शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची धास्ती, विद्यार्थ्यांची घटली उपस्थिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:52 IST

पिंपळगाव बसवंत : आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीचा परिणाम शाळांच्या उपस्थितीवर जाणवायला लागला असून, ४० टक्के उपस्थिती घटली असल्याची परिस्थिती शाळांमध्ये दिसून येत आहे. प्रशासनाने शाळा बंदचे कोणतेही आदेश दिले नाहीत. मात्र, पालकवर्गाकडून आपल्या पाल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेत शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला जात आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील वास्तव : पालकांकडूनच खबरदारीचा उपाय

पिंपळगाव बसवंत : आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीचा परिणाम शाळांच्या उपस्थितीवर जाणवायला लागला असून, ४० टक्के उपस्थिती घटली असल्याची परिस्थिती शाळांमध्ये दिसून येत आहे. प्रशासनाने शाळा बंदचे कोणतेही आदेश दिले नाहीत. मात्र, पालकवर्गाकडून आपल्या पाल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेत शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला जात आहे.राज्यात करोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताच शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावी आणि दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू केल्या. १५ फेब्रुवारीपासून शहरातील महाविद्यालयेही सुरू करण्यात आली. मात्र, महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी सध्यातरी पाठ फिरवली आहे. याउलट ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांतील उपस्थिती समाधानकारक आहे. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने शाळा प्रशासन आणि पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.                                            याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर दिसत आहे. त्यामुळे काही शाळांनी तोंडी सूचना देत विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. शाळेतील एखादा विद्यार्थी किंवा त्याच्या परिवारातील व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारात्मक असल्यास पूर्ण शाळाच बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळा प्रशासन खबरदारी म्हणून आपला मोर्चा पुन्हा ऑनलाइन वर्गाकडे वळवेल, असे वातावरण सध्यातरी निर्माण होताना दिसत आहे.                               मात्र, रुग्ण वाढू नयेत व आपण आणि आपली शाळा सुरक्षित राहावी यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थांनी शासनाने नमूद केलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे; अन्यथा पुन्हा शाळा ओस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण शाळा सुरक्षित राहावी यासाठी शाळा प्रशासनाकडून शासनाने नमूद केलेल्या कोरोना नियमांचे काटेकोरपणे नियम पाळले जात आहेत. त्यात शाळा, वर्गखोल्या स्प्रे मारून सॅनिटाइझ करणे, माक्सचा नियमित वापर करणे, फिजिकल डिस्टन्स ठेवणे आदी सुरक्षितता राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर भर दिला जात आहे. पालकांनीही घाबरून न जाता आपल्या मुलाला कोरोनाचे नियम व्यवस्थित समजावून ते अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा