शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शहरातील एटीएममध्ये खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 00:20 IST

ऐन दिवाळ सणात बँकांना सलग तीन दिवस सुटी आसल्याने नाशिकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून, खात्यावर पैसे असतानाही रोखीचे व्यवहार करण्यासाठी हातात पैसे नसल्याने नाशिकरांना निराशा पत्करावी लागल्याचे रविवारी (दि.१५) दिसून आले.

ठळक मुद्देग्राहकांची नाराजी : बँकांच्या सलग तीन सुट्यांमुळे गैरसोय

नाशिक : ऐन दिवाळ सणात बँकांना सलग तीन दिवस सुटी आसल्याने नाशिकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून, खात्यावर पैसे असतानाही रोखीचे व्यवहार करण्यासाठी हातात पैसे नसल्याने नाशिकरांना निराशा पत्करावी लागल्याचे रविवारी (दि.१५) दिसून आले.

दिवाळीतील लक्ष्मीपूजनासाठी शनिवारी (दि.१४) नाशिकरांनी शहरातील विविध एटीएममधून रोख रक्कम काढल्याने रविवारी बहुतांश एटीएममध्ये खडखडाट पाहायला मिळाला. डेबिट, क्रेडिट कार्ड, मोबाइल ॲपचा वापर करू न शकणाऱ्या सामान्य ग्राहकांना खात्यावर पैसे असूनही ते तीन दिवस मिळणार नसल्याने ऐन दिवाळी उसणवारीचे व्यवहार करावे लागले. यावर्षी लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज या दोन तिथींमध्ये एक दिवस मिळाल्याने त्याचा नाशिककरांनी खरेदीसाठी लाभ घेतला. परंतु अनेक छोट्या-मोठ्या व्यवहारांमध्ये रोख रकमेअभावी ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागला. हीच परिस्थिती सोमवारीही कायम राहणार असल्याने खिशात रोख रक्कम नाही आणि ऑनलाइन अथवा मोबाइल ॲपद्वारे व्यवहार करू न शकणाऱ्या ग्राकांची गैरसोयच होण्यार आहे, दरम्यान, शनिवारी लक्ष्मीपूजून, रविवार आणि सोमवारची भाऊबीज अशा सलग तीन दिवस बँकांना सुटी आहे. या सलग सुट्यांचा ताण एटीएमवर पडला असून, वेळेवर पैसे उपलब्ध न झाल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

इन्फो-

 

एटीएम शोधाशोध

दिवाळी खरेदीसाठी अनेकांना रोख रक्कमेची गरज भासली. त्यामुळे अशा ग्राहकांना ऐनवेळी एटीएमची शोधाशोध करावी लागली. बहुतांश एटीएममध्ये रोख रक्कमच नसल्याने ग्राहकांची निराशा झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Nashikनाशिकbankबँक