शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

मनपाच्या अंगणवाडी पोषण आहाराच्या निविदेला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:37 IST

नाशिक : महापालिकेच्या अंगणवाड्या सुरू झाल्या नसल्या तरी मुलांना पोषण आहार पुरविण्यावरून आतापासूनच वाद सुरू झाला आहे. विशिष्ट बचत ...

नाशिक : महापालिकेच्या अंगणवाड्या सुरू झाल्या नसल्या तरी मुलांना पोषण आहार पुरविण्यावरून आतापासूनच वाद सुरू झाला आहे. विशिष्ट बचत गटांच्या सोयीसाठी त्यात अटी व शर्ती असल्याचा आक्षेप महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती भामरे यांनी घेतला असून, त्यामुळे पुढील प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.

पोषण आहार पुरवठ्यासाठी निकोप स्पर्धा व्हावी, यावर सभापतींचा आक्षेप असून, त्यामुळेच ही प्रक्रिया थांबविताना आता शहरात मोठ्या प्रमाणात महिलांचे बचतगट असून, ते निविदेसाठी कशाप्रकारे पात्र ठरतात याबाबत अटी, शर्ती त्यांना समजाव्यात आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून महिला सज्ज राहाव्यात यासाठी संपूर्ण शहरात महिलांचे मेळावे घेण्यात येणार असून, त्यानंतरच पोषण आहारासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत, असे सभापती भामरे यांचे म्हणणे आहे.

महापालिकेच्या अंगणवाड्या या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांसाठी उघडण्यात आल्या आहेत. सुमारे साडेचारशे अंगणवाड्या असून, त्यातील काही अंगणवाड्या आयुक्त तुकाराम मुुंडे यांनी आपल्या कारकिर्दीत बंद केल्या होत्या. त्यातील बऱ्याच अंगणवाड्या आता नंतर नियम शिथील करून सुरू करण्यात आल्या आहेत. या अंगणवाड्यांमधील खाऊ किंवा सकस आहार हा कायम वादाचा मुद्दा असतो. बचत गटांना काम देण्यात येत असले तरी गेल्या काही वर्षांपासून त्याच त्याच बचत गटांना कामे मिळतात. विशिष्ट राजकीय नेत्यांशी संबंधित या बचत गटांना काम मिळत असल्याने अन्य बचत गटांना संधी मिळत नाही. त्यामुळे सुमारे एक कोटी रुपये खर्चाचा हा ठेका काढण्यात आला; परंतु त्यानंतर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदाची निवडणूक झाली. सभापतीपदी भाजपच्या स्वाती भामरे यांची निवड झाली. त्यामुळे भामरे यांनी आयुक्तांकडे आक्षेप नोंदवून या संदर्भातील प्रक्रिया स्थगित केली आहे.

इन्फो... आधी शहरातील सर्व बचत गटांना माहिती देणार

कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय संस्थेत निविदा भरायच्या असतील तर त्यासाठी बचत गटाची नोंदणी आवश्यक आहे. पॅनकार्ड, शॉप ॲक्ट, अन्न परवाना आणि बँकेत खाते असणे आवश्यक असून, अशा अनेक तपशीलांची माहिती महिलांना नसते. त्यामुळेच महिला निविदा भरू शकत नाहीत. शहरात सहाही विभागात महिलांचे मेळावे भरवून बचत गटांना तसेच असे गट करू इच्छिणाऱ्या महिलांना याबाबत जागृत करून मगच निविदा काढण्यात येणार आहे.

इन्फो.. महापालिकेच्या अंगणवाड्या केव्हा सुरू करायच्या, याबाबत कोणतेही निर्देश नाहीत. त्यामुळे इतक्या घाईघाईने निविदा काढण्याची गरज का भासली, हादेखील वादाचा विषय असून, त्यामुळेच सभापती भामरे यांनी शंका उपस्थित केली आहे.