शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

मद्यालयांसमोरील तळीरामांची गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:58 IST

सिन्नर : जवळपास ४०-४५ दिवस बंद असलेली दारू विक्रीची दुकाने सुरू झाल्यानंतर दोन दिवस तेथे दिसणारी तळीरामांची गर्दी ओसरली असून, आता मद्य विक्रेत्यांवर ग्राहकांची वाट बघण्याची वेळ आली आहे.

सिन्नर : जवळपास ४०-४५ दिवस बंद असलेली दारू विक्रीची दुकाने सुरू झाल्यानंतर दोन दिवस तेथे दिसणारी तळीरामांची गर्दी ओसरली असून, आता मद्य विक्रेत्यांवर ग्राहकांची वाट बघण्याची वेळ आली आहे.कोरोनाच्या संकटात दारू दुकाने उघडण्यास शासनाने बंदी घातली होती. दारूच्या आहारी गेलेल्यांना कधी एकदा दारु मिळेल असे झाले होते. त्याबाबत समाज माध्यमांतून चर्चाही सुरू झाली होती. सर्वच बाजंूनी ही चर्चा सुरू झाल्यांनतर मोठा महसूल बुडत असल्याचा साक्षात्कार शासनाला झाला आणि दारू दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. पहिल्या दिवशी तळीरामांनी तुडुंब गर्दी केल्याने पोलीसाना हस्तक्षेप करीत ही दुकाने बंद करण्याची नामुष्की ओढवली होती. मात्र, त्यानंतर शासनाने काही बंधने लादत पुन्हा दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. दुकानासमोर बॅरिकेट्स लावणे, ग्राहकांना सावलीत उभे राहता यावे यासाठी मांडव टाकणे, सोशल डिस्टन्सिंंग पाळणे, सॅनिटायझरने हात धूणे यासह सर्व बाबींची दुकानदारांनी व्यवस्था केली. त्यानंतरही दुकानात एकदम गर्दी होऊ नये म्हणून दुकानाबाहेर उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही उभे केले. टोकन नंबर देऊन एका-एका ग्राहकाला माल देण्याची व्यवस्था करण्यात आली.रस्त्यावर होणारी ग्राहकांची गर्दी हुसकावण्यासाठी पोलीसांची नियुक्ती करण्यात आली. दुकानाबाहेर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी थांबले याचा अर्थ दुकाने २-३ दिवसच उघडतील असा कयास बांधून अनेकांनी महिना-दोन महिना पुरेल एवढी दारू खरेदी केली. अनेकांनी दारूच्या खंब्यांचे बॉक्सच्या बॉक्स उचलून नेले. मात्र, त्यानंतर प्रत्येक ग्राहकाला दोनच खंबे देणे सुरू झाले. विक्रेता दिवसभरात जास्तीत जास्त ४०० ग्राहकांनाच मद्य विकू शकेल, असे बंधन घातले गेले. दुकानांची वेळ १० ते ५ असताना साडेतीनलाच अपेक्षित ग्राहक झाल्याने दुकान बंद करण्याची वेळ विक्रेत्यांवर येत होती. मात्र, ३-४ दिवसांनतर ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.-------------------------------------------------------शहरातील तीनही दुकानांसमोर दिसणारी ग्राहकांची रांग बंद झाली आहे. त्यामुळे दुकानासमारील मंडप गायब झाले आहेत. दुकानासमोरील गर्दी आवरण्यासाठी विक्रेत्यांना जादा माणसे कामावर ठेवावी लागली होती. त्यांचे कामही कमी झाले आहे. सकाळी १० वाजेला दुकान उघडल्यापासून दिवसभरात शंभर ग्राहकही येत नसल्याने विक्रेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. जादा विक्री होईल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर खरेदी केलेला माल दुकानात पडून आहे. तथापि तळीरामांनी घरातच साठा करून ठेवल्याने त्यांना म्हणावा असा उठाव नसल्याने चांगल्या ‘कमाई’चे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक