शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रब्बी हंगामासाठीही पीकविमा योजना लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 01:06 IST

खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात सुरू असलेली प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील रब्बी हंगामासाठी पुढे लागू करण्यात आलेली आहे. यासाठी पीक क्षेत्र आणि पिकांची निश्चिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे २०१९-२० रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळणार आहे. याचा लाभ नाशिक जिल्ह्णातील शेतकºयांना होणार आहे.

ठळक मुद्देपीक निश्चिती : शेतकऱ्यांना परवडेल असा विमादर

नाशिक : खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात सुरू असलेली प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील रब्बी हंगामासाठी पुढे लागू करण्यात आलेली आहे. यासाठी पीक क्षेत्र आणि पिकांची निश्चिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे २०१९-२० रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळणार आहे. याचा लाभ नाशिक जिल्ह्णातील शेतकºयांना होणार आहे.परतीच्या पावसामुळे शेतकºयांचा खरीप हंगाम वाया गेला, तर रब्बी हंगामही उशिरा सुरू झाला आहे. शेतकºयांना शासनाकडून आर्थिक भरपाई देण्यास सुरुवात झालेली आहे. उशिरा सुरू झालेला रब्बीचा हंगाम आणि रब्बीचे घटलेले क्षेत्र यामुळे शेतकºयांना पिक विम्याचा दिलासा मिळणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड, प्रतिकूल वातावरणाचा परिणाम यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकºयांना विमा संरक्षण मिळणार आहे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकºयांचे आर्थिक स्थैर्य यामुळे आबाधित राखण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण देण्यात आले आहे. गहू (बागायत), रब्बी, ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग, रब्बी कांदा या पिकांसाठी शेतकºयांना भरपाई मिळू शकते. याशिवाय भात पिकालाही संरक्षण बहाल करण्यात आले आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०१९-२० या हंगामात राज्यातील प्रत्येक महसूल विभागातील एका जिल्ह्णामध्ये ग्रामपंचायत स्तरावर मुख्य पिकासाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्णात रब्बीतील ज्वारी या मुख्य पिकावर प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविली जाणार आहे. शेतकºयांवर विमा हफ्ता भार कमी करण्यासाठी शासनाने रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकासाठी ५ टक्के इतका विमादर किमान ठेवला आहे. पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे यंदा जोखमीची व्याप्ती वाढविण्यात आलेली आहे. त्यानुसार हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र, जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान या बाबी जोखमीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेती