शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अन्नपूर्णामातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:19 IST

येथे सुरू असलेला व निलपर्वतावर स्थापित झालेल्या अन्नपूर्णामाता मंदिर परिसरात सुरू असलेल्या शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञामध्ये आतापर्यंत सहा लाखातून अधिक आहुती देण्यात आल्या.

त्र्यंबकेश्वर : येथे सुरू असलेला व निलपर्वतावर स्थापित झालेल्या अन्नपूर्णामाता मंदिर परिसरात सुरू असलेल्या शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञामध्ये आतापर्यंत सहा लाखातून अधिक आहुती देण्यात आल्या. यज्ञाच्या सांगतेपर्यंत (दि. २८) एकूण नऊ लाख आहुती दिल्या जाणार असल्याची माहिती यज्ञाचार्य पंडित कल्याण दत्तशास्त्री, इंदूर यांनी दिली. दरम्यान, अन्नपूर्णामातेचे  दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.  यज्ञाच्या महत्त्वाबाबत सांगताना कल्याण दत्तशास्त्री म्हणाले, शास्त्रानुसार यज्ञाचे मोठे महत्त्व आहे. यज्ञामुळे पर्यावरण शुद्धी होऊन त्यामुळे चांगला पाऊस पडतो. चांगल्या पावसाने शेतात अन्नधान्यांची निर्मिती होऊन सर्व प्राणिमात्रांचे जीवन चालते. यज्ञ हे भगवान विष्णूचे एक रूप असून, उपनिषदानुसार यज्ञ न करणारा तेजहीन होतो. वायुप्रदूषण कमी करण्यास यज्ञ हे एक महत्त्वाचे साधन असून, त्र्यंबकेश्वर येथे होणार हा महायज्ञ सर्वांच्या कल्याणासाठी करण्यात येत आहे.  भारताच्या विविध भागातून आलेले १०० यजमान सिद्धपीठ श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरिटेबल ट्रस्टचे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज व देशातील ६२५ पंडितांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञात सहभागी झाली आहेत. पूर्णपणे शास्त्रानुसार उभारण्यात आलेल्या ३२ हजार चौरस फूट एवढ्या भव्य यज्ञशाळेत १०० कुंडांमध्ये यज्ञात आहुती देत आहेत.  गेल्या दहा दिवसांपासून अन्नपूर्णामातेचा अन्नदान भंडारा अव्याहत सुरू असुन सकाळ दुपार संध्यकाळ या परिसरातून नागरिक प्रसाद भोजन ग्रहणासाठी येत असतात.

टॅग्स :Nashikनाशिक