शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा काढणाऱ्यांना अद्याप भरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:25 IST

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना राज्य शासनातर्फे भरपाई मिळण्यास प्रारंभ झाला असला तरी ज्या शेतकºयांनी पीकविमा काढला आहे त्यांना नुकसानभरपाईसाठी अद्याप महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देरक्कम खात्यावर जमा : विमा नसलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत

नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना राज्य शासनातर्फे भरपाई मिळण्यास प्रारंभ झाला असला तरी ज्या शेतकºयांनी पीकविमा काढला आहे त्यांना नुकसानभरपाईसाठी अद्याप महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे.गेल्या सप्टेंबर,आॅक्टोबरमध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मका, बाजरी, द्राक्ष, लाल कांदा, कांदा रोप, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. ज्या शेतकºयांच्या कांदा रोपांचे नुकसान झाले त्यांनी पुन्हा रोप टाकले पण त्याचेही नुकसान झाल्याने ऐन हंगामात शेतकºयांना कांदा रोप मिळविण्यासाठी गावोगावी फिरण्याची वेळ आली.सोंगणी केलेल्या मकाच्या कणसांना कोंब फुटल्याने मकाचे उत्पादन कमी झाले. लष्करी अळीच्या आक्रमणापासून शेतकºयांनी मोठ्या हिमतीने मका पीक वाचविले, मात्र नंतर ते पावसाच्या सपाट्यात सापडल्यामुळे अनेक शेतकºयांचे होत्याचे नव्हते झाले.झालेल्या नुकसानीची शेतकºयांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी होऊ लागल्यानंतर राज्य शासनाने महसूल विभागाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी गावोगावी जाऊन नुकसानीचे पंचनामे केले. त्यानंतर राज्य शासनाने खरीप पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी आठ हजार तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले. पंचनाम्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर आता राज्य शासनाने अनुदान देण्यास सुरुवात केली असून अनेक शेतकºयांच्या बॅँक खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल की नाही याबाबत गावागावातील शेतकºयांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे. ज्यांनी पीकविमा केला नाही त्यांना पैसे मिळाले मात्र ज्यांनी अडचणीच्या काळातही पीक विम्याचा हप्ता भरला त्यांना मात्र अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे.फेब्रुवारीअखेर कार्यवाही होण्याची शक्यतापंचनामे करताना ज्या शेतकºयांनी पीकविमा उतरविला आहे त्यांचे क्षेत्र वगळण्यात आले होते. या शेतकºयांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे ज्यांनी विमा उतरविला आहे त्यांना अद्याप नुकसानभरपाईसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई केव्हा मिळेल याची कृषी विभागाला निश्चित माहिती नाही. याबाबत फेब्रुवारीअखेर कार्यवाही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMONEYपैसा