शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे बाजार समितीत आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 18:25 IST

बुधवारपासून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणा-या शेतक-यांना मुख्य प्रवेशद्वारावर हाताला सॅनिटायझर्स लावूनच आत प्रवेश दिला जात असून, बुधवारी आठवडे बाजार असला तरी त्याचा मोठा परिणाम बाजार समितीच्या पेठरोडवरील कांदा, बटाटा,

ठळक मुद्दे५० टक्के परिणाम : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट कोरोनाच्या सावटामुळे शेतकरी वर्गदेखील चिंतेत सापडला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : संपूर्ण जगभरात गेल्या काही दिवसांपासून हाहाकार माजविणाºया कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा परिणाम नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी येणाºया शेतकऱ्यांवर झाला असून, कोरोनाच्या धास्तीने गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीत साधारणपणे पन्नास टक्क्यांहून अधिक शेतमालाची आवक घटली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, खबरदारी म्हणून बाजार समितीने येणा-या शेतक-यांसाठी सूचना फलक लावण्याबरोबरच शेतक-यांना प्रबोधन केले जात आहे.

बुधवारपासून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणा-या शेतक-यांना मुख्य प्रवेशद्वारावर हाताला सॅनिटायझर्स लावूनच आत प्रवेश दिला जात असून, बुधवारी आठवडे बाजार असला तरी त्याचा मोठा परिणाम बाजार समितीच्या पेठरोडवरील कांदा, बटाटा, फळबाजार बैल बाजारात जाणवला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी एकत्र जमू नये, असे आवाहन करण्यात आले असले तरी, जीवनावश्यक वस्तूंना त्यातून वगळण्यात आले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन शेकडो शेतक-यांची ये-जा सुरू असते. दररोज हजारो क्विंटल शेतमाल येथे विक्रीसाठी येत असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या सावटामुळे शेतकरी वर्गदेखील चिंतेत सापडला आहे. त्यामुळे स्वयंस्फूर्तीने शेतकरी सध्या बाजार समितीत येण्याचे टाळत आहे. दररोज सायंकाळी दिंडोरी रोडवरच्या बाजार समितीत सुमारे ५० टक्क्यांहून अधिक भाजीपाला आवक घटली आहे. सध्या सर्वच पालेभाज्यांची आवक वाढली असल्याने बाजारभाव कमी झाले आहे, अशी माहिती सचिव अरुण काळे यांनी दिली.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNashikनाशिक