शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

‘केबीसी’ आरोपींना वाचविण्याचे षडयंत्र

By admin | Updated: November 21, 2015 23:56 IST

एजंटांची टोळी कार्यरत : गुंतवणूकदारांकडून खोटी शपथपत्रे भरून घेत असल्याची तक्रार

नाशिक : केबीसी घोटाळ्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारा आरोपी भाऊसाहेब चव्हाण याला वाचविण्यासाठी एजंट कार्यरत झाले असून, ठेवीदारांना चुकीचे शपथपत्र तयार करण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे या प्रकारच्या एजंटांना पायबंद घालण्यासाठी विविध योजना राबविणाऱ्या एजंटांवर कारवाई करावी, अशी मागणी केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष समितीने केली आहे.केबीसी घोटाळ्याची व्याप्ती नाशिकच नव्हे तर संपूर्ण राज्यात असून राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे असतानादेखील आजवर या घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि आरती चव्हाण यांना पोलीस अटक करू शकलेले नाहीत. परिणामी घामाने जमवलेली रक्कम परत न मिळाल्याने अनेक गुंतवणूकदारांच्या मुलांचे विवाह, शिक्षण खोळंबले आहेत. सर्वसामान्य नागरिकांची अशा प्रकारची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक तर झालेली नाही; परंतु त्यांना सोडविण्यासाठी राज्यभर एजंटांची टोळी कार्यरत झाली आहेत. गुंतवलेली सर्व रक्कम परत करतो; परंतु कोणतीही तक्रार नाही असे शपथपत्र द्या अशा आशयाच्या अटी घालून नागरिकांकडून शपथपत्र भरून घेतले जात आहेत. अशा प्रकारचे शपथपत्र देणाऱ्यांना तीन महिन्यांत गुंतवणुकीची रक्कम परत देण्याचे आमिषही दाखवले जात आहे.आधीच जमा पुंजी गेलेल्या गुंतवणूकदारांना किमान गुंतवणूक केलेली रक्कम परत हाती पडण्याच्या शक्यतेने नोटरीकडे शपथपत्र तयार करण्यासाठी गर्दी केली आहे. वास्तविक गुन्हा दाखल झाल्यानंतर भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी हे सिंगापूरला फरार झाले असून, तेथून परतणे अवघड झाल्याने तीन महिन्यांत भाऊसाहेब चव्हाण भारतात परत येणार असून, तो सर्व रक्कम परत देणार असल्याच्या अफवा या एजंटांकडून पसरविल्या जात आहेत. तसेच खोटे शपथपत्र तयार करून घेऊन गुन्ह्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे संबंधित एजंटांवर कारवाई करावी, अशी मागणी समितीच्या वतीने गणेश कदम, विजय वाहुळे, शिवा तेलंग, उमेश शिंदे, संतोष माळोदे, ज्ञानेश्वर थोरात, ज्ञानेश्वर दाते, नितीन पाटील, सागर माळोदे, अनिल पवार, कुंदन चव्हाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)