शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

थंडीबरोबरच निवडणुकीच्या गप्पांना रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 17:35 IST

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सुरुवातीच्या पहिले दोन दिवस तालुक्यातून फक्त दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. सध्या गावागावांत निवडणुकीच्या चर्चा रंगत असून, उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांना मात्र चांगलीच कसरत करावी लागत आहे. दरम्यान, शेवटच्या तीन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करताना, मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या विविध संस्थांच्या निवडणुकांमुळे स्थानिक पातळीवर राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तालुक्यातील स्थानिक निवडणुका पक्षीय पातळीपेक्षा गटातटावर लढवल्या जातात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले जाते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दि. २३ डिसेंबर रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी २ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत, तसेच उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीतच तीन दिवस सलग सुट्ट्या आल्याने उमेदवार व पॅनलप्रमुख ऑनलाइन अर्ज भरण्यात गुंतले होते. कागदपत्रे जमा करण्यात उमेदवारांचा वेळ जात आहे, तसेच प्रत्येक पॅनल प्रमुखांजवळ इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. कोणाला कोणत्या वॉर्डात उभे करावे, याची चाचपणी करण्यात येत आहे. दि. १ जानेवारी, १९९५ नंतर जन्मलेल्या उमेदवारांना मात्र सातवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेकांची अडचण निर्माण झाली आहे, तसेच सरपंचाचे आरक्षणही शासनाने रद्द केल्यामुळे उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांची चांगलीच दमछाक होत आहे. गावातील चावडी, चौकाचौकांत, सार्वजनिक ठिकाणी निवडणुकीच्या गप्पांना चांगलेच उधाण आले आहे. प्रत्येक गावांत दोन-तीन पॅनल होत आहेत, तर काही उमेदवारांनी अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांचा चांगलाच कस लागत आहे. इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन संवाद साधला जात आहे. तुमची साथ असेल, तर आम्ही उमेदवारी अर्ज भरतो, असे मतदारांजवळ सांगितले जात आहे. मतदार मात्र सर्वांनाच ह्यहोह्ण म्हणून वेळ निभावून नेत आहेत.कोरोनाच्या भीतीचा ग्रामीण भागात विसर पडलेला असून, कोणीही सामाजिक नियमांचे पालन करीत नाहीत. सामाजिक अंतर पाळले जात नाही, मास्कचा वापर होत नाही, कोरोना ग्रामीण भागात हद्दपार झाला की काय, या आविर्भावात इच्छुक उमेदवारासह नागरिक वावरत आहेत. पॅनलप्रमुखांकडून मात्र अजूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. प्रत्येक पॅनलप्रमुखांजवळ इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. दिवसा वीज व इंटरनेटच्या अडथळ्यांमुळे उमेदवार आपले ऑनलाइन नामनिर्देशनपत्र रात्रीच्या वेळी भरत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यामध्ये नेटवर्कचा खोडा निर्माण होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तीनच दिवस उरले असून, सोमवारपासून तहसील कार्यालयात चांगलीच गर्दी राहणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत