शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

विधानसभेच्या निम्म्या जागांवर कॉँग्रेस पक्षाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:14 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून जिल्हा कॉँग्रेसची बैठक शुक्रवारी होऊन त्यात तालुका अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मनोगत जाणून घेण्यात आले. राष्टÑवादीशी सन्मानजन्य आघाडी करण्याबरोबरच गत लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या वर्तणुकीबद्दल खेद व्यक्त करून जिल्ह्यातील विधानसभेच्या निम्म्या जागा कॉँग्रेसला मिळाव्यात, असा सूर सर्वांनीच लावला.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून जिल्हा कॉँग्रेसची बैठक शुक्रवारी होऊन त्यात तालुका अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मनोगत जाणून घेण्यात आले. राष्टÑवादीशी सन्मानजन्य आघाडी करण्याबरोबरच गत लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या वर्तणुकीबद्दल खेद व्यक्त करून जिल्ह्यातील विधानसभेच्या निम्म्या जागा कॉँग्रेसला मिळाव्यात, असा सूर सर्वांनीच लावला.जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील निवडणुकीची तयारी तसेच तालुका अध्यक्षांचे मत जाणून घेण्यात आले. या आघाडीत समसमान जागा मिळाल्यास ही निवडणूक एकत्रितपणे लढावी अन्यथा काँग्रेसने जिल्ह्यातील सर्व जागा स्वबळावर लढवाव्यात, असेही मत काही कार्यकर्त्यांनी या बैठकीदरम्यान व्यक्त केले.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी, कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना पक्षश्रेष्ठींना कळविण्यात येतील. ते जो निर्णय घेतील त्याचा आदर केला जाईल. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे.यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल, माजी मंत्री शोभा बच्छाव यांनी राष्ट्रवादीसोबत सन्मानजनक आघाडी करून एकत्रितपणे निवडणूक लढविणे हे दोन्ही पक्षांच्या हिताचे आहे, असे सांगितले. अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी राखीव मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाने आग्रह धरावा, अशी मागणी केली. या बैठकीस निवृत्ती डावरे, दिगंबर गिते, प्रल्हाद पाटील, साखरचंद कांकरिया, विनायक सांगळे, संजय जाधव, मनोहर आहिरे, सखाराम भोये, संपतराव वक्ते, बाळू जगताप, मधुकर शेलार, भय्या देशमुख, रतन जाधव, अंबादास ढिकले आदी पदाधिकारी उपस्थित होते.उपस्थित सर्वच तालुकाध्यक्षांनी काँग्रेस पक्षाला बळकटी येण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक सन्मानजनक आघाडी झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्याची तयारी दर्शवली. परंतु गत लोकसभा निवडणुकीचे अनुभव पाहता काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून सन्मानजनक वागणूक मिळालेली नाही, याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस