शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

रस्त्यांसह सूचना फलकांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:29 PM

निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांसह रस्त्यांवरील सूचना फलकांचीही दुरवस्था झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता प्रशासनाच्या कारभारावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. याच भागातील राजकीय पुढाऱ्यांनी वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजूनही परिसरातील रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने परिसरातून नाराजीचा सूर उमटत आहे.

ठळक मुद्देनिफाड : दुरुस्ती केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी

निफाड : तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांसह रस्त्यांवरील सूचना फलकांचीही दुरवस्था झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता प्रशासनाच्या कारभारावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. याच भागातील राजकीय पुढाऱ्यांनी वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजूनही परिसरातील रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने परिसरातून नाराजीचा सूर उमटत आहे.या भागातील रस्त्यांसह रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या विविध सूचना फलकांचीदेखील मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. जेथे वळण रस्ता आहे, त्या रस्त्याची माहिती देणाºया दिशादर्शक फलकानेसुद्धा रस्त्याप्रमाणे वळण घेतलेले आहे. ‘पुढे अपघाती वळण आहे, वाहने सावकाश चालवा’ अशाप्रकारे वाहनचालकांला पुढील अपघाती वळणाची माहिती देणारे फलक पूर्णत: वाकून गेल्याने दिसून येत नाहीत. फलकाकडे बघून असे वाटते की हा फलक आपल्याला सुचवित आहे की पुढे येणाºया रस्त्याची अवस्था ही माझ्यासारखीच वळणाकृती झालेली असून वाहने सावकाश चालवा. तसेच ‘डू नॉट ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ अशी माहिती देणारे फलक तर उलटेच झालेले आहेत, जणूकाही बोर्ड दारू पिऊन उलटा झालेला आहे. नाशिक-औरंगाबाद हायवेच्या बाजूला लावण्यात आलेल्या फलकांची अवस्था अशीच आहे. नाशिक-औरंगाबाद महामार्गा वरील नैताळे येथील अपघाती वळणाची माहिती देणारा फलक तेथील बांबू व्यावसायिकांनी फलकाच्या बाजूला बांबूंची थप्पी लावून पूर्णता झाकवलेला आहे. फलकाच्या बाजूने लावलेल्या बांबूच्या थप्पीमुळे तेथील अपघाती वळणाची माहिती देणारा फलकाचा फक्त १० टक्के भाग उघडा आहे. बºयाच ठिकाणी रस्त्याच्या कडेला आणि रस्ता दुभाजक यांवरील सूचना फलकच गायब झालेले असून, फक्त फलकांसाठी लावण्यात आलेले खांब उभे आहेत. अपघाताची माहिती देणारे बोर्ड काढून नेले आहेत.ग्रामीण भागातील रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आलेले दिशादर्शक फलक आणि गावाचे नाव, गावाचे अंतर दर्शविणाºया फलकांवर सध्या जाहिरातींनी अतिक्रमण केले आहे. परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि फलकांची मरणासन्न अवस्था याबाबत सा.बां. विभागास कळवूनही याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.- विजय गिते, मा. उपसरपंच, खेडलेझुंगेरस्त्याच्या कडेला शेतमाल आणि फळफळावळ विक्र ी करणाºया शेतकरी, व्यापारी वर्गाला रस्ता ना दुरुस्त असल्यामुळे अडचण निर्माण होते. सुरक्षित जागा मिळण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे.- सदाभाऊ कोटकर, सामाजिक कार्यकर्ता, नैताळे

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागGovernmentसरकार