शहरं
Join us  
Trending Stories
1
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
2
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
3
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
4
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
5
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
6
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
7
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
8
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
9
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
10
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
11
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
12
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
13
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
14
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
15
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
16
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
17
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
18
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
19
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
20
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल

मानोरी पाणी योजनेत भ्रष्टाचार

By admin | Updated: February 26, 2017 00:39 IST

निकृष्ट दर्जाचे काम : गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील मानोरी येथे आठ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या, परंतु अद्यापही पूर्णत्वास न आलेल्या भारत निर्माणच्या पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले असून, निकृष्ट दर्जाचे काम करून लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा निष्कर्ष पाणीपुरवठा विभागाने काढूनही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. यासंदर्भात मानोरी ग्रामस्थांकडून गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती पातळीवर पाठपुरावा सुरू असतानाही त्याकडे शासकीय यंत्रणेने सोयिस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. मानोरी गावासाठी भारत निर्माण योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना २००८ मध्ये मंजूर होऊन त्यासाठी साडेपंधरा लाख रुपये मंजूर करण्यात आले. निसर्ग या तांत्रिक सल्लागारामार्फत पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात आले व त्यासाठी ११ लाख ४३ हजार ३७२ रुपयांचा खर्च झाल्याचे सांगण्यात आले, परंतु व्हाऊचर क्रमांक ६, ८, १०, २२, २३, २४, २५, २६, २९, ३०, ३१ याची बिलेच जोडण्यात आलेली नाहीत, त्यामुळे या कामांवर करण्यात आलेल्या खर्चाबाबत संशय घेतला जात असून, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष नारायण रामचंद्र गिते यांनी स्वत:च्या व मुलगा अमोल याच्या नावे प्रत्येकी ५० हजार रुपये धनादेशाद्वारे काढून घेतल्याचेही उपलब्ध कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. याशिवाय पाणीपुरवठा योजनेचे काम करताना ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याची बाबही तांत्रिक तपासणीत स्पष्ट झाली आहे. निफाडच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या उपअभियंत्यांनी यासंदर्भात केलेल्या चौकशीत अनेक बाबींवर प्रकाशझोत टाकला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पाणीपुरवठा योजनेसाठी उंचावर बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, टाकीचे गॅलरी स्लॅब व रूफ स्लॅबचे लोखंडी बार दिसत असून, गंज लागून त्याची क्षमता कमी होत आहे. या टाकीची लोखंडी सिडी अतिशय धोकेदायक असून, सिडी दुरुस्ती करून मजबूत करण्यात यावी, तसेच योजनेत उद्भव विहिरीचे कामही करण्यात आलेले नसल्याने पाणीपुरवठा समितीने तत्काळ त्याची पूर्तता करावी, असे आदेशही देण्यात आले होते. तथापि, समितीने या आदेशाला केराची टोपली दाखविली. त्यामुळे शासनाची योजना अपूर्ण ठेवून शासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचा अपहार केल्याने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश जिल्हा परिषदेने मानोरी ग्रामसेवकाला दिले, परंतु अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही.