शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

टोमॅटो पिकांवर अस्मानी संकटाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 14:54 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या वातावरणातील बदलावामुळे टमाटा व इतर पिकांवर एक प्रकारे अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाला आहे. त्यामुळे टमाटा पिकं वाचविण्यासाठी बळीराजांची नाके नऊ येऊ लागले आहे.

ठळक मुद्देवातावरणात बदल: धुक्याचे प्रमाण वाढले :पिकांवर विपरीत परिणाम

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या वातावरणातील बदलावामुळे टमाटा व इतर पिकांवर एक प्रकारे अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाला आहे. त्यामुळे टमाटा पिकं वाचविण्यासाठी बळीराजांची नाके नऊ येऊ लागले आहे.शेतकरी वर्गाने टमाटा पिकाला पसंती दिली. थोड्या फार भांडवलाच्या आधारे टमाटा साहित्य खरेदी करून हे पिक घेण्यासाठी नियोजन केले. त्यासाठी लोखंडी तार, बांबू, लोखंडी खिळे इ. साहित्याची खरेदी करून टमाटा पिक घेण्यासाठी मोर्चा बांधणी केली. परंतु टमाटा लागवडी पासून ते बांबू उभे करण्यापर्यंत शेतकरी वर्गाला तारे वरची कसरत करावी लागली आहे.सकाळचे वातावरण हे अतिशय दाट धुक्याचे तर दुपारी कडक ऊन व संध्याकाळी पावसाचे वातावरण अन् रात्री थंडी. त्यामुळे पिकांवर धुक्याचे पाणी साचते, परिणामी फुलकळी गळून पडणे, तसेच टमाटा फळ फुगवणीवर परिणाम होताना दिसत आहे. फुलकळी व फळांची निगा राखण्यासाठी शेतकरी वर्गाला दररोज महागडी औषधे, खते तसेच वेगवेगळ्या स्वरूपाची फवारणी करावी लागत आहे.चौकट...१) वातावरणातील बदलावाचा टमाटा पिकाला मोठा फटका बसण्याचे शक्यता.२)शेतकरी टमाटा पिकं वाचिवण्यासाठी मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध करून पिके वाचिवण्यासाठी भर देतो आहे.३) दाट धुक्याचा फुलकळी व फळधारणेवर परिणाम होण्याची शक्यता.४) अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्ग हतबल.५) मागील वर्षी पेक्षा यंदा भांडवल जास्त खर्च झाल्याने बळीराजा हतबल.प्रतिक्रि या..यंदा टमाटा पिकं घेतांना मोठी धावपळ होत आहे. कोरोनामुळे अगोदर नर्सरी मध्ये टोमॅटो रोपे मिळत नव्हती. परंतु मोठ्या कष्टाने रोपे उपलब्ध करून या पिकांला पसंती दिली. परंतु वातावरणातील बदलावाचा टमाटा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त भांडवल खर्च झालेला आहे. त्यामुळे आम्हाला टमाटा पिकं घेतांना मोठी धावपळ करावी लागत आहे.- समाधान देशमुख, शेतकरी, कोशिंबे. 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी