शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
3
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
4
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
5
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
6
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
7
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
8
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
9
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
10
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
11
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
12
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
13
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
14
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
15
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
16
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
17
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
18
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
19
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
20
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
Daily Top 2Weekly Top 5

मद्यालयांसमोरील तळीरामांची गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:58 IST

सिन्नर : जवळपास ४०-४५ दिवस बंद असलेली दारू विक्रीची दुकाने सुरू झाल्यानंतर दोन दिवस तेथे दिसणारी तळीरामांची गर्दी ओसरली असून, आता मद्य विक्रेत्यांवर ग्राहकांची वाट बघण्याची वेळ आली आहे.

सिन्नर : जवळपास ४०-४५ दिवस बंद असलेली दारू विक्रीची दुकाने सुरू झाल्यानंतर दोन दिवस तेथे दिसणारी तळीरामांची गर्दी ओसरली असून, आता मद्य विक्रेत्यांवर ग्राहकांची वाट बघण्याची वेळ आली आहे.कोरोनाच्या संकटात दारू दुकाने उघडण्यास शासनाने बंदी घातली होती. दारूच्या आहारी गेलेल्यांना कधी एकदा दारु मिळेल असे झाले होते. त्याबाबत समाज माध्यमांतून चर्चाही सुरू झाली होती. सर्वच बाजंूनी ही चर्चा सुरू झाल्यांनतर मोठा महसूल बुडत असल्याचा साक्षात्कार शासनाला झाला आणि दारू दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. पहिल्या दिवशी तळीरामांनी तुडुंब गर्दी केल्याने पोलीसाना हस्तक्षेप करीत ही दुकाने बंद करण्याची नामुष्की ओढवली होती. मात्र, त्यानंतर शासनाने काही बंधने लादत पुन्हा दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. दुकानासमोर बॅरिकेट्स लावणे, ग्राहकांना सावलीत उभे राहता यावे यासाठी मांडव टाकणे, सोशल डिस्टन्सिंंग पाळणे, सॅनिटायझरने हात धूणे यासह सर्व बाबींची दुकानदारांनी व्यवस्था केली. त्यानंतरही दुकानात एकदम गर्दी होऊ नये म्हणून दुकानाबाहेर उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही उभे केले. टोकन नंबर देऊन एका-एका ग्राहकाला माल देण्याची व्यवस्था करण्यात आली.रस्त्यावर होणारी ग्राहकांची गर्दी हुसकावण्यासाठी पोलीसांची नियुक्ती करण्यात आली. दुकानाबाहेर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी थांबले याचा अर्थ दुकाने २-३ दिवसच उघडतील असा कयास बांधून अनेकांनी महिना-दोन महिना पुरेल एवढी दारू खरेदी केली. अनेकांनी दारूच्या खंब्यांचे बॉक्सच्या बॉक्स उचलून नेले. मात्र, त्यानंतर प्रत्येक ग्राहकाला दोनच खंबे देणे सुरू झाले. विक्रेता दिवसभरात जास्तीत जास्त ४०० ग्राहकांनाच मद्य विकू शकेल, असे बंधन घातले गेले. दुकानांची वेळ १० ते ५ असताना साडेतीनलाच अपेक्षित ग्राहक झाल्याने दुकान बंद करण्याची वेळ विक्रेत्यांवर येत होती. मात्र, ३-४ दिवसांनतर ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.-------------------------------------------------------शहरातील तीनही दुकानांसमोर दिसणारी ग्राहकांची रांग बंद झाली आहे. त्यामुळे दुकानासमारील मंडप गायब झाले आहेत. दुकानासमोरील गर्दी आवरण्यासाठी विक्रेत्यांना जादा माणसे कामावर ठेवावी लागली होती. त्यांचे कामही कमी झाले आहे. सकाळी १० वाजेला दुकान उघडल्यापासून दिवसभरात शंभर ग्राहकही येत नसल्याने विक्रेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. जादा विक्री होईल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर खरेदी केलेला माल दुकानात पडून आहे. तथापि तळीरामांनी घरातच साठा करून ठेवल्याने त्यांना म्हणावा असा उठाव नसल्याने चांगल्या ‘कमाई’चे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक