शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

केळझर पाणीपुरवठा योजना रद्द करण्यास नगरसेवकांचा नकार

By admin | Updated: September 5, 2015 23:40 IST

सटाणा नपाच्या ठरावाविरुद्ध अपील : योजना पूर्ण करण्यासाठी साकडे

नाशिक : पूर्णत्वाच्या मार्गावर असलेली व सटाणा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्त ठरणारी केळझर पाणीपुरवठा योजना बंद करण्याबाबत सटाणा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने केलेला ठराव विखंडित करण्यात यावा, यासाठी बारा नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अपील दाखल केले आहे. नगरपालिकेच्या १९ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी नगरसेवकांनी केळझर पाणीपुरवठा योजना बंद करून त्याऐवजी नवीन पूनद प्रकल्प येथून पाणीपुरवठा योजना तयार करून त्यास मंजुरी द्यावी, असा ठराव मंजूर केला आहे. त्यास विरोध करून शुक्रवारी बारा नगरसेवकांनी जिल्हा-धिकाऱ्यांची भेट घेऊन नगरपालिकेच्या ठरावावर अपील दाखल केले. त्यात म्हटले आहे की, १९९८ साली युती सरकारच्या कार्यकाळात केळझर पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेंतर्गत शहरांतर्गत वितरण व्यवस्था, जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या इत्यादी कामे पूर्ण झालेली आहेत. या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च झालेला असून, लवकरच सटाणा शहरापर्यंत पाणी पोहोचेल, अशी परिस्थिती आहे. धरणालगत असलेल्या काही गावांनी या योजनेस विरोध केला असता मुंबई उच्च न्यायालयानेदेखील पोलीस बंदोबस्तात योजनेची कामे करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंत्याने सटाणा नगरपालिकेला पत्र देऊन केळझर पाणीपुरवठा योजनेऐवजी कळवण तालुक्यातील नवीन पूनद प्रकल्प येथून पाणीपुरवठा योजना तयार करावी, असे सुचविले. मुळात नवीन पूनद प्रकल्पातून नवीन योजना करण्यासाठी धरणाच्या पाण्यावर आरक्षण टाकण्यापासून सुरुवात करावी लागेल. त्याचबरोबर नवीन योजनेसाठी लागणारा खर्च कोण करेल, त्याचबरोबर केळझर योजनेसाठी केलेला खर्च वाया जाण्याबरोबरच दृष्टीपथात असलेले पाणी मिळू नये यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे केळझर पाणीपुरवठा योजना बंद करण्यासाठी करण्यात आलेला ठराव रद्द करण्यात येऊन ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणीही या अपिलात करण्यात आली आहे. या अपिलावर बाळासाहेब सोनवणे, साहेबराव सोनवणे, नलिनी सोनवणे, मनोज सोनवणे, सुशीला रौंदळ, सिंधूबाई सोनवणे, मंदाकिनी सोनवणे, सुमनबाई सोनवणे, उज्ज्वला सोनवणे, अनिल कुवर, अश्पाक शेख, रमणलाल छाजेड आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)