शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

चिमुकल्यांच्या मदतीने शंभरावर रोपट्यांचे संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 23:54 IST

सिन्नर : दापूरच्या खांडवाडीतील एक तरुण भर उन्हाळ्यात बाल सवंगड्यांच्या मदतीने जवळपास सव्वाशे झाडांचे संवर्धन करीत आहे. अजय कडाळे असे त्याचे नाव असून लहानपणापासून त्याची वृक्षांशी मैत्री जडली आहे. त्यामुळे खांडवाडीतील त्याच्या घराचा परिसरही नंदनवन भासतो आहे.

सिन्नर : दापूरच्या खांडवाडीतील एक तरुण भर उन्हाळ्यात बाल सवंगड्यांच्या मदतीने जवळपास सव्वाशे झाडांचे संवर्धन करीत आहे. अजय कडाळे असे त्याचे नाव असून लहानपणापासून त्याची वृक्षांशी मैत्री जडली आहे. त्यामुळे खांडवाडीतील त्याच्या घराचा परिसरही नंदनवन भासतो आहे.अजय दापूर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करतो. खांडवाडीतील त्याच्या राहत्या घरापासून अर्धा किमीच्या आसपास वनविभागाचे क्षेत्र आहे. या ठिकाणी आंबा, सुबाभूळ, वड, चाफा, बोर, जांभूळ, सीताफळ, कडुनिंब, करंजी, चिंच, बकाण अशा विविध प्रकारच्या वृक्षांची त्याने लागवड केली आहे. आणि या झाडांचे संवर्धन करण्यासाठी तो जीव ओतून काम करत आहे.मुळात अजयची लहानपणापासून झाडांशी मैत्री आहे असे तो सांगतो. राहत्या घराच्या मागेपुढे त्याने फणस, नारळ, रामफळ, चाफा, केळी, पेरु अशी नानाविध फळझाडे लावलेली आहेत. घराच्या सभोवताली झाडे लावण्यासाठी जागा नसल्याने त्याने वनविभागाच्या जागेत स्वत: पुढाकार घेऊन सव्वाशे झाडे लावली.वनविभागाने याबाबत विचारणा केली. तथापि, अजयचा हेतू स्वच्छ असल्याने वनविभागाने त्याला प्रोत्साहन दिले. उन्हाच्या झळा वाढल्यानंतर तो दररोज वाडीतील बालसंवगडी अथवा घरातील चिलीपिली सोबत घेतो आणि सायकलला पाण्याने भरलेले ड्रम बांधून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी पार पाडतो. सव्वाशे झाडांपैकी जवळपास ९० टक्के झाडे जगविण्यात त्याच्या ‘ग्रीन आर्मी’ला यश आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात झाडे अधिक बाळसे धरतील असा विश्वास अजयला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक