शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

विधानसभेच्या निम्म्या जागांवर कॉँग्रेस पक्षाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:14 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून जिल्हा कॉँग्रेसची बैठक शुक्रवारी होऊन त्यात तालुका अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मनोगत जाणून घेण्यात आले. राष्टÑवादीशी सन्मानजन्य आघाडी करण्याबरोबरच गत लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या वर्तणुकीबद्दल खेद व्यक्त करून जिल्ह्यातील विधानसभेच्या निम्म्या जागा कॉँग्रेसला मिळाव्यात, असा सूर सर्वांनीच लावला.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून जिल्हा कॉँग्रेसची बैठक शुक्रवारी होऊन त्यात तालुका अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मनोगत जाणून घेण्यात आले. राष्टÑवादीशी सन्मानजन्य आघाडी करण्याबरोबरच गत लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या वर्तणुकीबद्दल खेद व्यक्त करून जिल्ह्यातील विधानसभेच्या निम्म्या जागा कॉँग्रेसला मिळाव्यात, असा सूर सर्वांनीच लावला.जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील निवडणुकीची तयारी तसेच तालुका अध्यक्षांचे मत जाणून घेण्यात आले. या आघाडीत समसमान जागा मिळाल्यास ही निवडणूक एकत्रितपणे लढावी अन्यथा काँग्रेसने जिल्ह्यातील सर्व जागा स्वबळावर लढवाव्यात, असेही मत काही कार्यकर्त्यांनी या बैठकीदरम्यान व्यक्त केले.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी, कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना पक्षश्रेष्ठींना कळविण्यात येतील. ते जो निर्णय घेतील त्याचा आदर केला जाईल. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे.यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल, माजी मंत्री शोभा बच्छाव यांनी राष्ट्रवादीसोबत सन्मानजनक आघाडी करून एकत्रितपणे निवडणूक लढविणे हे दोन्ही पक्षांच्या हिताचे आहे, असे सांगितले. अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी राखीव मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाने आग्रह धरावा, अशी मागणी केली. या बैठकीस निवृत्ती डावरे, दिगंबर गिते, प्रल्हाद पाटील, साखरचंद कांकरिया, विनायक सांगळे, संजय जाधव, मनोहर आहिरे, सखाराम भोये, संपतराव वक्ते, बाळू जगताप, मधुकर शेलार, भय्या देशमुख, रतन जाधव, अंबादास ढिकले आदी पदाधिकारी उपस्थित होते.उपस्थित सर्वच तालुकाध्यक्षांनी काँग्रेस पक्षाला बळकटी येण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक सन्मानजनक आघाडी झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्याची तयारी दर्शवली. परंतु गत लोकसभा निवडणुकीचे अनुभव पाहता काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून सन्मानजनक वागणूक मिळालेली नाही, याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस