शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

नाशिकमध्ये टीईटी परीक्षा केंद्रांवर गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 01:34 IST

शहरात घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेसाठी अवघ्या काही क्षणांच्या विलंबाने पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थापनाकडून परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी प्रचंड संताप व्यक्त केल्याने अपवाद वगळता शहरातील बहुतांश केंद्रावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे परीक्षार्थीं गोंधळ घालत असलेल्या परीक्षा केंद्रावर पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणत विलंबाने केंद्रावर पोहोचणाऱ्या उमेदवारांना बाहेर काढले. यातील बऱ्याच उमेदवारांनी बस बंद असल्याने खासगी वाहनांचा वापर केल्याचे सांगितले. त्यामुळे बंद एसटीचा फटकाही अनेकांना बसल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देबंद बससेवेचा फटका: काही मिनिटांच्या उशिराने परीक्षार्थींना प्रवेशद्वारावरच रोखले

नाशिक : शहरात घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेसाठी अवघ्या काही क्षणांच्या विलंबाने पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थापनाकडून परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी प्रचंड संताप व्यक्त केल्याने अपवाद वगळता शहरातील बहुतांश केंद्रावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे परीक्षार्थीं गोंधळ घालत असलेल्या परीक्षा केंद्रावर पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणत विलंबाने केंद्रावर पोहोचणाऱ्या उमेदवारांना बाहेर काढले. यातील बऱ्याच उमेदवारांनी बस बंद असल्याने खासगी वाहनांचा वापर केल्याचे सांगितले. त्यामुळे बंद एसटीचा फटकाही अनेकांना बसल्याचे वृत्त आहे.

नाशिक शहरातील मराठा हायस्कूल, नवरचना स्कूल, हिंदी माध्यमिक विद्यालय, बॉईज टाऊन, उन्नती विद्यालय, पेठे विद्यालय, सीडीओ मेरी, रवींद्रनाथ विद्यालय, उंटवाडी माध्यमिक हायस्कूल, हिंदी माध्यमिक विद्यालय, नाशिकरोड येथील पुरुषोत्तम विद्यालय यासारख्या जवळपास सर्वच परीक्षा केंद्रावर अवघ्या चार ते पाच मिनिटांच्या उशिराने पोहोचलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवेशास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे अनेक उमेदवारांना टीईटी परीक्षेच्या पहिल्या पेपरला मुकावे लागल्याने परीक्षा केंद्रांच्या प्रवेशद्वारावर एकच गोंधळ उडाला. संतापलेल्या परीक्षार्थींनी परीक्षा केंद्र असलेल्या शाळांविरोधात रोष व्यक्त करण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी अखेर हस्तक्षेप करावा लागला. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे बससेवा ठप्प असल्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने अनेक परीक्षार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाही. तर अनेकांना परीक्षा केंद्रावर पत्ता शोधण्यातच अधिक वेळ झाल्याने उशीर झाल्याची कारणे परीक्षार्थींनी दिली. मात्र, परीक्षा परिषदेच्या सूचनेनुसार कोणत्याही परीक्षा केंद्रावर निश्चित वेळेनंतर परीक्षार्थींना प्रवेश देण्यात आला नसल्याचे जिल्हा परीक्षा नियंत्रक तथा प्राथमिक जिल्हाधिकारी राजीव म्हसकर यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिकexamपरीक्षा