शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
6
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
7
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
8
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
9
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
10
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
11
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
12
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
13
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
14
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
15
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
16
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
17
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
18
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
19
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
20
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

By admin | Updated: July 4, 2017 00:17 IST

३० टक्के पर्जन्यवृष्टी : धरण साठ्यात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, मालेगाव व नांदगाव तालुका वगळता अन्य तालुक्यांमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही हजेरी कायम ठेवल्याने जिल्ह्णाच्या एकूण वार्षिक सरासरीच्या तुलनेत जुलैच्या पहिल्या आठवड्यातच ३० टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्णातील धरणांच्या साठ्यातही कमालीची वाढ होऊन २३ टक्के साठा शिल्लक आहे. सोमवारी सकाळी काहीशी विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना सूर्यदर्शन घेता आले, त्यानंतर मात्र पावसाने दुपारी पुन्हा हजेरी लावल्याने नागरिकांची काहीशी धावपळ उडाली. अनेकांनी पावसापासून बचावासाठी सुरक्षित आसरा शोधला. दिवसभर अधूनमधून हजेरी लावलेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. नाशिकसह जिल्ह्णातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी कायम ठेवल्याने शेतीकामांनी वेग घेतला असून, विशेष करून इगतपुरी, पेठ, त्र्यंबक, सुरगाणा या भागात भाताची आवणी केली जात आहे तर अन्य ठिकाणी मका व सोयाबीनच्या लागवडीत शेतकरी व्यस्त झाला आहे. नांदगाव, मालेगाव, बागलाण या तालुक्यांकडे पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे तेथील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत म्हणजेच सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्णात ३१२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, जुलै महिन्याच्या एकूण पावसाचा विचार करता दोन दिवसातच १७ टक्के पाऊस झाला आहे. जुलै महिन्याची सरासरी ५६७१ मिलिमीटर इतकी असून, त्यापैकी दोन दिवसात ९९८ मिलिमीटर पाऊस झाल्याची आकडेवारी शासकीय यंत्रणेने दिली आहे. जून व जुलै या दोन महिन्यांच्या पावसाचा विचार करता वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत ३० टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण फक्त आठ टक्के इतके होते. तालुकानिहाय पर्जन्यवृष्टीजिल्ह्णात गेल्या चोवीस तासांत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे- कंसात आजवर झालेला एकूण पाऊसनाशिक - ४७ (४४५), इगतपुरी - ४७ (९९५), दिंडोरी - १३ (१४५), पेठ - ६४ (५४४), त्र्यंबकेश्वर - ३० (६६९), मालेगाव - ०(१३६), नांदगाव - १२ (२०३), चांदवड - ६ (१९६), कळवण - १९ (१४२), बागलाण- २ (११६), सुरगाणा - ५३ (४४९), देवळा - १ (९८), निफाड - ६ (११४), सिन्नर- ३ (१६२), येवला- ८ (११९) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दारणा धरण निम्मे भरलेपावसाच्या समाधानकारक हजेरीमुळे जिल्ह्णातील धरण साठ्यांमध्ये कमालीची वाढ झाली असून, सरासरी २३ टक्के पाणी जिल्ह्णातील धरणांमध्ये उपलबध आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ३८ टक्के तर संपूर्ण धरण समूहात २९ टक्के पाणी साठले आहे. इगतपुरी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे दारणा धरण निम्मे भरले असून, या धरणाच्या क्षमतेच्या ५१ टक्के पाणी साठले आहे. तर भावली धरणही ४७ टक्के भरले आहे. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात ८२ टक्के पाणी सध्या शिल्लक आहे. चणकापूर २६ टक्के, गिरणा २६ टक्के, हरणबारी १३ टक्के इतके भरले आहे. टंचाईग्रस्त गावांच्या टॅँकरचा फेरआढावाटंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅँकरची मुदत जूनअखेर संपुष्टात आल्याने जिल्ह्णातील ३१ टॅँकर गेल्या तीन दिवसांपासून बंद करण्यात आल्याने पाच तालुक्यांतील १०५ गावे, वाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना टंचाईचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.