शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

मानोरी पाणी योजनेत भ्रष्टाचार

By admin | Updated: February 26, 2017 00:39 IST

निकृष्ट दर्जाचे काम : गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील मानोरी येथे आठ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या, परंतु अद्यापही पूर्णत्वास न आलेल्या भारत निर्माणच्या पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले असून, निकृष्ट दर्जाचे काम करून लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा निष्कर्ष पाणीपुरवठा विभागाने काढूनही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. यासंदर्भात मानोरी ग्रामस्थांकडून गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती पातळीवर पाठपुरावा सुरू असतानाही त्याकडे शासकीय यंत्रणेने सोयिस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. मानोरी गावासाठी भारत निर्माण योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना २००८ मध्ये मंजूर होऊन त्यासाठी साडेपंधरा लाख रुपये मंजूर करण्यात आले. निसर्ग या तांत्रिक सल्लागारामार्फत पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात आले व त्यासाठी ११ लाख ४३ हजार ३७२ रुपयांचा खर्च झाल्याचे सांगण्यात आले, परंतु व्हाऊचर क्रमांक ६, ८, १०, २२, २३, २४, २५, २६, २९, ३०, ३१ याची बिलेच जोडण्यात आलेली नाहीत, त्यामुळे या कामांवर करण्यात आलेल्या खर्चाबाबत संशय घेतला जात असून, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष नारायण रामचंद्र गिते यांनी स्वत:च्या व मुलगा अमोल याच्या नावे प्रत्येकी ५० हजार रुपये धनादेशाद्वारे काढून घेतल्याचेही उपलब्ध कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. याशिवाय पाणीपुरवठा योजनेचे काम करताना ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याची बाबही तांत्रिक तपासणीत स्पष्ट झाली आहे. निफाडच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या उपअभियंत्यांनी यासंदर्भात केलेल्या चौकशीत अनेक बाबींवर प्रकाशझोत टाकला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पाणीपुरवठा योजनेसाठी उंचावर बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, टाकीचे गॅलरी स्लॅब व रूफ स्लॅबचे लोखंडी बार दिसत असून, गंज लागून त्याची क्षमता कमी होत आहे. या टाकीची लोखंडी सिडी अतिशय धोकेदायक असून, सिडी दुरुस्ती करून मजबूत करण्यात यावी, तसेच योजनेत उद्भव विहिरीचे कामही करण्यात आलेले नसल्याने पाणीपुरवठा समितीने तत्काळ त्याची पूर्तता करावी, असे आदेशही देण्यात आले होते. तथापि, समितीने या आदेशाला केराची टोपली दाखविली. त्यामुळे शासनाची योजना अपूर्ण ठेवून शासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचा अपहार केल्याने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश जिल्हा परिषदेने मानोरी ग्रामसेवकाला दिले, परंतु अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही.