शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

नाशिकमध्ये टीईटी परीक्षा केंद्रांवर गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 01:34 IST

शहरात घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेसाठी अवघ्या काही क्षणांच्या विलंबाने पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थापनाकडून परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी प्रचंड संताप व्यक्त केल्याने अपवाद वगळता शहरातील बहुतांश केंद्रावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे परीक्षार्थीं गोंधळ घालत असलेल्या परीक्षा केंद्रावर पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणत विलंबाने केंद्रावर पोहोचणाऱ्या उमेदवारांना बाहेर काढले. यातील बऱ्याच उमेदवारांनी बस बंद असल्याने खासगी वाहनांचा वापर केल्याचे सांगितले. त्यामुळे बंद एसटीचा फटकाही अनेकांना बसल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देबंद बससेवेचा फटका: काही मिनिटांच्या उशिराने परीक्षार्थींना प्रवेशद्वारावरच रोखले

नाशिक : शहरात घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेसाठी अवघ्या काही क्षणांच्या विलंबाने पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थापनाकडून परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी प्रचंड संताप व्यक्त केल्याने अपवाद वगळता शहरातील बहुतांश केंद्रावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे परीक्षार्थीं गोंधळ घालत असलेल्या परीक्षा केंद्रावर पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणत विलंबाने केंद्रावर पोहोचणाऱ्या उमेदवारांना बाहेर काढले. यातील बऱ्याच उमेदवारांनी बस बंद असल्याने खासगी वाहनांचा वापर केल्याचे सांगितले. त्यामुळे बंद एसटीचा फटकाही अनेकांना बसल्याचे वृत्त आहे.

नाशिक शहरातील मराठा हायस्कूल, नवरचना स्कूल, हिंदी माध्यमिक विद्यालय, बॉईज टाऊन, उन्नती विद्यालय, पेठे विद्यालय, सीडीओ मेरी, रवींद्रनाथ विद्यालय, उंटवाडी माध्यमिक हायस्कूल, हिंदी माध्यमिक विद्यालय, नाशिकरोड येथील पुरुषोत्तम विद्यालय यासारख्या जवळपास सर्वच परीक्षा केंद्रावर अवघ्या चार ते पाच मिनिटांच्या उशिराने पोहोचलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवेशास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे अनेक उमेदवारांना टीईटी परीक्षेच्या पहिल्या पेपरला मुकावे लागल्याने परीक्षा केंद्रांच्या प्रवेशद्वारावर एकच गोंधळ उडाला. संतापलेल्या परीक्षार्थींनी परीक्षा केंद्र असलेल्या शाळांविरोधात रोष व्यक्त करण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी अखेर हस्तक्षेप करावा लागला. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे बससेवा ठप्प असल्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने अनेक परीक्षार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाही. तर अनेकांना परीक्षा केंद्रावर पत्ता शोधण्यातच अधिक वेळ झाल्याने उशीर झाल्याची कारणे परीक्षार्थींनी दिली. मात्र, परीक्षा परिषदेच्या सूचनेनुसार कोणत्याही परीक्षा केंद्रावर निश्चित वेळेनंतर परीक्षार्थींना प्रवेश देण्यात आला नसल्याचे जिल्हा परीक्षा नियंत्रक तथा प्राथमिक जिल्हाधिकारी राजीव म्हसकर यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिकexamपरीक्षा