शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीचे संकट टळले; बळीराजा शेतीकामात व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:30 IST

लखमापूर : परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले असून, शेतकरीवर्ग आता पेरणीनंतरच्या शेतीकामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. तीन आठवड्यापूर्वी पावसाने ओढ दिल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी पांडुरंगाला साकडे घातले होते.

लखमापूर : परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले असून, शेतकरीवर्ग आता पेरणीनंतरच्या शेतीकामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. तीन आठवड्यापूर्वी पावसाने ओढ दिल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी पांडुरंगाला साकडे घातले होते. त्यानुसार लखमापूर, म्हेळुसके, ओझे, दहेगाव, वागळुद, परमोरी, ओझरखेड, करंजवण, अवनखेड, कादवा म्हाळुंगी आदी भागात पावसाने दमदार हजेरी लावली. शेतकरीवर्गाने मशागत पूर्वकामे करून सोयाबीन, भुईमूग, भात व इतर पिकांची पेरणी केल्यानंतर पावसाने या पिकांना आधार दिला आहे. त्यामुळे आता बळीराजांची कोळपणी, निंदणी, पिकांना खत घालण्याच्या कामात लगीनघाई सुरू झाली आहे.रब्बी हंगामात बळीराजाचे अतोनात हाल झाले होते. जी पिके घेतली, त्याला भाव न मिळाल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला होता. त्यात कोरोना साथीच्या रोगाने थैमान घातल्याने ग्रामीण भागातील बळीराजाची अवस्था ‘न घरका न घाटका’ अशी झाली होती.परंतु या परिस्थितीचा सामना करीत त्याने खरीप हंगामासाठी उरलेल्या भांडवलावर सुरुवात केली. परंतु अगोदर चांगला पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने नजरा आकाशाकडे लागल्याहोत्या. परंतु आषाढी एकादशीनंतर पांडुरंगाला घातलेले पावसासाठीचे साकडे खरे ठरले व दुबार पेरणीचे संकट टळले. आता उगवण झालेल्या पिकाची पेरणी नंतरची कामे करण्यात शेतकरी सध्या मग्न आहेत. चार ते पाच दिवसांपासून पावसामुळे शेतीकामे जोरात सुरू आहे. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरीवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.----------------दिवसाआड दुकाने उघडत असल्याने खतांसाठी धावपळ...दिंडोरी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे शासनाने लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे दिवसाआड खतांची दुकाने उघडण्यात येतात. त्यामुळे आगाऊ नोंदणी करून खते खरेदी करावी लागतात. शेतकरीवर्गाचा वेळ वाया जात आहे. अशा अनेक संकटाचा सामना करीत बळीराजा खरीप हंगामातील पिकांवर आशा ठेवून आहे. रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीची भर खरीप हंगामातील पिके भरून काढतील. या दृष्टीने शेतकऱ्यांकडून नियोजन आखले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक