शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीचे संकट टळले; बळीराजा शेतीकामात व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:30 IST

लखमापूर : परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले असून, शेतकरीवर्ग आता पेरणीनंतरच्या शेतीकामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. तीन आठवड्यापूर्वी पावसाने ओढ दिल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी पांडुरंगाला साकडे घातले होते.

लखमापूर : परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले असून, शेतकरीवर्ग आता पेरणीनंतरच्या शेतीकामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. तीन आठवड्यापूर्वी पावसाने ओढ दिल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी पांडुरंगाला साकडे घातले होते. त्यानुसार लखमापूर, म्हेळुसके, ओझे, दहेगाव, वागळुद, परमोरी, ओझरखेड, करंजवण, अवनखेड, कादवा म्हाळुंगी आदी भागात पावसाने दमदार हजेरी लावली. शेतकरीवर्गाने मशागत पूर्वकामे करून सोयाबीन, भुईमूग, भात व इतर पिकांची पेरणी केल्यानंतर पावसाने या पिकांना आधार दिला आहे. त्यामुळे आता बळीराजांची कोळपणी, निंदणी, पिकांना खत घालण्याच्या कामात लगीनघाई सुरू झाली आहे.रब्बी हंगामात बळीराजाचे अतोनात हाल झाले होते. जी पिके घेतली, त्याला भाव न मिळाल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला होता. त्यात कोरोना साथीच्या रोगाने थैमान घातल्याने ग्रामीण भागातील बळीराजाची अवस्था ‘न घरका न घाटका’ अशी झाली होती.परंतु या परिस्थितीचा सामना करीत त्याने खरीप हंगामासाठी उरलेल्या भांडवलावर सुरुवात केली. परंतु अगोदर चांगला पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने नजरा आकाशाकडे लागल्याहोत्या. परंतु आषाढी एकादशीनंतर पांडुरंगाला घातलेले पावसासाठीचे साकडे खरे ठरले व दुबार पेरणीचे संकट टळले. आता उगवण झालेल्या पिकाची पेरणी नंतरची कामे करण्यात शेतकरी सध्या मग्न आहेत. चार ते पाच दिवसांपासून पावसामुळे शेतीकामे जोरात सुरू आहे. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरीवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.----------------दिवसाआड दुकाने उघडत असल्याने खतांसाठी धावपळ...दिंडोरी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे शासनाने लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे दिवसाआड खतांची दुकाने उघडण्यात येतात. त्यामुळे आगाऊ नोंदणी करून खते खरेदी करावी लागतात. शेतकरीवर्गाचा वेळ वाया जात आहे. अशा अनेक संकटाचा सामना करीत बळीराजा खरीप हंगामातील पिकांवर आशा ठेवून आहे. रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीची भर खरीप हंगामातील पिके भरून काढतील. या दृष्टीने शेतकऱ्यांकडून नियोजन आखले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक