शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित ४,६१९; बळी २५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:14 IST

नाशिक : अवघ्या दहा दिवसांत बळींच्या संख्येने कोरोना बळींनी चौथ्यांदा पंचवीसचा आकडा गाठला असून, बळींमधील ही वाढ प्रशासनाच्या चिंतेचे ...

नाशिक : अवघ्या दहा दिवसांत बळींच्या संख्येने कोरोना बळींनी चौथ्यांदा पंचवीसचा आकडा गाठला असून, बळींमधील ही वाढ प्रशासनाच्या चिंतेचे कारण ठरली असून, आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २,४९७ वर पोहोचली आहे, तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा साडेचार हजारांचा आकडा ओलांडून सोमवारी (दि.५) एकूण ४,६१९ पर्यंत मजल मारली आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच वाढणारे बळी रोखणे हेच प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २,५७२, तर नाशिक ग्रामीणला १,८५४ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १२३ व जिल्हाबाह्य ७० रुग्णबाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १५, ग्रामीणला ८, तर जिल्हाबाह्य २, असा एकूण २५ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. गत पंधरवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने तीन हजार आणि चार हजारांवर राहिल्यानंतर पुन्हा बाधित संख्येची वाटचाल साडेचार हजारांवर आणि पाच हजारांच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यापेक्षाही कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, असाच सूर व्यक्त होऊ लागला आहे.

इन्फो

उपचारार्थी रुग्णसंख्या ३० हजारांवर

जिल्ह्यात ज्या वेगाने कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ३० हजार ७५३ वर पोहोचली आहे. त्यात १८ हजार ५४६ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, ९ हजार ८७२ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, २ हजार ९६ मालेगाव मनपा क्षेत्रातील तर जिल्हाबाह्य २३९ रुग्णांचा त्यात समावेश आहे.

इन्फो

प्रलंबित अहवाल पाच हजारांवर

गत महिन्यापासून दररोज वाढत असलेल्या नमुन्यांमुळे कोरोना काळात सातत्याने प्रलंबित अहवालांची संख्या ५ ते ६ हजारांवर रहात आहेत. सोमवारीही प्रलंबित अहवालांची संख्या ५,१६५ असून, त्यात सर्वाधिक प्रलंबित अहवाल नाशिक मनपा क्षेत्रातील ३,०५३ आहेत. नाशिक ग्रामीणचे १,७७७ तर, मालेगाव मनपाचे ३३५ अहवाल प्रलंबित आहेत.