत्यांवर ग्राहकांची वाट बघण्याची वेळ आली आहे.कोरोनाच्या संकटात दारू दुकाने उघडण्यास शासनाने बंदी घातली होती. दारूच्या आहारी गेलेल्यांना कधी एकदा दारु मिळेल असे झाले होते. त्याबाबत समाज माध्यमांतून चर्चाही सुरू झाली होती. सर्वच बाजंूनी ही चर्चा सुरू झाल्यांनतर मोठा महसूल बुडत असल्याचा साक्षात्कार शासनाला झाला आणि दारू दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. पहिल्या दिवशी तळीरामांनी तुडुंब गर्दी केल्याने पोलीसाना हस्तक्षेप करीत ही दुकाने बंद करण्याची नामुष्की ओढवली होती. मात्र, त्यानंतर शासनाने काही बंधने लादत पुन्हा दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. दुकानासमोर बॅरिकेट्स लावणे, ग्राहकांना सावलीत उभे राहता यावे यासाठी मांडव टाकणे, सोशल डिस्टन्सिंंग पाळणे, सॅनिटायझरने हात धूणे यासह सर्व बाबींची दुकानदारांनी व्यवस्था केली. त्यानंतरही दुकानात एकदम गर्दी होऊ नये म्हणून दुकानाबाहेर उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही उभे केले. टोकन नंबर देऊन एका-एका ग्राहकाला माल देण्याची व्यवस्था करण्यात आली.रस्त्यावर होणारी ग्राहकांची गर्दी हुसकावण्यासाठी पोलीसांची नियुक्ती करण्यात आली. दुकानाबाहेर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी थांबले याचा अर्थ दुकाने २-३ दिवसच उघडतील असा कयास बांधून अनेकांनी महिना-दोन महिना पुरेल एवढी दारू खरेदी केली. अनेकांनी दारूच्या खंब्यांचे बॉक्सच्या बॉक्स उचलून नेले. मात्र, त्यानंतर प्रत्येक ग्राहकाला दोनच खंबे देणे सुरू झाले. विक्रेता दिवसभरात जास्तीत जास्त ४०० ग्राहकांनाच मद्य विकू शकेल, असे बंधन घातले गेले. दुकानांची वेळ १० ते ५ असताना साडेतीनलाच अपेक्षित ग्राहक झाल्याने दुकान बंद करण्याची वेळ विक्रेत्यांवर येत होती. मात्र, ३-४ दिवसांनतर ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.-------------------------------------------------------शहरातील तीनही दुकानांसमोर दिसणारी ग्राहकांची रांग बंद झाली आहे. त्यामुळे दुकानासमारील मंडप गायब झाले आहेत. दुकानासमोरील गर्दी आवरण्यासाठी विक्रेत्यांना जादा माणसे कामावर ठेवावी लागली होती. त्यांचे कामही कमी झाले आहे. सकाळी १० वाजेला दुकान उघडल्यापासून दिवसभरात शंभर ग्राहकही येत नसल्याने विक्रेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. जादा विक्री होईल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर खरेदी केलेला माल दुकानात पडून आहे. तथापि तळीरामांनी घरातच साठा करून ठेवल्याने त्यांना म्हणावा असा उठाव नसल्याने चांगल्या ‘कमाई’चे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक