शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानाची वर्गवारी तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 01:50 IST

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडून दुसºया टप्प्यातील ३९६ कोटींचे अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, भरपाईच्या निकषानुसार तालुकानिहाय अनुदान वाटपाची वर्गवारी तयार करण्यात आली आहे.

नाशिक : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडून दुसºया टप्प्यातील ३९६ कोटींचे अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, भरपाईच्या निकषानुसार तालुकानिहाय अनुदान वाटपाची वर्गवारी तयार करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत शेतकºयांच्या खात्यात दुसºया टप्प्यातील अनुदान जमा होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, प्रशासनाने केलेल्या सुधारित मागणीनुसार जिल्ह्यातील शेतकºयांसाठी आता केवळ २० लाखांचे अनुदान शिल्लक राहणार असून, तेही लवकरच प्राप्त होणार आहे.आॅक्टोबर, नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील संपूर्ण पिकांचे नुकसान झाले तर साडेसहा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सदर नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्यानंतर प्रशासनाने शासनाला ५७३ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव पाठविला होता. परंतु नुकसानीची तीव्रता मोठी असल्याने ५९७ कोटींच्या  सुधारित अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नोंदविली होती. त्यानुसार पंधरा दिवसांपूर्वीच अनुदानाच्या पहिल्या टप्प्यातील १८१ कोटी ५० लाखांचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले होते.शेतीसाठी आठ हजार प्रती हेक्टरी तर बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये प्रती हेक्टरी याप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार या निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून शेतकºयांना मदत निधीचे वाटप करण्यात आले. सुमारे अडीच लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली.दुसºया टप्प्यातील सुमारे ३९६ कोटी ६२ लाखांचे अनुदान प्राप्त झाल्याने उर्वरित शेतकºयांना अनुदानाचे वाटप केले जाणार आहे.पहिल्या टप्प्यात अनुदान शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी काहीसा विलंब झाला होता. परंतु आता बाधित शेतकरी आणि पिकांची माहिती हाती असल्याने दुसºया टप्प्यातील अनुदान वाटप सुलभ होणार आहे. त्यामुळे दुसºया टप्प्यातील अनुदान लवकरच शेतकºयांच्या हाती पडणार आहे. प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांच्या स्वाक्षरीनंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.केवळ २० लाखांचे अनुदान शिल्लकजिल्ह्यातील नुकसानभरपाईसाठी पहिल्या आणि दुसºया टप्प्यातील अनुदान प्राप्त झाल्यानंतर सुधारित मागणी केल्यानुसार आता केवळ १९७८ लाखांचे अनुदान प्राप्त होणे बाकी आहे. दुसºया टप्प्यातील अनुदानाचे वाटप झाल्यानंतर उर्वरित अनुदानही लवकरच जिल्ह्याला प्राप्त होऊन त्याचेही वाटप शेतकºयांना करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १८१ आणि दुसºया टप्प्यात ३९६ कोटींचे अनुदान जिल्ह्यातील शेतकºयांसाठी प्राप्त झाल्याने जिल्ह्याला पुरेपूर अनुदान प्राप्त झाले आहे.तालुकानिहाय मदतनिधी (लाखात)मालेगाव ७०२९.६३बागलाण ४२७४.३७नांदगाव ३०१८.७७कळवण १६१२.०३दिंडोरी २३६४.५१देवळा १८९०.०२सुरगाणा १३५१.०६नाशिक १००९.३६इगतपुरी ८७७.४९पेठ ७८९.८३त्र्यंबकेश्वर ४४२.६०निफाड ४८६०.०४चांदवड ३३५३.७३येवला ३३०५.५३सिन्नर ३४८३.४५एकूण ३९६६२.४५

 

 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरी