शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

नगरसेवक संतप्त : पूर्व विभागातील पाणीप्रश्नावर चर्चा अतिक्रमणे हटविली जात नाहीत मग प्रभाग समित्या कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:52 IST

इंदिरानगर : अतिक्रमणे हटविली जात नाहीत आणि पाणीप्रश्न निकालात निघत नसल्याने महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. महापौर व आयुक्तांकडे तक्रार केल्यावरच कामे होत असतील तर प्रभाग सभा काय उपयोगाच्या आहेत, असा प्रश्नही सदस्यांनी केला.

ठळक मुद्देदगड आणि माती-सीमेंटचा मलबा तसाचअनधिकृत झोपड्या व टपºया वाढल्या

इंदिरानगर : अतिक्रमणे हटविली जात नाहीत आणि पाणीप्रश्न निकालात निघत नसल्याने महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. महापौर व आयुक्तांकडे तक्रार केल्यावरच कामे होत असतील तर प्रभाग सभा काय उपयोगाच्या आहेत, असा प्रश्नही सदस्यांनी केला.पूर्व प्रभाग सभा सभापती शाहीन मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रभाग ३० मधील वडाळागावातील १०० फुटी रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरणाºया अनधिकृत झोपड्या काढल्या, परंतु अद्यापही दगड आणि माती-सीमेंटचा मलबा तसाच आहे, अशी तक्रार डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केली. तसेच महापालिकेच्या आरक्षित जागेवर तातडीने संरक्षक भिंत बांधावी अन्यथा अतिक्रमण पुन्हा होईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले. वडाळागावातील जसे अतिक्रमण काढले तसेच राजीवनगर झोपडपट्टीलगतच्या १०० फुटी रस्त्याच्या पदपथावर दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या व टपºया वाढल्या आहेत त्या तातडीने काढाव्या, अशी सूचना सतीश सोनवणे यांनी केली. शंभर फुटी रस्ता, राजीवनगर झोपडपट्टी केव्हा श्वास घेईल, असा प्रश्नही सोनवणे यांनी केला. महापौर व आयुक्तांकडे तक्रार केली तर लगेच कामे होतात; प्रभाग सभेत नागरिकांच्या समस्या पोटतिडकीने सांगूनही कामे होत नाहीत, अशी तक्रार बडोदे यांनी केली. वडाळागावातील अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी संथगतीने कामे सुरू आहेत, असे बडोदे म्हणाले. तसेच वडाळागावातील अतिक्रमण काढण्यापूर्वी तेथील नळजोडणीचे नियोजन न केल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. तसेच परिसरात काही ठिकाणी पाणीपुरवठाही बंद झाल्याची तक्रार सुप्रिया खोडे यांनी केली. तसेच गावातील शौचालयामधील घाण रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे खोडे यांनी सांगितले. सावरकर उद्यानाची देखभालीअभावी दयनीय अवस्था झाल्याची तक्रार अजिंक्य साने यांनी केली. तसेच जॉगिंग ट्रॅक येथील धार्मिक स्थळ काढले परंतु अद्यापही तेथील मलबा उचलण्यात आलेला नाही. तसेच रस्त्यांचे कामही सुरू केलेले नाही, असे साने यांनी सांगितले. यावेळी सुमारे ३३ लाखांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली.