शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

मतभेद हे समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण :देगलूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:51 IST

वेगवेगळ्या घटकांमध्ये, व्यक्तींमध्ये मतभेद असणे हे समाजाच्या जिवंत असण्याचे लक्षण आहे. प्रत्येकाची शरीररचना वेगळी असते त्याचप्रमाणे बौद्धिक क्षमताही वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकजण वेगळा विचार करीत असला तरी त्यांच्या विचारातील एक समानतेचा धागा विषमतेत समता दर्शविणारा असतो. त्याचमुळे संतांनी ‘वैविध्यतेत एकता, विषमतेत समता शोधण्याचा संदेश दिला असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा निरूपणकार चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.

ठळक मुद्दे बस्तीराम सारडा व्याख्यानमालेचा समारोप

नाशिक : वेगवेगळ्या घटकांमध्ये, व्यक्तींमध्ये मतभेद असणे हे समाजाच्या जिवंत असण्याचे लक्षण आहे. प्रत्येकाची शरीररचना वेगळी असते त्याचप्रमाणे बौद्धिक क्षमताही वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकजण वेगळा विचार करीत असला तरी त्यांच्या विचारातील एक समानतेचा धागा विषमतेत समता दर्शविणारा असतो. त्याचमुळे संतांनी ‘वैविध्यतेत एकता, विषमतेत समता शोधण्याचा संदेश दिला असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा निरूपणकार चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.बस्तीरामजी सारडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे परशुराम साइखेडक र नाट्यगृहात बस्तीराम सारडा यांच्या ५५व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ‘संतांना अपेक्षित सामाजिक समता समाज का स्वीकारत नाही?’ विषयायावर तीनदिवसीय व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प गुंफतांना ते गुरुवारी (दि.१०) बोलत होते. व्याख्यानमालेत मंगळवारी (दि.८) पहिले पुष्प गुुंफतांना त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठीच संतांचे अवतरण झाले व त्यांना वाङ्मय निर्मिती करावी लागली. त्यातून त्यांनी मानवी कल्याणाचाच मार्ग प्रशस्त केल्याचे सांगितले, तर बुधवारी (दि.९) तृतीय व अंतिम पुष्प गुंफताना संत समजून घ्यायचे असतील तर सर्वप्रथम त्यांच्या वैचारिकतेला, उद्गाराला, उपदेशाला असलेला सामाजिक अधिष्ठानाचा आवाका समजून घेण्याचे आवाहन केले.व्याख्यानमालेचा समारोप कराताना देगलूरकर महाराज म्हणाले, विश्वातील विविधता व विषमता कधीच संपू शकत नाही. तसे संतांनाही अपेक्षित नाही. त्यामुळेच संतांनी वेगवेगळ्या घटकांची समानतेचा धागा पकडून समाजाला समानतेचा संदेश दिला, जसे संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद वदवताना त्याचा आत्मा हा समानतेचा केंद्र मानले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम