शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

कॉँग्रेस-राष्ट्रवादीसमोर सत्ता टिकविण्याचे आव्हान

By admin | Updated: January 12, 2017 01:23 IST

कॉँग्रेस-राष्ट्रवादीसमोर सत्ता टिकविण्याचे आव्हान

  गणेश धुरी :  नाशिक जिल्हा परिषदेच्या दहाव्या पंचवार्षिक निवडणुकांचा बिगुल वाजला असून, स्थापनेपासून सलग पंचवीस वर्षे सत्तेत राहणाऱ्या कॉँग्रेस आणि आताची वीस वर्षे सत्तेत राहणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेससमोर सत्ता टिकविण्याचे आव्हान राहणार आहे. कॉँग्रेसने स्थापनेच्या १९६२ पासून सलग २५ वर्षे, तर १९९२ नंतर शिवसेना व माकपचा प्रत्येकी एक अपवाद वगळता राष्ट्रवादी कॉँग्रेसने २० वर्षे जिल्हा परिषदेवर सत्ता राखली आहे. जिल्हा परिषदेची स्थापना १ मे १९६२ रोजी झाली. जिल्हा परिषदेच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत कॉँग्रेसकडून भानुदास कवडे यांना अध्यक्षपद भूषविण्याची संधी लाभली. त्यानंतर सातत्याने १९६२ ते १९६७, १९६७ ते १९७२, १९७२ ते १९७७ तसेच १९७७ ते १९७९ या काळात कॉँग्रेसनेच सत्ता राखली. मधल्या काळात केवळ नाशिकच्याच नव्हे तर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांवर सलग ११-१२ वर्षे प्रशासकीय कारकीर्द राहिली. त्यानंतर १९९२ साली कॉँग्रेसकडूनच गोपाळराव गुळवे यांनी सलग पाच वर्षे अध्यक्षपद राखले. त्यानंतरच्या काळात पांडुरंग राऊत यांच्या रूपाने शिवसेनेचा पहिल्यांदाच भगवा मिनी मंत्रालयावर फडकला. त्यानंतर पंढरीनाथ थोरे, अनिलकुमार अहेर, विद्या पाटील, के. के. पवार, पंढरीनाथ थोरे, राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, जयश्री पवार व आताच्या विजयश्री चुंभळे यांच्या रूपाने अध्यक्षपद भूषविण्याची संधी राष्ट्रवादीला लाभली. त्यातील अनिलकुमार अहेर व के. के. पवार यांचा अपवाद होता. अनिलकुमार अहेर कॉँग्रेसकडून तर के. के. पवार यांनी माकपकडून अध्यक्षपद भूषविले. आता ७३ गटांसाठी जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यातील ३७ गट महिलांसाठी तर ३६ गट पुरुष राखीव आहेत. अर्थात पुरुष राखीव गटातून महिलांनाही उभी राहण्याची संधी आहे. त्यातील सर्वाधिक २९ गट अनुसूचित जमाती संवर्गासाठी तर २० गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तसेच १९ गट सर्वसाधारण संवर्गासाठी तर पाच गट अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव आहेत. नगरपालिका निवडणुकांचा कल पाहता राष्ट्रवादी व कॉँग्रेससमोर सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. नाशिक जिल्हा परिषदेसाठी दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, २३ फेब्रुवारीला मतमोजणी राहणार आहे.