शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

कोरोनाची धास्ती, विद्यार्थ्यांची घटली उपस्थिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:52 IST

पिंपळगाव बसवंत : आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीचा परिणाम शाळांच्या उपस्थितीवर जाणवायला लागला असून, ४० टक्के उपस्थिती घटली असल्याची परिस्थिती शाळांमध्ये दिसून येत आहे. प्रशासनाने शाळा बंदचे कोणतेही आदेश दिले नाहीत. मात्र, पालकवर्गाकडून आपल्या पाल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेत शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला जात आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील वास्तव : पालकांकडूनच खबरदारीचा उपाय

पिंपळगाव बसवंत : आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीचा परिणाम शाळांच्या उपस्थितीवर जाणवायला लागला असून, ४० टक्के उपस्थिती घटली असल्याची परिस्थिती शाळांमध्ये दिसून येत आहे. प्रशासनाने शाळा बंदचे कोणतेही आदेश दिले नाहीत. मात्र, पालकवर्गाकडून आपल्या पाल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेत शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला जात आहे.राज्यात करोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताच शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावी आणि दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू केल्या. १५ फेब्रुवारीपासून शहरातील महाविद्यालयेही सुरू करण्यात आली. मात्र, महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी सध्यातरी पाठ फिरवली आहे. याउलट ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांतील उपस्थिती समाधानकारक आहे. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने शाळा प्रशासन आणि पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.                                            याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर दिसत आहे. त्यामुळे काही शाळांनी तोंडी सूचना देत विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. शाळेतील एखादा विद्यार्थी किंवा त्याच्या परिवारातील व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारात्मक असल्यास पूर्ण शाळाच बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळा प्रशासन खबरदारी म्हणून आपला मोर्चा पुन्हा ऑनलाइन वर्गाकडे वळवेल, असे वातावरण सध्यातरी निर्माण होताना दिसत आहे.                               मात्र, रुग्ण वाढू नयेत व आपण आणि आपली शाळा सुरक्षित राहावी यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थांनी शासनाने नमूद केलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे; अन्यथा पुन्हा शाळा ओस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण शाळा सुरक्षित राहावी यासाठी शाळा प्रशासनाकडून शासनाने नमूद केलेल्या कोरोना नियमांचे काटेकोरपणे नियम पाळले जात आहेत. त्यात शाळा, वर्गखोल्या स्प्रे मारून सॅनिटाइझ करणे, माक्सचा नियमित वापर करणे, फिजिकल डिस्टन्स ठेवणे आदी सुरक्षितता राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर भर दिला जात आहे. पालकांनीही घाबरून न जाता आपल्या मुलाला कोरोनाचे नियम व्यवस्थित समजावून ते अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा