शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

स्थानिक अधिकाऱ्यांमुळे कोरोनावर नियंत्रण : शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:08 IST

मालेगाव मध्य : मनपा, स्थानिक आरोग्य यंत्रणा, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व नागरिकांनी केलेली प्रार्थना यामुळेच शहरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील अधिकाºयांनी उगीच स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नये, असे माजी महापौर रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देमनपास कुठलाही निधी देण्यास स्पष्ट नकार

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव मध्य : मनपा, स्थानिक आरोग्य यंत्रणा, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व नागरिकांनी केलेली प्रार्थना यामुळेच शहरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील अधिकाºयांनी उगीच स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नये, असे माजी महापौर रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.शेख म्हणाले की, शहरात कोरोनाच्या उद्रेकावेळी महापालिका प्रशासन, आरोग्य अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेविका, आशा वर्कर्स यांचे योगदान शासनाच्या दबावामुळे शहरातील लहान-मोठ्या डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडून केलेले उपचार व रमजानच्या पवित्र महिन्यात नागरिकांनी केलेली दुवा याचे फलित म्हणून कोरोना नियंत्रणात आला. याचे स्पष्ट श्रेय हे स्थानिक यंत्रणा व नागरिकांचेच आहे; परंतु राष्टÑवादीचे खासदार शरद पवार यांच्यासमोर जिल्हास्तरीय अधिकाºयांनी आपल्यामुळेच कोरोनावर मात मिळाली हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. हे पूर्णत: सत्य नाही, असा खुलासा केला. आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचा निधी सामान्य रुग्णालयासाठी वापरण्यात आला. त्याचा मनपास कुठलाही लाभ झालेला नाही, असे स्पष्ट करीत आमदारांनी शहराची दिशाभूल करू नये, असे आवाहन शेख रशीद यांनी केले.शासनाकडून मनपासाठी निधी मिळावा यासाठी अर्थमंत्री अजीत पवार यांची भेट घेतली; परंतु शासन कर्ज काढून कर्मचाºयांचे वेतन अदा करीत असल्याचे सांगत मनपास कुठलाही निधी देण्यास स्पष्ट नकार दिला. लॉकडाऊनमुळे मनपाच्या उत्पन्नावरही परिणाम झाला असून करपट्टी, पाणीपट्टी, इतर उत्पन्नाचे प्रमाण कमी झाले. त्यातच कोरोनावर खर्च सुरूच असल्याने मनपाची आर्थिक परिस्थिती जेमतेमच आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी सोयीसुविधांसाठी मोर्चे, धरणे देवून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला माजी महापौर शेख यांनी लगावला.विधानसभा निवडणुकीत ३० हजार बोगस मतदान झाल्यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये गत आठ दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. याकडे लक्ष वेधले असता शेख म्हणाले की, अपयशी ठरलेल्या उमेदवारांने पराजय स्वीकारणे आवश्यक आहे तर विजयी उमेदवारानेही सत्य पचवून घेण्याची क्षमता अपेक्षित आहे. शहरात एकाच व्यक्तीचे दोन - तीन ठिकाणांवर मतदान असल्याचे पुराव्यानिशी समोर आले आहे. त्यामुळे मतदार यादी आधार कार्डशी जोडणी करावी, अशी मागणी करून शहरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी शहरातून हद्दपार झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी तोंडावर मास्क लावावा. सामाजिक अंतराचे पालन करुन आवश्यक ती खबरदारी घेवून स्वत:सह शहराच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन शेख रशीद यांनी केले.कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी व शहरातील स्वच्छता व उपाययोजना करण्यासाठी १४ व्या वित्त आयोग व जनरल फंडमधून मनपाने आजपर्यंत सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च केले असून त्यापैकी एक कोटी ८८ लाख ६८ हजार ३६१ रूपये अदाही केले आहे. शासनाने फक्त २० लाख रूपये मनपास दिले आहे. त्यामुळे मनपाने स्वत:चा निधी खर्च केला असल्याचे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMalegaonमालेगांव