शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा काढणाऱ्यांना अद्याप भरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:25 IST

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना राज्य शासनातर्फे भरपाई मिळण्यास प्रारंभ झाला असला तरी ज्या शेतकºयांनी पीकविमा काढला आहे त्यांना नुकसानभरपाईसाठी अद्याप महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देरक्कम खात्यावर जमा : विमा नसलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत

नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना राज्य शासनातर्फे भरपाई मिळण्यास प्रारंभ झाला असला तरी ज्या शेतकºयांनी पीकविमा काढला आहे त्यांना नुकसानभरपाईसाठी अद्याप महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे.गेल्या सप्टेंबर,आॅक्टोबरमध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मका, बाजरी, द्राक्ष, लाल कांदा, कांदा रोप, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. ज्या शेतकºयांच्या कांदा रोपांचे नुकसान झाले त्यांनी पुन्हा रोप टाकले पण त्याचेही नुकसान झाल्याने ऐन हंगामात शेतकºयांना कांदा रोप मिळविण्यासाठी गावोगावी फिरण्याची वेळ आली.सोंगणी केलेल्या मकाच्या कणसांना कोंब फुटल्याने मकाचे उत्पादन कमी झाले. लष्करी अळीच्या आक्रमणापासून शेतकºयांनी मोठ्या हिमतीने मका पीक वाचविले, मात्र नंतर ते पावसाच्या सपाट्यात सापडल्यामुळे अनेक शेतकºयांचे होत्याचे नव्हते झाले.झालेल्या नुकसानीची शेतकºयांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी होऊ लागल्यानंतर राज्य शासनाने महसूल विभागाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी गावोगावी जाऊन नुकसानीचे पंचनामे केले. त्यानंतर राज्य शासनाने खरीप पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी आठ हजार तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले. पंचनाम्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर आता राज्य शासनाने अनुदान देण्यास सुरुवात केली असून अनेक शेतकºयांच्या बॅँक खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल की नाही याबाबत गावागावातील शेतकºयांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे. ज्यांनी पीकविमा केला नाही त्यांना पैसे मिळाले मात्र ज्यांनी अडचणीच्या काळातही पीक विम्याचा हप्ता भरला त्यांना मात्र अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे.फेब्रुवारीअखेर कार्यवाही होण्याची शक्यतापंचनामे करताना ज्या शेतकºयांनी पीकविमा उतरविला आहे त्यांचे क्षेत्र वगळण्यात आले होते. या शेतकºयांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे ज्यांनी विमा उतरविला आहे त्यांना अद्याप नुकसानभरपाईसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई केव्हा मिळेल याची कृषी विभागाला निश्चित माहिती नाही. याबाबत फेब्रुवारीअखेर कार्यवाही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMONEYपैसा