शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

आंदोलकांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:50 IST

घोटी : जमावबंदीचे उल्लंघन घोटी : घोटी बाजार समितीने घेतलेल्या भाजीपाला विक्री केंद्राच्या स्थलांतराच्या निर्णयाच्या विरोधात शनिवारी करण्यात आलेल्या मुंबई- नाशिक महामार्गावरील रास्ता रोको आंदोलनाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, कोणतीही पूर्वसूचना न देता जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देभाजीपाला विक्री केंद्राचे स्थलांतर केल्याने शनिवारी तालुक्यातील शेतकरी संतप्त अंतिम तोडगा निघणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

घोटी : जमावबंदीचे उल्लंघन घोटी : घोटी बाजार समितीने घेतलेल्या भाजीपाला विक्री केंद्राच्या स्थलांतराच्या निर्णयाच्या विरोधात शनिवारी करण्यात आलेल्या मुंबई- नाशिक महामार्गावरील रास्ता रोको आंदोलनाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, कोणतीही पूर्वसूचना न देता जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.घोटी बाजार समितीने शेतकºयांना विश्वासात न घेता भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेत भाजीपाला विक्री केंद्राचे स्थलांतर केल्याने शनिवारी तालुक्यातील शेतकरी संतप्त झाला होता. या शेतकºयांनी संघटित होत शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-आग्रा महामार्गावर आपला शेतमाल फेकून देत, रस्त्यावर ठिय्या मांडीत तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करीत महामार्ग रोखून धरला होता. यामुळे अनेक वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल झाले होते. या बाबीची गंभीर दखल पोलीस यंत्रणेने घेतली असून, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पांडुरंग शिंदे यांच्यासह भास्कर गुंजाळ, बाळासाहेब धुमाळ आदींसह शेकडो अज्ञात शेतकºयांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.बैठकीकडे लक्षघोटी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजार समिती आवारात भाजीपालाविक्र ीसाठी येणाºया शेतकºयांच्या वाहनांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत असल्याने शेतमालाचा काही माल शहराच्या बाहेर विक्र ी करण्याच्या उद्देशाने बाजार समितीने शहराबाहेर जागा भाडेतत्त्वावर घेत या जागेत भाजीपाला केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.या ठिकाणी सुविधा नसल्याने शेतकरी आक्र मक होत त्यांनी आंदोलन केले होते. याबाबत शेतकरी प्रतिनिधी आणि बाजार समिती पदाधिकारी, पोलीस प्रशासन यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक होत असून, या बैठकीत अंतिम तोडगा निघणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.