शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार, पक्षांतर अन् घराणेशाहीला थारा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 00:40 IST

सध्या खिचडीछाप राजकारण झालेले आहे. लोकप्रतिनिधींमध्ये निष्ठा राहिलेली नाही. भ्रष्टाचार लपविण्यासाठी नेते पक्षांतर करीत आहेत. म्हणून एकदा निवडून दिल्यानंतर दुसऱ्यांदा दुसºया नवीन लोकांना संधी दिली पाहिजे.

वेळ : सायंकाळी ६.३० वाजता.स्थळ : सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघसातपूर : सध्या खिचडीछाप राजकारण झालेले आहे. लोकप्रतिनिधींमध्ये निष्ठा राहिलेली नाही. भ्रष्टाचार लपविण्यासाठी नेते पक्षांतर करीत आहेत. म्हणून एकदा निवडून दिल्यानंतर दुसऱ्यांदा दुसºया नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. घराणेशाहीला थारा देऊ नये. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी स्वत:चे वेतन एका झटक्यात वाढवून घेतात आणि ज्येष्ठ पेन्शनर्स लोकांना पेन्शन वाढावी, वर्षानुवर्षे सरकारकडे पाठपुरावा करावा लागत आहे. याची लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे. अशी संतप्त भावना सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केल्या आहेत.विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने चौकाचौकांत, कट्ट्यांवर राजकारणाच्या गप्पा टप्पा सुरू झाल्या आहेत. सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात चाललेल्या गप्पांचा घेतलेला वेध घेतला, त्यावेळी ज्येष्ठ नागरिक पूर्वीच्या निवडणुका आणि आताच्या निवडणुका यात जमीन आसमानचा फरक आहे. त्याकाळी उमेदवाराच्या मागे सच्चे कार्यकर्ते असत. सध्या पैशांच्या जोरावर मते मिळविली जात आहेत. जमविलेली संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी आणि भ्रष्टाचार लपविण्यासाठी नेते पक्षांतर करीत आहेत. अशा लोकांना उमेदवारी देऊ नये, दिलीच तर मतदान करू नये. पूर्वीच्या काळी निवडणुकीत मतदारांविषयी आदर होता. आता त्यात व्यावसायिकता आली आहे. अशा भावना सातपूर कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकांच्या आहेत.(या चर्चेत किसनराव खताळे, शांताराम पाटील, पांडुरंग गोटीवाले, बाबाजी सोनवणे, हिंमतराव जगताप, सखाराम शिरसाठ, बाबूलाल तिवारी, सुरेश पवार, आर. एल. एखंडे, विश्वनाथ भंदुरे, बी. ई. बागुल, सोमनाथ ठाकरे, नरेंद्र पुणतांबेकर यांसह ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.)आपण निवडून दिलेल्या आमदार-खासदारांनी नागरिकांची कामे केली पाहिजेत. मतदारसंघाचा विकास केला पाहिजे. लोकांच्या सुख-दु:खात सहभागी झाले पाहिजे. आम्ही आयुष्यभर नोकरी करतो तेव्हा आम्हाला पेन्शन मिळते. आमदार-खासदार कोणती नोकरी करतात? ते नोकरदार नाहीत तर लोकसेवक आहेत. त्यामुळे त्यांना पेन्शन का दिली जाते? आमदार-खासदारांची पेन्शन बंद करा या मागणीसाठी आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण