शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

स्थानिक अधिकाऱ्यांमुळे कोरोनावर नियंत्रण : शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:08 IST

मालेगाव मध्य : मनपा, स्थानिक आरोग्य यंत्रणा, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व नागरिकांनी केलेली प्रार्थना यामुळेच शहरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील अधिकाºयांनी उगीच स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नये, असे माजी महापौर रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देमनपास कुठलाही निधी देण्यास स्पष्ट नकार

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव मध्य : मनपा, स्थानिक आरोग्य यंत्रणा, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व नागरिकांनी केलेली प्रार्थना यामुळेच शहरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील अधिकाºयांनी उगीच स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नये, असे माजी महापौर रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.शेख म्हणाले की, शहरात कोरोनाच्या उद्रेकावेळी महापालिका प्रशासन, आरोग्य अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेविका, आशा वर्कर्स यांचे योगदान शासनाच्या दबावामुळे शहरातील लहान-मोठ्या डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडून केलेले उपचार व रमजानच्या पवित्र महिन्यात नागरिकांनी केलेली दुवा याचे फलित म्हणून कोरोना नियंत्रणात आला. याचे स्पष्ट श्रेय हे स्थानिक यंत्रणा व नागरिकांचेच आहे; परंतु राष्टÑवादीचे खासदार शरद पवार यांच्यासमोर जिल्हास्तरीय अधिकाºयांनी आपल्यामुळेच कोरोनावर मात मिळाली हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. हे पूर्णत: सत्य नाही, असा खुलासा केला. आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचा निधी सामान्य रुग्णालयासाठी वापरण्यात आला. त्याचा मनपास कुठलाही लाभ झालेला नाही, असे स्पष्ट करीत आमदारांनी शहराची दिशाभूल करू नये, असे आवाहन शेख रशीद यांनी केले.शासनाकडून मनपासाठी निधी मिळावा यासाठी अर्थमंत्री अजीत पवार यांची भेट घेतली; परंतु शासन कर्ज काढून कर्मचाºयांचे वेतन अदा करीत असल्याचे सांगत मनपास कुठलाही निधी देण्यास स्पष्ट नकार दिला. लॉकडाऊनमुळे मनपाच्या उत्पन्नावरही परिणाम झाला असून करपट्टी, पाणीपट्टी, इतर उत्पन्नाचे प्रमाण कमी झाले. त्यातच कोरोनावर खर्च सुरूच असल्याने मनपाची आर्थिक परिस्थिती जेमतेमच आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी सोयीसुविधांसाठी मोर्चे, धरणे देवून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला माजी महापौर शेख यांनी लगावला.विधानसभा निवडणुकीत ३० हजार बोगस मतदान झाल्यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये गत आठ दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. याकडे लक्ष वेधले असता शेख म्हणाले की, अपयशी ठरलेल्या उमेदवारांने पराजय स्वीकारणे आवश्यक आहे तर विजयी उमेदवारानेही सत्य पचवून घेण्याची क्षमता अपेक्षित आहे. शहरात एकाच व्यक्तीचे दोन - तीन ठिकाणांवर मतदान असल्याचे पुराव्यानिशी समोर आले आहे. त्यामुळे मतदार यादी आधार कार्डशी जोडणी करावी, अशी मागणी करून शहरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी शहरातून हद्दपार झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी तोंडावर मास्क लावावा. सामाजिक अंतराचे पालन करुन आवश्यक ती खबरदारी घेवून स्वत:सह शहराच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन शेख रशीद यांनी केले.कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी व शहरातील स्वच्छता व उपाययोजना करण्यासाठी १४ व्या वित्त आयोग व जनरल फंडमधून मनपाने आजपर्यंत सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च केले असून त्यापैकी एक कोटी ८८ लाख ६८ हजार ३६१ रूपये अदाही केले आहे. शासनाने फक्त २० लाख रूपये मनपास दिले आहे. त्यामुळे मनपाने स्वत:चा निधी खर्च केला असल्याचे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMalegaonमालेगांव