शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

समता, न्याय, बंधुतेची मूल्ये रु जवण्यात संविधानाचे स्थान महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 16:59 IST

येवला : दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजीभारताने संविधान स्वीकारले माणूस केंद्र बिंदू ठेवून घटनासमितीने जी मूल्य संविधानात आणली होती ती मूल्ये समता, न्याय, बंधुतेची मूल्ये या आठरा पगड देशाच्या जडण-घडणीत फार महत्वाची ठरली होती, तथापि सुरु वातीची काही वर्षे सोडली तर संविधानातील सामाजिक, आहृतिक, राजकीय आणि धर्मिनरपेक्ष लोकशाही समाजवादाची मूल्ये नाकारून हित संबंध दुखावत असलेल्या विशिष्ट समूहाने जाणीवपूर्वक आपआपलेच प्रस्थापित विचारांचे अजेंडे राबविण्यास सुरु वात केल्यामुळे भारतीय संविधानासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हाधिकारी आणि बडोदा येथील अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी येवले येथे बोलतांना केले.

ठळक मुद्दे लक्ष्मीकांत देशमुख:येवल्यात प्रागतिक व्याख्यामालेस प्रारंभ

शहरातील विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून संविधान ग्रँथ पालखीत ठेऊन ही संविधान दिंडी महात्मा फुले नाट्यगृह येथे आणण्यात आली. महात्मा फुले नाट्यगृहात समता प्रतिष्ठान येवला आयोजित प्रागतिक विचार व्याख्यानमालेचे उदघाटन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलीमापवार, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उषाशिंदे, जेष्ठ साहित्यीक प्रा. गो. तु. पाटील, सागर मगर आदींच्या हस्ते रोपट्याला पाणी टाकून करण्यात आले. यावेळी सुंदर ते ध्यान या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर मायबोली मूक बधिर विद्यालयातील विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. यावेळी प्रागतिक विचार व्याख्यानमालेचे पहिले पुष्प लक्ष्मीकांत देशमुख यांनी गुंफले. यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भावदेण्याच्या वलग्ना अनेकानी केल्या. मात्र उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्यास व्यवस्था सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे शेतकºयांसमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. शेतकरी, कष्टकरी आर्थिक सक्षम झाल्यास गरीब श्रीमंत दरी कमी होईल. संविधानाने सर्वांनाभारतीय असल्याची ओळख दिली आहे. आज या संविधानालाच आव्हान दिले जाते. ही बाब देशाच्या सार्वभौम त्वाला बाधा आणणारी आहे. गाय वाचवण्यासाठी झुंडशाहीने माणसाला मारणे चूकच आहे, याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा सवाल देशमुख यांनी यावेळी केला.यावेळी माजी आमदार मारोतराव पवार, सहकार चळवळीचे नेते अंबादास बनकर, मविप्र संचालक रायभान काळे, प्रा. शिरीष गंधे, डॉ. एस.के पाटील,आदी उपस्थित होते.प्रस्ताविक समता प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा प्रा.अर्जुन कोकाटे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्राचार्य भाऊसाहेब गमे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अजय विभांडीक यांनी करून दिला. आभार मंदा पडवळ यांनी मानले.