शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जिल्ह्यात पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:27 IST

पाटणे : परिसरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डाळिंबबागांसह अन्य पिकांना झळ बसली आहे. मागील वर्षी डाळिंंबाचे अपेक्षित उत्पादन हाती लागले नाही. कारण मे महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी बहार धरला. जून महिन्याच्या सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे फूलगळ होऊन फळधारणा अतिशय अल्प प्रमाणात झाली.

पाटणे : परिसरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डाळिंबबागांसह अन्य पिकांना झळ बसली आहे. मागील वर्षी डाळिंंबाचे अपेक्षित उत्पादन हाती लागले नाही. कारण मे महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी बहार धरला. जून महिन्याच्या सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे फूलगळ होऊन फळधारणा अतिशय अल्प प्रमाणात झाली. परिणामी डाळिंंबबागा यशस्वी झाल्या नाहीत. त्याचा फटका डाळिंंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. यावर्षीही पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पुन्हा बागांची सेटिंग होताना शेतकºयांना मोठ्या प्रमाणात मेहनत करावी लागली. हजारो रुपये फवारणी, खतांसाठी खर्च करून जिवापाड जोपासलेल्या बागेत फळधारणा होऊन डाळिंंबबागा बहरत असतानाच गेल्या तीन दिवसांच्या पावसामुळे बागेमध्ये दोन दोनफुटापर्यंत पाणी साचले आहे. पाण्याचा निचराही होत नसल्याने मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.फळगळ व फूलगळ तसेच डाळिंंबाच्या झाडांचे नुकसान होत आहे. यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यत डाळिंंब उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. डाळिंंब उत्पादक शेतकºयांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी पाटणे येथील डाळिंंब उत्पादक शेतकरी चंद्रकांत अहिरे, विजय हिरे, सोसायटीचे माजी चेअरमन हरिदास अहिरे, माजी सरपंच नथू खैरनार, दादाजी खैरनार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास आहिरे, सुरेश रघुनाथ अहिरे, नानाजी शेवाळे, सुभाष अहिरे, नारायण खैरनार, कृष्णा आहिरे, दशरथ खैरनार, शिवाजी खैरनार, शरद खैरनार, शंकर खैरनार, दशरथ खैरनार, ईश्वर खैरनार, लालचंद खैरनार आदी शेतकºयांनी केली आहे.----------------डोंगरगावी नुकसानमेशी : देवळा पूर्व भागातील डोंगरगाव, मेशीसह परिसराला पावसाने तीन दिवसांपासून झोडपून काढले असून, खरीप पिकांसह कोबी, टमाटा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. डोंगरगाव येथील गोकुळ सावंत, चिंतामण सावंत यांच्यासह अनेक शेतकºयांच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्याने बाजरी, मका आणि भुईमूग आदी पिके खराब झाली आहेत. याशिवाय मेशी येथील भिका शिरसाठ यांच्या टमाटा व कोबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सलग दोन-तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा चाळीत पाणी घुसल्याने कांदा सडण्याची भीती आहे. महसूल विभागाने दखल घेऊन पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत. ओढे, नाल्यांचेही पाणी उभ्या पिकांमध्ये घुसल्याने पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे पिके सडण्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.--------------पाटोदा परिसरातील गावांमध्ये हजारो एकर मका, बाजरी भुईसपाटपाटोदा : परिसरात शनिवारी, (दि. २५) सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी पावसाने परिसरातील पाच ते सहा गावांमधील हजारो हेक्टर मका व बाजरीचे पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.हातातोंडाशी येत असलेला घास अस्मानी संकटाने हिरावला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी व सोयाबीन पिकावरील उंट अळीने शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. अळी नियंत्रणासाठी हजारो रु पयांची महागडी औषधे व कीटकनाशके फवारणी करून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांवर वादळी पावसाचे दुहेरी संकट कोसळले आहे. शासनाने नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.शनिवारी सायंकाळी वादळी वाºयासह झालेल्या जोरदार पावसाने पाटोदा परिसरातील ठाणगाव, कानडी, आडगाव रेपाळ, विखरणी, पिंपरी, दहेगाव, सातारे, शिरसगाव, लौकी, निळखेडे, सोमठाणदेश, गुजरखेडे या भागातील मुख्य पीक असलेले मका, व बाजरीचे पीक आडवे होऊन पूर्णत: भुईसपाट झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक