शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

नगरसेवक संतप्त : पूर्व विभागातील पाणीप्रश्नावर चर्चा अतिक्रमणे हटविली जात नाहीत मग प्रभाग समित्या कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:52 IST

इंदिरानगर : अतिक्रमणे हटविली जात नाहीत आणि पाणीप्रश्न निकालात निघत नसल्याने महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. महापौर व आयुक्तांकडे तक्रार केल्यावरच कामे होत असतील तर प्रभाग सभा काय उपयोगाच्या आहेत, असा प्रश्नही सदस्यांनी केला.

ठळक मुद्देदगड आणि माती-सीमेंटचा मलबा तसाचअनधिकृत झोपड्या व टपºया वाढल्या

इंदिरानगर : अतिक्रमणे हटविली जात नाहीत आणि पाणीप्रश्न निकालात निघत नसल्याने महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. महापौर व आयुक्तांकडे तक्रार केल्यावरच कामे होत असतील तर प्रभाग सभा काय उपयोगाच्या आहेत, असा प्रश्नही सदस्यांनी केला.पूर्व प्रभाग सभा सभापती शाहीन मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रभाग ३० मधील वडाळागावातील १०० फुटी रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरणाºया अनधिकृत झोपड्या काढल्या, परंतु अद्यापही दगड आणि माती-सीमेंटचा मलबा तसाच आहे, अशी तक्रार डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केली. तसेच महापालिकेच्या आरक्षित जागेवर तातडीने संरक्षक भिंत बांधावी अन्यथा अतिक्रमण पुन्हा होईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले. वडाळागावातील जसे अतिक्रमण काढले तसेच राजीवनगर झोपडपट्टीलगतच्या १०० फुटी रस्त्याच्या पदपथावर दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या व टपºया वाढल्या आहेत त्या तातडीने काढाव्या, अशी सूचना सतीश सोनवणे यांनी केली. शंभर फुटी रस्ता, राजीवनगर झोपडपट्टी केव्हा श्वास घेईल, असा प्रश्नही सोनवणे यांनी केला. महापौर व आयुक्तांकडे तक्रार केली तर लगेच कामे होतात; प्रभाग सभेत नागरिकांच्या समस्या पोटतिडकीने सांगूनही कामे होत नाहीत, अशी तक्रार बडोदे यांनी केली. वडाळागावातील अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी संथगतीने कामे सुरू आहेत, असे बडोदे म्हणाले. तसेच वडाळागावातील अतिक्रमण काढण्यापूर्वी तेथील नळजोडणीचे नियोजन न केल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. तसेच परिसरात काही ठिकाणी पाणीपुरवठाही बंद झाल्याची तक्रार सुप्रिया खोडे यांनी केली. तसेच गावातील शौचालयामधील घाण रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे खोडे यांनी सांगितले. सावरकर उद्यानाची देखभालीअभावी दयनीय अवस्था झाल्याची तक्रार अजिंक्य साने यांनी केली. तसेच जॉगिंग ट्रॅक येथील धार्मिक स्थळ काढले परंतु अद्यापही तेथील मलबा उचलण्यात आलेला नाही. तसेच रस्त्यांचे कामही सुरू केलेले नाही, असे साने यांनी सांगितले. यावेळी सुमारे ३३ लाखांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली.