शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

टोमॅटो पिकांवर अस्मानी संकटाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 14:54 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या वातावरणातील बदलावामुळे टमाटा व इतर पिकांवर एक प्रकारे अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाला आहे. त्यामुळे टमाटा पिकं वाचविण्यासाठी बळीराजांची नाके नऊ येऊ लागले आहे.

ठळक मुद्देवातावरणात बदल: धुक्याचे प्रमाण वाढले :पिकांवर विपरीत परिणाम

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या वातावरणातील बदलावामुळे टमाटा व इतर पिकांवर एक प्रकारे अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाला आहे. त्यामुळे टमाटा पिकं वाचविण्यासाठी बळीराजांची नाके नऊ येऊ लागले आहे.शेतकरी वर्गाने टमाटा पिकाला पसंती दिली. थोड्या फार भांडवलाच्या आधारे टमाटा साहित्य खरेदी करून हे पिक घेण्यासाठी नियोजन केले. त्यासाठी लोखंडी तार, बांबू, लोखंडी खिळे इ. साहित्याची खरेदी करून टमाटा पिक घेण्यासाठी मोर्चा बांधणी केली. परंतु टमाटा लागवडी पासून ते बांबू उभे करण्यापर्यंत शेतकरी वर्गाला तारे वरची कसरत करावी लागली आहे.सकाळचे वातावरण हे अतिशय दाट धुक्याचे तर दुपारी कडक ऊन व संध्याकाळी पावसाचे वातावरण अन् रात्री थंडी. त्यामुळे पिकांवर धुक्याचे पाणी साचते, परिणामी फुलकळी गळून पडणे, तसेच टमाटा फळ फुगवणीवर परिणाम होताना दिसत आहे. फुलकळी व फळांची निगा राखण्यासाठी शेतकरी वर्गाला दररोज महागडी औषधे, खते तसेच वेगवेगळ्या स्वरूपाची फवारणी करावी लागत आहे.चौकट...१) वातावरणातील बदलावाचा टमाटा पिकाला मोठा फटका बसण्याचे शक्यता.२)शेतकरी टमाटा पिकं वाचिवण्यासाठी मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध करून पिके वाचिवण्यासाठी भर देतो आहे.३) दाट धुक्याचा फुलकळी व फळधारणेवर परिणाम होण्याची शक्यता.४) अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्ग हतबल.५) मागील वर्षी पेक्षा यंदा भांडवल जास्त खर्च झाल्याने बळीराजा हतबल.प्रतिक्रि या..यंदा टमाटा पिकं घेतांना मोठी धावपळ होत आहे. कोरोनामुळे अगोदर नर्सरी मध्ये टोमॅटो रोपे मिळत नव्हती. परंतु मोठ्या कष्टाने रोपे उपलब्ध करून या पिकांला पसंती दिली. परंतु वातावरणातील बदलावाचा टमाटा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त भांडवल खर्च झालेला आहे. त्यामुळे आम्हाला टमाटा पिकं घेतांना मोठी धावपळ करावी लागत आहे.- समाधान देशमुख, शेतकरी, कोशिंबे. 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी