शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी द्राक्षबागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 18:28 IST

चुकीच्या धोरणांमुळे यंदा ४० टक्केच पाणीपुरवठा शिल्लक असल्याने द्राक्ष बागाईतदार संकटात सापडले आहे. त्यासाठी निफाड तालुक्यातील कारसूळ, नारायण टेंभी व वडाळी नजीक येथील शेतकऱ्यांनी द्राक्षपीक धोक्यात आल्याने कादवा नदीत सिंचनासाठी पाणी सोडावे अन्यथा उपोषण व येणाºया लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असे निवेदन दि. २४ रोजी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्याने येथील शेतकºयांनी कारसूळ येथील राम मंदिरासमोर गांधी पर्याय अवलंबून बुधवारपासून (दि. २६) बेमुदत उपोषणास प्रारंभ होणारआहे.

ठळक मुद्देनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

पिंपळगाव बसवंत : चुकीच्या धोरणांमुळे यंदा ४० टक्केच पाणीपुरवठा शिल्लक असल्याने द्राक्ष बागाईतदार संकटात सापडले आहे. त्यासाठी निफाड तालुक्यातील कारसूळ, नारायण टेंभी व वडाळी नजीक येथील शेतकऱ्यांनी द्राक्षपीक धोक्यात आल्याने कादवा नदीत सिंचनासाठी पाणी सोडावे अन्यथा उपोषण व येणाºया लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असे निवेदन दि. २४ रोजी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्याने येथील शेतकºयांनी कारसूळ येथील राम मंदिरासमोर गांधी पर्याय अवलंबून बुधवारपासून (दि. २६) बेमुदत उपोषणास प्रारंभ होणारआहे.निफाड तालुक्यातील रौळस केटीवेअर बंधाºयात पाणीच नसल्याने परिसरातील ६०० ते ७०० हेक्टरवरील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. प्रशासनाने याची दखल घेऊन सिंचनासाठी त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी पालकमंत्री व जिल्हाधिकारी कार्यालयात दि. २४ रोजी येथील शेतकºयांनी केली होती.परंतु अद्यापही प्रशासनाने कोणतीच भूमिका न घेतल्याने येथील शेतकºयांनी बेमुदत अमर उपोषणास सुरु वात केली.निफाड तालुक्यातील कारसूळ या गावाजवळून कादवा नदीपात्र असून, यावर रौळस, पिंपरी गावाजवळ कोल्हापूर टाइप बंधारा आहे. हा बंधारा भरण्यासाठी पाटबंधारे खात्याच्या नियमानुसार प्लेट्स टाकाव्या लागतात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे; परंतु याच काळात पावसाळा विश्रांती घेतो. परिणामी चुकीच्या धोरणामुळे केवळ ४० टक्के साठा शिल्लक असतो. त्यामुळे परिसरातील द्राक्ष पिके संकटात सापडतात.आजच्या स्थितीला या गावातील यावेळी देवेंद्र काजळे, भाऊसाहेब शंकपाळ, ओमप्रकाश ताकाटे, प्रवीण वाघ, नितीन गवळी, जीवन वाघचौरे, विठ्ठल गाडे, अजय गवळी, बाळासाहेब गवळी, श्यामराव जाधव, शशिकांत गवळी, विजय काजळे, योगेश ताकाटे, वाल्मीक घोलप, दौलत गोडसे, नीलेश कदम, भूषण पगार आदींसह शेतकरी सध्या गावातील काळाराम मंदिर परिसरात बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती