शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

शंभूराजेंच्या चारित्र्यहननाचे कारस्थान : आबा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 01:34 IST

छत्रपती शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्याची जबाबदारी अभिमानाने पेलत वाढवण्याचे कार्य शंभूराजेंनी केले. परंतु, वयाच्या चौदाव्या वर्षी ‘बुधभूषण’ नावाचा संस्कृत महाग्रंथ लिहिणारे ‘महान संस्कृत पंडित म्हणजे शंभूराजे’, ‘नाईकाभेद’, ‘सातसतक’ यांसारखे ग्रंथ, ‘हिंदी’, ‘ब्रज’ ‘भोजपुरी’ भाषेतील महान ग्रंथ लिहिणारे महान हिंदी पंडित म्हणजे शंभूराजे आणि अवघ्या साडेआठ वर्षाच्या वयात आगऱ्याहून निसटताना छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्यात पोहोचण्यासाठी स्वत: मथूरेत थांबणारे संभूराजे आम्हाला कोणी सांगितलेच नाही, उलट त्यांचे चारित्र्यहनन करण्याचे कारस्थान आमच्याच काही बखरकार, इतिहासकार, नाटककार, कथा, कादंबरीकारांनी केल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते डॉ. आबा पाटील यांनी केले.

नाशिक : छत्रपती शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्याची जबाबदारी अभिमानाने पेलत वाढवण्याचे कार्य शंभूराजेंनी केले. परंतु, वयाच्या चौदाव्या वर्षी ‘बुधभूषण’ नावाचा संस्कृत महाग्रंथ लिहिणारे ‘महान संस्कृत पंडित म्हणजे शंभूराजे’, ‘नाईकाभेद’, ‘सातसतक’ यांसारखे ग्रंथ, ‘हिंदी’, ‘ब्रज’ ‘भोजपुरी’ भाषेतील महान ग्रंथ लिहिणारे महान हिंदी पंडित म्हणजे शंभूराजे आणि अवघ्या साडेआठ वर्षाच्या वयात आगऱ्याहून निसटताना छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्यात पोहोचण्यासाठी स्वत: मथूरेत थांबणारे संभूराजे आम्हाला कोणी सांगितलेच नाही, उलट त्यांचे चारित्र्यहनन करण्याचे कारस्थान आमच्याच काही बखरकार, इतिहासकार, नाटककार, कथा, कादंबरीकारांनी केल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते डॉ. आबा पाटील यांनी केले.गोदातीरावरील यशवंत देवमामलेदार पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत मंगळवारी (दि.१४) पंडितराव खैरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. आबा पाटील यांनी ‘शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज’ विषयावर व्याख्यान देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबतचा व त्यांच्यानंतर स्वराज्य रक्षणासोबतच विस्तारासाठीचे संभाजी महाराज यांचा संघर्ष उपस्थिताना उलगडून सांगितला. संभाजी महाराज अतिशय अभ्यासू असल्यानेच त्यांनी १६ भाषा अवगत करून विविध साहित्यरचनांची निर्मिती केली, तसेच या अभ्यासाच्या वृत्तीतून त्यांनी प्रत्येकवेळी शत्रूवर मात केली. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांनीही त्यांचा आदर्श घ्यायला हवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. छत्रपती संभाजी महाराज हे रयतेचा विचार करणारे होते. त्यातूनच त्यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी सारामाफी देत शेतकऱ्यांना सुखावले. त्याचप्रमाणे महाराणी येसूबार्इंना त्यांच्या अनुपस्थितीत राज्यकारभाराचे अधिकार देऊन राजकारणातही महिलांना ५० टक्के आरक्षणाचीही मुहूर्तमेढ रोवल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. शिरीष राजे, प्रकाश भुतडा, निर्मला खर्डे, नगरसेवक शाहू खैरे आदी उपस्थित होते.आजचे व्याख्यानवक्ता : रविराज गंधेविषय : प्रसार माध्यमे आणिवाचन संस्कृती.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक