शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो पिकांवर अस्मानी संकटाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 14:54 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या वातावरणातील बदलावामुळे टमाटा व इतर पिकांवर एक प्रकारे अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाला आहे. त्यामुळे टमाटा पिकं वाचविण्यासाठी बळीराजांची नाके नऊ येऊ लागले आहे.

ठळक मुद्देवातावरणात बदल: धुक्याचे प्रमाण वाढले :पिकांवर विपरीत परिणाम

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या वातावरणातील बदलावामुळे टमाटा व इतर पिकांवर एक प्रकारे अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाला आहे. त्यामुळे टमाटा पिकं वाचविण्यासाठी बळीराजांची नाके नऊ येऊ लागले आहे.शेतकरी वर्गाने टमाटा पिकाला पसंती दिली. थोड्या फार भांडवलाच्या आधारे टमाटा साहित्य खरेदी करून हे पिक घेण्यासाठी नियोजन केले. त्यासाठी लोखंडी तार, बांबू, लोखंडी खिळे इ. साहित्याची खरेदी करून टमाटा पिक घेण्यासाठी मोर्चा बांधणी केली. परंतु टमाटा लागवडी पासून ते बांबू उभे करण्यापर्यंत शेतकरी वर्गाला तारे वरची कसरत करावी लागली आहे.सकाळचे वातावरण हे अतिशय दाट धुक्याचे तर दुपारी कडक ऊन व संध्याकाळी पावसाचे वातावरण अन् रात्री थंडी. त्यामुळे पिकांवर धुक्याचे पाणी साचते, परिणामी फुलकळी गळून पडणे, तसेच टमाटा फळ फुगवणीवर परिणाम होताना दिसत आहे. फुलकळी व फळांची निगा राखण्यासाठी शेतकरी वर्गाला दररोज महागडी औषधे, खते तसेच वेगवेगळ्या स्वरूपाची फवारणी करावी लागत आहे.चौकट...१) वातावरणातील बदलावाचा टमाटा पिकाला मोठा फटका बसण्याचे शक्यता.२)शेतकरी टमाटा पिकं वाचिवण्यासाठी मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध करून पिके वाचिवण्यासाठी भर देतो आहे.३) दाट धुक्याचा फुलकळी व फळधारणेवर परिणाम होण्याची शक्यता.४) अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्ग हतबल.५) मागील वर्षी पेक्षा यंदा भांडवल जास्त खर्च झाल्याने बळीराजा हतबल.प्रतिक्रि या..यंदा टमाटा पिकं घेतांना मोठी धावपळ होत आहे. कोरोनामुळे अगोदर नर्सरी मध्ये टोमॅटो रोपे मिळत नव्हती. परंतु मोठ्या कष्टाने रोपे उपलब्ध करून या पिकांला पसंती दिली. परंतु वातावरणातील बदलावाचा टमाटा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त भांडवल खर्च झालेला आहे. त्यामुळे आम्हाला टमाटा पिकं घेतांना मोठी धावपळ करावी लागत आहे.- समाधान देशमुख, शेतकरी, कोशिंबे. 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी