शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

पथ्य पाळल्यास मधुमेह नियंत्रित : यशपाल गोगटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:18 IST

संतुलित आहार, न कंटाळता नियमितपणे केला जाणारा व्यायाम आणि आदर्श जीवनशैलीचे पालन हीच मधुमेही रुग्णांच्या सुदृढ आरोग्याची त्रिसूत्री असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. यशपाल गोगटे यांनी केले.

नाशिक : संतुलित आहार, न कंटाळता नियमितपणे केला जाणारा व्यायाम आणि आदर्श जीवनशैलीचे पालन हीच मधुमेही रुग्णांच्या सुदृढ आरोग्याची त्रिसूत्री असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. यशपाल गोगटे यांनी केले. शहरातील औषध व्यावसायिकांनी आखलेल्या ‘ग्रीन प्लस फार्मसी’ या योजनेच्या शुभारंभाप्रसंगी आय.एम.ए. हॉलमध्ये आयोजित कार्यक्र मात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. गोगटे ‘मधुमेह खरोखरच समूळ नष्ट होऊ शकतो का’ या विषयावर बोलत होते. व्यासपीठावर अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मिलिंद पाटील आणि महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे सदस्य तथा माजी अध्यक्ष सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बदलती जीवनशैली, रात्री उशिराचे जेवण, जंकफूड व फास्टफूडची लागलेली चटक, दुग्धजन्य पदार्थांचे अतिरिक्त सेवन, व्यसनाधीनता या कारणांमुळे मधुमेही रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मधुमेहापासून दूर राहायचे असेल तर आदर्श जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे. रात्री उशीर होणार असल्यास हलका आहार घ्यावा, असे सांगून मधुमेही रु ग्णांनी साखर, भात, दुग्धजन्य पदार्थ टाळले पाहिजेत, असेही गोगटे म्हणाले. सहआयुक्त मिलिंद पाटील तसेच फॉर्मसी कॉन्सिलचे माजी सदस्य सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर मणिआर यांनी केले. महेश भावसार यांनी आभार मानले. कार्यक्र मास लालाजी मोदानी, मंगेश अलई आदी प्रयत्नशील होते.