शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

खरिपाला कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 00:11 IST

नायगाव : संपूर्ण जगाला हैराण करणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे सर्वच उद्योगक्षेत्राची चाके थांबली होती. अशा बिकट परिस्थितीतही न थांबलेल्या कृषिक्षेत्रात मात्र लॉकडाउननंतर अवकळा सुरू झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कोबी, टमाट्याच्या पिकाकडे शेतकरी पाठ फिरवत असल्याने यंदाच्या खरीप हंगामाला कोरोनाची बाधा भोवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

नायगाव : (दत्ता दिघोळे) संपूर्ण जगाला हैराण करणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे सर्वच उद्योगक्षेत्राची चाके थांबली होती. अशा बिकट परिस्थितीतही न थांबलेल्या कृषिक्षेत्रात मात्र लॉकडाउननंतर अवकळा सुरू झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कोबी, टमाट्याच्या पिकाकडे शेतकरी पाठ फिरवत असल्याने यंदाच्या खरीप हंगामाला कोरोनाची बाधा भोवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.भारतासह सर्वच देशांमध्ये कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. लाखो लोकांचा जीव घेणाºया या रोगाने जगातील सर्वच उद्योगधंद्दे बंद पाडले. कोट्यवधी लोकांना बेरोजगार करणाºया या विषाणूने संपूर्णजगाची आर्थिक कोंडी केली आहे. अशा भयानक व जीवघेण्या परिस्थितीत फक्त जगाच्या पोशिंद्याची कंपनी (शेती) मात्र अविरतपणे सुरूच होती.------------------कृषिक्षेत्रात अस्थिरतेचे वातावरण; शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी१ शेतकºयांनी या काळात मोठ्या धाडसाने शेतमालाची विक्री केली. मात्र या काळातही बळीराजाच्या कष्टाला अपेक्षित मोल मिळाले नाही. संपूर्ण देश सध्या पाचव्या लॉकडाउनमधून मार्गक्र मण करत असला तरी मोठ्या प्रमाणात मिळालेल्या अटी-शर्तीच्या जोरावर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सर्वच क्षेत्रातील उद्योग पुन्हा पटरीवर येत असताना मात्र कृषिक्षेत्रात सध्या अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिना सुरू झाला असला तरी शेतकरी अजूनही खरिपाच्या कोबी, टमाटे, मिरची, फ्लावर आदी लागवडीच्या पिकांच्या तयारीला लागलेला दिसत नाही.--------------------२ कोरोनाचा प्रसार थांबत नसल्यामुळे येणाºया काळातही त्याचा फैलाव सुरूच राहिला तर शेतमालाची निर्यात व बाहेरील व्यापारी येणार नाही अशा विविध अफवा पसरत असल्यामुळे या पिकांच्या विक्र ीवर परिणाम होऊन शेतमालाचे हाल होणार अशी चर्चा (अफवा) सध्या विविध माध्यमातून फिरत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळे या महागड्या पिकांची लागवड करण्यास धजावत नसल्याचे चित्र सिन्नर तालुक्यात विशेषत: नायगाव खोºयात बघायला मिळत आहे.-------------------------३ खरीप हंगामाला सुरुवात झाली असली तरी यंदा कोबी, टमाटे, फ्लावर, मिरची आदी खर्चीक पिकांच्या लागवडीकडे शेतकरी पाठ फिरवत असल्याने आगामी काळात सोयाबीन, बाजरी, भुईमूग आदी कमी उत्पादन खर्च लागणाºया पिकांची चाचपणी करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.-----------------------देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी येणाºया काळात या रोगाचा कोणत्याही शेती पिकावर किंवा विक्र ीवर त्याचा परिणाम होणार नाही. त्यामुळे शेतकºयांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता खरिपातील कोबी, फ्लावर, टमाटे, मिरची आदी पिकांची लागवड करावी. सर्व जगातील उद्योग थांबले असताना एकमेव शेती व्यवसाय सुरू होता. सध्यातर सर्वच व्यवहार सुरळीत झाले असताना शेतकºयांनी अफवांवर विश्वास न ठेवता वरील सर्वच पिकांची लागवड करावी.- गणेश कांगणे, संचालक,कांगणे नर्सरी. दोनवाडे, नाशिक---------------------------------जून महिना सुरू झाला तरी अजूनही कोबी, टमाटे, मिरची आदी पिकांच्या बियाणे खरेदीसाठी शेतकरी येण्याचे प्रमाण कमीच आहे. येणाºया काळात कोरोनावर प्रभावी औषध मिळेल व सर्वकाही व्यवस्थित होईल. शेतकºयांनी अफवांवर विश्वास न ठेवता पिकांचे नियोजन केल्यास फायदाच होईल.- श्याम कातकाडे, संचालक,गोदावरी कृषी सेवा केंद्र, नायगाव

टॅग्स :Nashikनाशिक