शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये टीईटी परीक्षा केंद्रांवर गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 01:34 IST

शहरात घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेसाठी अवघ्या काही क्षणांच्या विलंबाने पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थापनाकडून परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी प्रचंड संताप व्यक्त केल्याने अपवाद वगळता शहरातील बहुतांश केंद्रावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे परीक्षार्थीं गोंधळ घालत असलेल्या परीक्षा केंद्रावर पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणत विलंबाने केंद्रावर पोहोचणाऱ्या उमेदवारांना बाहेर काढले. यातील बऱ्याच उमेदवारांनी बस बंद असल्याने खासगी वाहनांचा वापर केल्याचे सांगितले. त्यामुळे बंद एसटीचा फटकाही अनेकांना बसल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देबंद बससेवेचा फटका: काही मिनिटांच्या उशिराने परीक्षार्थींना प्रवेशद्वारावरच रोखले

नाशिक : शहरात घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेसाठी अवघ्या काही क्षणांच्या विलंबाने पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थापनाकडून परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी प्रचंड संताप व्यक्त केल्याने अपवाद वगळता शहरातील बहुतांश केंद्रावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे परीक्षार्थीं गोंधळ घालत असलेल्या परीक्षा केंद्रावर पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणत विलंबाने केंद्रावर पोहोचणाऱ्या उमेदवारांना बाहेर काढले. यातील बऱ्याच उमेदवारांनी बस बंद असल्याने खासगी वाहनांचा वापर केल्याचे सांगितले. त्यामुळे बंद एसटीचा फटकाही अनेकांना बसल्याचे वृत्त आहे.

नाशिक शहरातील मराठा हायस्कूल, नवरचना स्कूल, हिंदी माध्यमिक विद्यालय, बॉईज टाऊन, उन्नती विद्यालय, पेठे विद्यालय, सीडीओ मेरी, रवींद्रनाथ विद्यालय, उंटवाडी माध्यमिक हायस्कूल, हिंदी माध्यमिक विद्यालय, नाशिकरोड येथील पुरुषोत्तम विद्यालय यासारख्या जवळपास सर्वच परीक्षा केंद्रावर अवघ्या चार ते पाच मिनिटांच्या उशिराने पोहोचलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवेशास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे अनेक उमेदवारांना टीईटी परीक्षेच्या पहिल्या पेपरला मुकावे लागल्याने परीक्षा केंद्रांच्या प्रवेशद्वारावर एकच गोंधळ उडाला. संतापलेल्या परीक्षार्थींनी परीक्षा केंद्र असलेल्या शाळांविरोधात रोष व्यक्त करण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी अखेर हस्तक्षेप करावा लागला. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे बससेवा ठप्प असल्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने अनेक परीक्षार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाही. तर अनेकांना परीक्षा केंद्रावर पत्ता शोधण्यातच अधिक वेळ झाल्याने उशीर झाल्याची कारणे परीक्षार्थींनी दिली. मात्र, परीक्षा परिषदेच्या सूचनेनुसार कोणत्याही परीक्षा केंद्रावर निश्चित वेळेनंतर परीक्षार्थींना प्रवेश देण्यात आला नसल्याचे जिल्हा परीक्षा नियंत्रक तथा प्राथमिक जिल्हाधिकारी राजीव म्हसकर यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिकexamपरीक्षा