साधुग्राममध्ये आखाड्यांच्या ध्वजारोहणप्रसंगी बऱ्याच वेळा वादाचे प्रसंग उद्भवले. चतु: संप्रदाय खालसांच्या चार महंतापैकी एका महंताच्या मृत्युने रिक्त जालेल्या जागी दिगंबर आखाड्याच्या वतीने करण्यात आलेल्या महंताची नेमणूक करण्यात आल्यामुळे निर्वाणी आखाडा व दिगंबर आखाड्यात वाद झाला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दोन्ही बाजुंकडून शिष्य एकमेकांसमक्ष उभे ठाकल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. प्रत्यक्ष ध्वजारोहण प्रसंगी दिगंबर आखाड्याच्या काही साधुंना निर्वाणी आखाड्याच्या साधुंकडून धक्काबुक्की करण्याचा प्रकार झाल्याने तणावात भर पडली. निर्वाणी आखाड्यास वेळीच आवर न घातल्यास दिगंबर आखाड्याकडून बळाचा वापर केला जाईल अशी धमकी महंत श्री केशवदास यांनी दिल्यामुळे साधुग्रामला खऱ्या अर्थाने आखाड्याचे स्वरूप प्राप्त होते की काय अशी शंका व्यक्त करण्यात आली. प्रशासनाच्या मध्यस्थीने दिगंबर आखाडा, डाकोर खालसांमध्ये चर्चा घडवून समेटाचा प्र्रयत्न झाला. महंत ग्यानदास यांनीही शांततेचे आवाहन केले. परंतु त्यालाही आक्षेप घेण्यात आला. परिणामी तणाव निवळत नसल्याचे पाहून साधुग्राममध्ये याच दिवशी पोलीस व राज्य राखीव दलाची अतिरीक्त कुमक तैनात करण्यात आली.
आखाड्यांमध्ये वादावादी
By admin | Updated: August 8, 2014 01:29 IST