शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

समता, न्याय, बंधुतेची मूल्ये रु जवण्यात संविधानाचे स्थान महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 16:59 IST

येवला : दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजीभारताने संविधान स्वीकारले माणूस केंद्र बिंदू ठेवून घटनासमितीने जी मूल्य संविधानात आणली होती ती मूल्ये समता, न्याय, बंधुतेची मूल्ये या आठरा पगड देशाच्या जडण-घडणीत फार महत्वाची ठरली होती, तथापि सुरु वातीची काही वर्षे सोडली तर संविधानातील सामाजिक, आहृतिक, राजकीय आणि धर्मिनरपेक्ष लोकशाही समाजवादाची मूल्ये नाकारून हित संबंध दुखावत असलेल्या विशिष्ट समूहाने जाणीवपूर्वक आपआपलेच प्रस्थापित विचारांचे अजेंडे राबविण्यास सुरु वात केल्यामुळे भारतीय संविधानासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हाधिकारी आणि बडोदा येथील अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी येवले येथे बोलतांना केले.

ठळक मुद्दे लक्ष्मीकांत देशमुख:येवल्यात प्रागतिक व्याख्यामालेस प्रारंभ

शहरातील विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून संविधान ग्रँथ पालखीत ठेऊन ही संविधान दिंडी महात्मा फुले नाट्यगृह येथे आणण्यात आली. महात्मा फुले नाट्यगृहात समता प्रतिष्ठान येवला आयोजित प्रागतिक विचार व्याख्यानमालेचे उदघाटन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलीमापवार, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उषाशिंदे, जेष्ठ साहित्यीक प्रा. गो. तु. पाटील, सागर मगर आदींच्या हस्ते रोपट्याला पाणी टाकून करण्यात आले. यावेळी सुंदर ते ध्यान या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर मायबोली मूक बधिर विद्यालयातील विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. यावेळी प्रागतिक विचार व्याख्यानमालेचे पहिले पुष्प लक्ष्मीकांत देशमुख यांनी गुंफले. यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भावदेण्याच्या वलग्ना अनेकानी केल्या. मात्र उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्यास व्यवस्था सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे शेतकºयांसमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. शेतकरी, कष्टकरी आर्थिक सक्षम झाल्यास गरीब श्रीमंत दरी कमी होईल. संविधानाने सर्वांनाभारतीय असल्याची ओळख दिली आहे. आज या संविधानालाच आव्हान दिले जाते. ही बाब देशाच्या सार्वभौम त्वाला बाधा आणणारी आहे. गाय वाचवण्यासाठी झुंडशाहीने माणसाला मारणे चूकच आहे, याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा सवाल देशमुख यांनी यावेळी केला.यावेळी माजी आमदार मारोतराव पवार, सहकार चळवळीचे नेते अंबादास बनकर, मविप्र संचालक रायभान काळे, प्रा. शिरीष गंधे, डॉ. एस.के पाटील,आदी उपस्थित होते.प्रस्ताविक समता प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा प्रा.अर्जुन कोकाटे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्राचार्य भाऊसाहेब गमे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अजय विभांडीक यांनी करून दिला. आभार मंदा पडवळ यांनी मानले.