शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

मनपाच्या प्रभाग कार्यालयात वाद घालणाऱ्यावर गुन्हा

By admin | Updated: February 10, 2016 00:10 IST

मनपाच्या प्रभाग कार्यालयात वाद घालणाऱ्यावर गुन्हा

मालेगाव : येथील महापालिकेच्या मोसमपूल प्रभाग कार्यालयात दिलेल्या अर्जावर कारवाई करावी, या मागणीसाठी वाद घालणाऱ्या राजेंद्र सूर्यवंशी यांच्यावर येथील छावणी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे यांनी तक्रार दिली. या प्रकरणी सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार मनपाने सूर्यवंशी आज सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास प्रभाग कार्यालयात आले. दिलेल्या तक्रार अर्जावर काय कारवाई झाली, असे त्यांनी विचारले असता त्यांना अनधिकृत नळ मोहीम व अतिक्रमण मोहीम यामुळे पुढील कारवाई प्रलंबित आहे, असे सांगितले. त्यांनी आजच्या आज कारवाई करावी, अशी मागणी केली असता त्यांना आयुक्तांच्या आदेशाने सुरू असलेल्या मोहिमेसाठी जाणे आवश्यक असल्याचे सांगितले म्हणून त्यांनी वाद घातला. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सूर्यवंशी यांनी परवानगी न घेताच लॉन्स बांधकाम केले आहे. याविरोधात परिसरातील रहिवाशांनी हे काम पाडण्याची मागणी तक्रारी अर्ज दिला होता. त्यावर त्यांना हे बांधकाम २४ तासात पाडण्याची नोटीस काही महिन्यांपूर्वी दिली होती. त्यावर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ न्यायालयात दावा दाखल केला आहे. दरम्यान, सूर्यवंशी यांनी या नागरिकांविरोधात रहिवाशांचे अनधिकृत बांधकाम असल्याचा अर्ज ३ डिसेंबर रोजी प्रभाग कार्यालयात दिला होता. हा अर्ज ९ डिसेंबरला नगररचना विभागाकडे पाठवून अहवाल मागविण्यात आला आहे. यावर नगररचना विभागाने १२ जानेवारीला अहवाल दिला आहे.या अहवालाप्रमाणे या रहिवाशांना काही भाग अनधिकृत असल्याने २०७ प्रमाणे नोटीस देण्याचे काम बाकी आहे. सूर्यवंशी यांनी यापूर्वी त्यांच्या बाजार समितीच्या गाळ्याचे अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पथकाबरोबरही वाद घालत इतरांना फूस दिल्याचे सोनवणे यांनी सांगितले.महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर नेहमीच दादागिरी केली जात असते. यात राजकीय पक्षाबरोबरच अराजकीय व्यक्तींचा समावेश आहे. याविषयी कोणतीही कडक कारवाई केली जात नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. यात काहीवेळा अधिकाऱ्यांच्याही चुका असतात हा भाग अपवाद सोडल्यास अनेकवेळा अनधिकृत कामासाठी काही अधिकारी राजी नसल्यास त्यांना शिवीगाळ करणे दमबाजी करणे हे प्रकार नित्याचेच आहेत. यातील उदाहरण म्हणजे येथील शासनाचे नगररचनाकार यांना शिवीगाळ केल्याने त्यांनी अनेक दिवस रजेवर राहणे पसंत केले होते. तसेच येथील विद्युत विभागात केलेल्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली असता तत्कालीन आयुक्तांनी ती नाकारली आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी काम करण्यास टाळाटाळ करतात. (प्रतिनिधी)