शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

समता, न्याय, बंधुतेची मूल्ये रु जवण्यात संविधानाचे स्थान महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 16:59 IST

येवला : दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजीभारताने संविधान स्वीकारले माणूस केंद्र बिंदू ठेवून घटनासमितीने जी मूल्य संविधानात आणली होती ती मूल्ये समता, न्याय, बंधुतेची मूल्ये या आठरा पगड देशाच्या जडण-घडणीत फार महत्वाची ठरली होती, तथापि सुरु वातीची काही वर्षे सोडली तर संविधानातील सामाजिक, आहृतिक, राजकीय आणि धर्मिनरपेक्ष लोकशाही समाजवादाची मूल्ये नाकारून हित संबंध दुखावत असलेल्या विशिष्ट समूहाने जाणीवपूर्वक आपआपलेच प्रस्थापित विचारांचे अजेंडे राबविण्यास सुरु वात केल्यामुळे भारतीय संविधानासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हाधिकारी आणि बडोदा येथील अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी येवले येथे बोलतांना केले.

ठळक मुद्दे लक्ष्मीकांत देशमुख:येवल्यात प्रागतिक व्याख्यामालेस प्रारंभ

शहरातील विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून संविधान ग्रँथ पालखीत ठेऊन ही संविधान दिंडी महात्मा फुले नाट्यगृह येथे आणण्यात आली. महात्मा फुले नाट्यगृहात समता प्रतिष्ठान येवला आयोजित प्रागतिक विचार व्याख्यानमालेचे उदघाटन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलीमापवार, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उषाशिंदे, जेष्ठ साहित्यीक प्रा. गो. तु. पाटील, सागर मगर आदींच्या हस्ते रोपट्याला पाणी टाकून करण्यात आले. यावेळी सुंदर ते ध्यान या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर मायबोली मूक बधिर विद्यालयातील विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. यावेळी प्रागतिक विचार व्याख्यानमालेचे पहिले पुष्प लक्ष्मीकांत देशमुख यांनी गुंफले. यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भावदेण्याच्या वलग्ना अनेकानी केल्या. मात्र उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्यास व्यवस्था सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे शेतकºयांसमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. शेतकरी, कष्टकरी आर्थिक सक्षम झाल्यास गरीब श्रीमंत दरी कमी होईल. संविधानाने सर्वांनाभारतीय असल्याची ओळख दिली आहे. आज या संविधानालाच आव्हान दिले जाते. ही बाब देशाच्या सार्वभौम त्वाला बाधा आणणारी आहे. गाय वाचवण्यासाठी झुंडशाहीने माणसाला मारणे चूकच आहे, याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा सवाल देशमुख यांनी यावेळी केला.यावेळी माजी आमदार मारोतराव पवार, सहकार चळवळीचे नेते अंबादास बनकर, मविप्र संचालक रायभान काळे, प्रा. शिरीष गंधे, डॉ. एस.के पाटील,आदी उपस्थित होते.प्रस्ताविक समता प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा प्रा.अर्जुन कोकाटे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्राचार्य भाऊसाहेब गमे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अजय विभांडीक यांनी करून दिला. आभार मंदा पडवळ यांनी मानले.