शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

By admin | Updated: July 4, 2017 00:17 IST

३० टक्के पर्जन्यवृष्टी : धरण साठ्यात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, मालेगाव व नांदगाव तालुका वगळता अन्य तालुक्यांमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही हजेरी कायम ठेवल्याने जिल्ह्णाच्या एकूण वार्षिक सरासरीच्या तुलनेत जुलैच्या पहिल्या आठवड्यातच ३० टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्णातील धरणांच्या साठ्यातही कमालीची वाढ होऊन २३ टक्के साठा शिल्लक आहे. सोमवारी सकाळी काहीशी विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना सूर्यदर्शन घेता आले, त्यानंतर मात्र पावसाने दुपारी पुन्हा हजेरी लावल्याने नागरिकांची काहीशी धावपळ उडाली. अनेकांनी पावसापासून बचावासाठी सुरक्षित आसरा शोधला. दिवसभर अधूनमधून हजेरी लावलेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. नाशिकसह जिल्ह्णातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी कायम ठेवल्याने शेतीकामांनी वेग घेतला असून, विशेष करून इगतपुरी, पेठ, त्र्यंबक, सुरगाणा या भागात भाताची आवणी केली जात आहे तर अन्य ठिकाणी मका व सोयाबीनच्या लागवडीत शेतकरी व्यस्त झाला आहे. नांदगाव, मालेगाव, बागलाण या तालुक्यांकडे पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे तेथील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत म्हणजेच सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्णात ३१२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, जुलै महिन्याच्या एकूण पावसाचा विचार करता दोन दिवसातच १७ टक्के पाऊस झाला आहे. जुलै महिन्याची सरासरी ५६७१ मिलिमीटर इतकी असून, त्यापैकी दोन दिवसात ९९८ मिलिमीटर पाऊस झाल्याची आकडेवारी शासकीय यंत्रणेने दिली आहे. जून व जुलै या दोन महिन्यांच्या पावसाचा विचार करता वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत ३० टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण फक्त आठ टक्के इतके होते. तालुकानिहाय पर्जन्यवृष्टीजिल्ह्णात गेल्या चोवीस तासांत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे- कंसात आजवर झालेला एकूण पाऊसनाशिक - ४७ (४४५), इगतपुरी - ४७ (९९५), दिंडोरी - १३ (१४५), पेठ - ६४ (५४४), त्र्यंबकेश्वर - ३० (६६९), मालेगाव - ०(१३६), नांदगाव - १२ (२०३), चांदवड - ६ (१९६), कळवण - १९ (१४२), बागलाण- २ (११६), सुरगाणा - ५३ (४४९), देवळा - १ (९८), निफाड - ६ (११४), सिन्नर- ३ (१६२), येवला- ८ (११९) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दारणा धरण निम्मे भरलेपावसाच्या समाधानकारक हजेरीमुळे जिल्ह्णातील धरण साठ्यांमध्ये कमालीची वाढ झाली असून, सरासरी २३ टक्के पाणी जिल्ह्णातील धरणांमध्ये उपलबध आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ३८ टक्के तर संपूर्ण धरण समूहात २९ टक्के पाणी साठले आहे. इगतपुरी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे दारणा धरण निम्मे भरले असून, या धरणाच्या क्षमतेच्या ५१ टक्के पाणी साठले आहे. तर भावली धरणही ४७ टक्के भरले आहे. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात ८२ टक्के पाणी सध्या शिल्लक आहे. चणकापूर २६ टक्के, गिरणा २६ टक्के, हरणबारी १३ टक्के इतके भरले आहे. टंचाईग्रस्त गावांच्या टॅँकरचा फेरआढावाटंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅँकरची मुदत जूनअखेर संपुष्टात आल्याने जिल्ह्णातील ३१ टॅँकर गेल्या तीन दिवसांपासून बंद करण्यात आल्याने पाच तालुक्यांतील १०५ गावे, वाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना टंचाईचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.