शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

दाभाडी परिसरात पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:11 IST

दोन दिवसांपासून मालेगाव शहर व ग्रामीण भागात दुपारच्या वेळेस पावसाळी वातावरण तयार होत आहे. शनिवारी दुपारच्या वेळेस अचानक वादळी ...

दोन दिवसांपासून मालेगाव शहर व ग्रामीण भागात दुपारच्या वेळेस पावसाळी वातावरण तयार होत आहे. शनिवारी दुपारच्या वेळेस अचानक वादळी वारे वाहू लागले. त्यातच पावसानेही हजेरी लावल्यामुळे कामानिमित्ताने घराबाहेर असणाऱ्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. अचानक आलेल्या वादळी-वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. पिंपळगाव-दाभाडी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने, काही काळ वाहन चालकांना अडकून पडावे लागले होते. त्याचप्रमाणे, जळगाव, पिंपळगाव, रावळगाव, ढवळीविहिर, रिटायर्डवाडी येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे, अनेक शेतकऱ्यांचे कांदा, डाळिंब, आंबा, लिंबू आदी शेतपिके जमीनदोस्त झाली आहेत. या भागात शेताचे बांध फुटून पाणी वाहत होते, तर अनेक ठिकाणी शेतात गुडघाभर पाणी होते.

रावळगावच्या दळवीवस्ती येथे वादळी-वाऱ्यामुळे आदिवासी बांधवांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. अनेक गरीब लोकांच्या घराचे छप्पर उडून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे, तसेच काही ठिकाणी कांदा चाळींचेही पत्रे उडून गेल्याने पूर्णपणे कांदा पावसात भिजला असल्याने, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे बळीराजा हवालदिल झाला असून, नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

फोटो - ३० दाभाडी १ ते ३

===Photopath===

300521\30nsk_2_30052021_13.jpg~300521\30nsk_3_30052021_13.jpg~300521\30nsk_4_30052021_13.jpg

===Caption===

घरांचे नुकसान~कांदा चाळीचे नुकसान~शेतात सोचलेल्या पाण्याामुळे पिकांचे नुकसान