शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

मतभेद हे समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण :देगलूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:51 IST

वेगवेगळ्या घटकांमध्ये, व्यक्तींमध्ये मतभेद असणे हे समाजाच्या जिवंत असण्याचे लक्षण आहे. प्रत्येकाची शरीररचना वेगळी असते त्याचप्रमाणे बौद्धिक क्षमताही वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकजण वेगळा विचार करीत असला तरी त्यांच्या विचारातील एक समानतेचा धागा विषमतेत समता दर्शविणारा असतो. त्याचमुळे संतांनी ‘वैविध्यतेत एकता, विषमतेत समता शोधण्याचा संदेश दिला असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा निरूपणकार चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.

ठळक मुद्दे बस्तीराम सारडा व्याख्यानमालेचा समारोप

नाशिक : वेगवेगळ्या घटकांमध्ये, व्यक्तींमध्ये मतभेद असणे हे समाजाच्या जिवंत असण्याचे लक्षण आहे. प्रत्येकाची शरीररचना वेगळी असते त्याचप्रमाणे बौद्धिक क्षमताही वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकजण वेगळा विचार करीत असला तरी त्यांच्या विचारातील एक समानतेचा धागा विषमतेत समता दर्शविणारा असतो. त्याचमुळे संतांनी ‘वैविध्यतेत एकता, विषमतेत समता शोधण्याचा संदेश दिला असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा निरूपणकार चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.बस्तीरामजी सारडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे परशुराम साइखेडक र नाट्यगृहात बस्तीराम सारडा यांच्या ५५व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ‘संतांना अपेक्षित सामाजिक समता समाज का स्वीकारत नाही?’ विषयायावर तीनदिवसीय व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प गुंफतांना ते गुरुवारी (दि.१०) बोलत होते. व्याख्यानमालेत मंगळवारी (दि.८) पहिले पुष्प गुुंफतांना त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठीच संतांचे अवतरण झाले व त्यांना वाङ्मय निर्मिती करावी लागली. त्यातून त्यांनी मानवी कल्याणाचाच मार्ग प्रशस्त केल्याचे सांगितले, तर बुधवारी (दि.९) तृतीय व अंतिम पुष्प गुंफताना संत समजून घ्यायचे असतील तर सर्वप्रथम त्यांच्या वैचारिकतेला, उद्गाराला, उपदेशाला असलेला सामाजिक अधिष्ठानाचा आवाका समजून घेण्याचे आवाहन केले.व्याख्यानमालेचा समारोप कराताना देगलूरकर महाराज म्हणाले, विश्वातील विविधता व विषमता कधीच संपू शकत नाही. तसे संतांनाही अपेक्षित नाही. त्यामुळेच संतांनी वेगवेगळ्या घटकांची समानतेचा धागा पकडून समाजाला समानतेचा संदेश दिला, जसे संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद वदवताना त्याचा आत्मा हा समानतेचा केंद्र मानले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम