शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

अन्नपूर्णामातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:19 IST

येथे सुरू असलेला व निलपर्वतावर स्थापित झालेल्या अन्नपूर्णामाता मंदिर परिसरात सुरू असलेल्या शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञामध्ये आतापर्यंत सहा लाखातून अधिक आहुती देण्यात आल्या.

त्र्यंबकेश्वर : येथे सुरू असलेला व निलपर्वतावर स्थापित झालेल्या अन्नपूर्णामाता मंदिर परिसरात सुरू असलेल्या शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञामध्ये आतापर्यंत सहा लाखातून अधिक आहुती देण्यात आल्या. यज्ञाच्या सांगतेपर्यंत (दि. २८) एकूण नऊ लाख आहुती दिल्या जाणार असल्याची माहिती यज्ञाचार्य पंडित कल्याण दत्तशास्त्री, इंदूर यांनी दिली. दरम्यान, अन्नपूर्णामातेचे  दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.  यज्ञाच्या महत्त्वाबाबत सांगताना कल्याण दत्तशास्त्री म्हणाले, शास्त्रानुसार यज्ञाचे मोठे महत्त्व आहे. यज्ञामुळे पर्यावरण शुद्धी होऊन त्यामुळे चांगला पाऊस पडतो. चांगल्या पावसाने शेतात अन्नधान्यांची निर्मिती होऊन सर्व प्राणिमात्रांचे जीवन चालते. यज्ञ हे भगवान विष्णूचे एक रूप असून, उपनिषदानुसार यज्ञ न करणारा तेजहीन होतो. वायुप्रदूषण कमी करण्यास यज्ञ हे एक महत्त्वाचे साधन असून, त्र्यंबकेश्वर येथे होणार हा महायज्ञ सर्वांच्या कल्याणासाठी करण्यात येत आहे.  भारताच्या विविध भागातून आलेले १०० यजमान सिद्धपीठ श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरिटेबल ट्रस्टचे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज व देशातील ६२५ पंडितांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञात सहभागी झाली आहेत. पूर्णपणे शास्त्रानुसार उभारण्यात आलेल्या ३२ हजार चौरस फूट एवढ्या भव्य यज्ञशाळेत १०० कुंडांमध्ये यज्ञात आहुती देत आहेत.  गेल्या दहा दिवसांपासून अन्नपूर्णामातेचा अन्नदान भंडारा अव्याहत सुरू असुन सकाळ दुपार संध्यकाळ या परिसरातून नागरिक प्रसाद भोजन ग्रहणासाठी येत असतात.

टॅग्स :Nashikनाशिक