शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

दुबार पेरणीचे संकट टळले; बळीराजा शेतीकामात व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:30 IST

लखमापूर : परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले असून, शेतकरीवर्ग आता पेरणीनंतरच्या शेतीकामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. तीन आठवड्यापूर्वी पावसाने ओढ दिल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी पांडुरंगाला साकडे घातले होते.

लखमापूर : परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले असून, शेतकरीवर्ग आता पेरणीनंतरच्या शेतीकामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. तीन आठवड्यापूर्वी पावसाने ओढ दिल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी पांडुरंगाला साकडे घातले होते. त्यानुसार लखमापूर, म्हेळुसके, ओझे, दहेगाव, वागळुद, परमोरी, ओझरखेड, करंजवण, अवनखेड, कादवा म्हाळुंगी आदी भागात पावसाने दमदार हजेरी लावली. शेतकरीवर्गाने मशागत पूर्वकामे करून सोयाबीन, भुईमूग, भात व इतर पिकांची पेरणी केल्यानंतर पावसाने या पिकांना आधार दिला आहे. त्यामुळे आता बळीराजांची कोळपणी, निंदणी, पिकांना खत घालण्याच्या कामात लगीनघाई सुरू झाली आहे.रब्बी हंगामात बळीराजाचे अतोनात हाल झाले होते. जी पिके घेतली, त्याला भाव न मिळाल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला होता. त्यात कोरोना साथीच्या रोगाने थैमान घातल्याने ग्रामीण भागातील बळीराजाची अवस्था ‘न घरका न घाटका’ अशी झाली होती.परंतु या परिस्थितीचा सामना करीत त्याने खरीप हंगामासाठी उरलेल्या भांडवलावर सुरुवात केली. परंतु अगोदर चांगला पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने नजरा आकाशाकडे लागल्याहोत्या. परंतु आषाढी एकादशीनंतर पांडुरंगाला घातलेले पावसासाठीचे साकडे खरे ठरले व दुबार पेरणीचे संकट टळले. आता उगवण झालेल्या पिकाची पेरणी नंतरची कामे करण्यात शेतकरी सध्या मग्न आहेत. चार ते पाच दिवसांपासून पावसामुळे शेतीकामे जोरात सुरू आहे. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरीवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.----------------दिवसाआड दुकाने उघडत असल्याने खतांसाठी धावपळ...दिंडोरी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे शासनाने लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे दिवसाआड खतांची दुकाने उघडण्यात येतात. त्यामुळे आगाऊ नोंदणी करून खते खरेदी करावी लागतात. शेतकरीवर्गाचा वेळ वाया जात आहे. अशा अनेक संकटाचा सामना करीत बळीराजा खरीप हंगामातील पिकांवर आशा ठेवून आहे. रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीची भर खरीप हंगामातील पिके भरून काढतील. या दृष्टीने शेतकऱ्यांकडून नियोजन आखले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक