शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक अधिकाऱ्यांमुळे कोरोनावर नियंत्रण : शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:08 IST

मालेगाव मध्य : मनपा, स्थानिक आरोग्य यंत्रणा, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व नागरिकांनी केलेली प्रार्थना यामुळेच शहरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील अधिकाºयांनी उगीच स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नये, असे माजी महापौर रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देमनपास कुठलाही निधी देण्यास स्पष्ट नकार

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव मध्य : मनपा, स्थानिक आरोग्य यंत्रणा, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व नागरिकांनी केलेली प्रार्थना यामुळेच शहरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील अधिकाºयांनी उगीच स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नये, असे माजी महापौर रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.शेख म्हणाले की, शहरात कोरोनाच्या उद्रेकावेळी महापालिका प्रशासन, आरोग्य अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेविका, आशा वर्कर्स यांचे योगदान शासनाच्या दबावामुळे शहरातील लहान-मोठ्या डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडून केलेले उपचार व रमजानच्या पवित्र महिन्यात नागरिकांनी केलेली दुवा याचे फलित म्हणून कोरोना नियंत्रणात आला. याचे स्पष्ट श्रेय हे स्थानिक यंत्रणा व नागरिकांचेच आहे; परंतु राष्टÑवादीचे खासदार शरद पवार यांच्यासमोर जिल्हास्तरीय अधिकाºयांनी आपल्यामुळेच कोरोनावर मात मिळाली हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. हे पूर्णत: सत्य नाही, असा खुलासा केला. आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचा निधी सामान्य रुग्णालयासाठी वापरण्यात आला. त्याचा मनपास कुठलाही लाभ झालेला नाही, असे स्पष्ट करीत आमदारांनी शहराची दिशाभूल करू नये, असे आवाहन शेख रशीद यांनी केले.शासनाकडून मनपासाठी निधी मिळावा यासाठी अर्थमंत्री अजीत पवार यांची भेट घेतली; परंतु शासन कर्ज काढून कर्मचाºयांचे वेतन अदा करीत असल्याचे सांगत मनपास कुठलाही निधी देण्यास स्पष्ट नकार दिला. लॉकडाऊनमुळे मनपाच्या उत्पन्नावरही परिणाम झाला असून करपट्टी, पाणीपट्टी, इतर उत्पन्नाचे प्रमाण कमी झाले. त्यातच कोरोनावर खर्च सुरूच असल्याने मनपाची आर्थिक परिस्थिती जेमतेमच आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी सोयीसुविधांसाठी मोर्चे, धरणे देवून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला माजी महापौर शेख यांनी लगावला.विधानसभा निवडणुकीत ३० हजार बोगस मतदान झाल्यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये गत आठ दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. याकडे लक्ष वेधले असता शेख म्हणाले की, अपयशी ठरलेल्या उमेदवारांने पराजय स्वीकारणे आवश्यक आहे तर विजयी उमेदवारानेही सत्य पचवून घेण्याची क्षमता अपेक्षित आहे. शहरात एकाच व्यक्तीचे दोन - तीन ठिकाणांवर मतदान असल्याचे पुराव्यानिशी समोर आले आहे. त्यामुळे मतदार यादी आधार कार्डशी जोडणी करावी, अशी मागणी करून शहरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी शहरातून हद्दपार झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी तोंडावर मास्क लावावा. सामाजिक अंतराचे पालन करुन आवश्यक ती खबरदारी घेवून स्वत:सह शहराच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन शेख रशीद यांनी केले.कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी व शहरातील स्वच्छता व उपाययोजना करण्यासाठी १४ व्या वित्त आयोग व जनरल फंडमधून मनपाने आजपर्यंत सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च केले असून त्यापैकी एक कोटी ८८ लाख ६८ हजार ३६१ रूपये अदाही केले आहे. शासनाने फक्त २० लाख रूपये मनपास दिले आहे. त्यामुळे मनपाने स्वत:चा निधी खर्च केला असल्याचे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMalegaonमालेगांव