शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

नाशिक हवाईमार्गे सात शहरांना जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 01:22 IST

नाशिक : अनेक वर्षांपासून विमान-सेवेसाठी प्रतीक्षा करणाºया नाशिककरांसाठी केंद्र सरकारची उडान योजना भरून पावली आहे. मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता आणखी सहा ठिकाणी नाशिकहून विमानसेवा सुरू होणार आहे. त्यानुसार दिल्ली आणि गोव्यासह सहा ठिकाणी नाशिक जोडले जाणार आहे. त्यासाठी विविध चार कंपन्यांनी बीड केले असून, लवकरच ही सेवा सुरू होणार आहे.केंद्र ...

नाशिक : अनेक वर्षांपासून विमान-सेवेसाठी प्रतीक्षा करणाºया नाशिककरांसाठी केंद्र सरकारची उडान योजना भरून पावली आहे. मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता आणखी सहा ठिकाणी नाशिकहून विमानसेवा सुरू होणार आहे. त्यानुसार दिल्ली आणि गोव्यासह सहा ठिकाणी नाशिक जोडले जाणार आहे. त्यासाठी विविध चार कंपन्यांनी बीड केले असून, लवकरच ही सेवा सुरू होणार आहे.केंद्र सरकारच्या उडान योजनेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होत असून, त्यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी देशभरातील विविध सेवांचे टप्पे निश्चित केले आहेत. त्याअंतर्गत नाशिकमधून सहा मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी उडानचा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर नाशिककरांची प्रतीक्षा संपली आणि पॅसेंजर टर्मिनल बांधून बंद असलेल्या ओझर येथील विमानतळावरून विमानसेवेला मुहूर्त लागला. मुंबई विमानतळावरून स्लॉट मिळाल्याने जून- जुलैमध्ये रखडलेली ही सेवा अखेरीस २३ डिसेंबर रोजी सुरू झाली. नाशिकहून मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी ही सेवा सध्या सुरू असली तरी मुंबईपेक्षा पुण्याच्या सेवेला अधिक प्रतिसाद मिळत आहे. याच दरम्यान उडानच्या दुसºया टप्प्याची तयारी सुरू झाली होती. नाशिकमधून कोणत्या शहरांना जाण्यास आवडेल यासंदर्भातील अनेक सर्व्हे नाशिकच्याच उद्योजक आणि व्यावसायिकांच्या संस्थेच्या माध्यमातून सुरू होते. त्यानुसार ही सेवा सुरू होणार असून, नाशिककरांची इच्छा पूर्ण होणार आहे. केवळ प्रवासच नव्हे तर नाशिकमधील उद्योग व्यावसायाला बुस्ट मिळणार आहे.उडानच्या पहिल्या टप्प्यात नाशिकची सेवा रखडल्याने दुसºया टप्प्यात नाशिकचा केंद्र सरकारने समावेश केला नव्हता. मात्र ही सेवा सुरू झाल्याचे नागरी उड्डान मंत्रालयाच्या लक्षात आणून दिल्यानंतर ऐनवेळी नाशिकचा दुसरा टप्प्यात समावेश करण्यात आला. त्यामुळे आता नाशिकच्या विकासाला गती मिळणार आहे. - हेमंत गोडसे, खासदार किफायतशीर दरात प्रवासाची संधीनाशिकहून दिल्ली, गोवा, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, दिल्ली, हिडान (गाझियाबाद) तसेच हैदराबाद या सात ठिकाणी विमानसेवा निश्चित करण्यात आली आहे. या सेवेसाठी एअर इंडियाची एअर लाइन्स, स्पाईस जेट, इंडिगो, ट्रस्ट, जेट एअरवेज या पाच कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात या सर्व मार्गांवर काही प्रमाणात किफायतशीर दरात प्रवासाची संधी मिळणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकAirportविमानतळ