शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

थंडीबरोबरच निवडणुकीच्या गप्पांना रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 17:35 IST

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सुरुवातीच्या पहिले दोन दिवस तालुक्यातून फक्त दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. सध्या गावागावांत निवडणुकीच्या चर्चा रंगत असून, उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांना मात्र चांगलीच कसरत करावी लागत आहे. दरम्यान, शेवटच्या तीन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करताना, मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या विविध संस्थांच्या निवडणुकांमुळे स्थानिक पातळीवर राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तालुक्यातील स्थानिक निवडणुका पक्षीय पातळीपेक्षा गटातटावर लढवल्या जातात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले जाते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दि. २३ डिसेंबर रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी २ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत, तसेच उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीतच तीन दिवस सलग सुट्ट्या आल्याने उमेदवार व पॅनलप्रमुख ऑनलाइन अर्ज भरण्यात गुंतले होते. कागदपत्रे जमा करण्यात उमेदवारांचा वेळ जात आहे, तसेच प्रत्येक पॅनल प्रमुखांजवळ इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. कोणाला कोणत्या वॉर्डात उभे करावे, याची चाचपणी करण्यात येत आहे. दि. १ जानेवारी, १९९५ नंतर जन्मलेल्या उमेदवारांना मात्र सातवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेकांची अडचण निर्माण झाली आहे, तसेच सरपंचाचे आरक्षणही शासनाने रद्द केल्यामुळे उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांची चांगलीच दमछाक होत आहे. गावातील चावडी, चौकाचौकांत, सार्वजनिक ठिकाणी निवडणुकीच्या गप्पांना चांगलेच उधाण आले आहे. प्रत्येक गावांत दोन-तीन पॅनल होत आहेत, तर काही उमेदवारांनी अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांचा चांगलाच कस लागत आहे. इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन संवाद साधला जात आहे. तुमची साथ असेल, तर आम्ही उमेदवारी अर्ज भरतो, असे मतदारांजवळ सांगितले जात आहे. मतदार मात्र सर्वांनाच ह्यहोह्ण म्हणून वेळ निभावून नेत आहेत.कोरोनाच्या भीतीचा ग्रामीण भागात विसर पडलेला असून, कोणीही सामाजिक नियमांचे पालन करीत नाहीत. सामाजिक अंतर पाळले जात नाही, मास्कचा वापर होत नाही, कोरोना ग्रामीण भागात हद्दपार झाला की काय, या आविर्भावात इच्छुक उमेदवारासह नागरिक वावरत आहेत. पॅनलप्रमुखांकडून मात्र अजूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. प्रत्येक पॅनलप्रमुखांजवळ इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. दिवसा वीज व इंटरनेटच्या अडथळ्यांमुळे उमेदवार आपले ऑनलाइन नामनिर्देशनपत्र रात्रीच्या वेळी भरत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यामध्ये नेटवर्कचा खोडा निर्माण होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तीनच दिवस उरले असून, सोमवारपासून तहसील कार्यालयात चांगलीच गर्दी राहणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत