शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

गोंधळाची आयोगाकडून दखल

By admin | Updated: February 22, 2017 23:57 IST

सोमवारी बैठक : मतदार याद्यांची होणार पडताळणी

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदार यादीतील गोंधळामुळे लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिल्याने राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून, येत्या सोमवारी राज्यातील सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत मतदारांची नावे यादीतून गायब होण्याचे, तसेच अन्य मतदान केंद्रात स्थलांतरित झाल्यामागची कारणे शोधण्यात येणार आहेत. मंगळवारी राज्यातील दहा महापालिका व २५ जिल्हा परिषदांसाठी सर्वत्र मतदान घेण्यात आले. त्यासाठी प्रशासकीय जय्यत तयारी करण्यात आली असली तरी, जवळपास दहा ते पंधरा टक्के मतदारांना त्यांची नावेच मतदार यादीत सापडली नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. एकट्या मुंबईत अकरा लाख मतदारांची नावे यादीत नसल्याने त्यांना मतदान न करताच घरी परतावे लागले आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही असाच प्रकार घडला असून, मतदारांना त्यांची नावे अन्य गटात व लगतच्या गावात स्थलांतरित झाल्याचे तर काहींची नावे दुसऱ्याच मतदान केंद्रात आढळली आहेत. अनेक मतदारांना मतदार यादीच्या गोंधळामुळे मतदानापासून वंचित राहून मनस्ताप सहन करावा लागला आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात तर थेट प्रभागही बदलण्यात आल्यामुळे अनेकांनी मतदानासाठी घराबाहेर पडण्यासही नकार दिला. वर्षानुवर्षे ज्या मतदान केंद्रावर मतदान केले त्याठिकाणच्या केंद्रावर नाव न सापडल्यामुळे मतदान केंद्र शोधण्यासाठी पायपीटही करावी लागली आहे. या साऱ्या गोष्टींचा मतदानाच्या टक्केवारीवरही परिणाम झाल्याचा अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. त्यापार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बोलविली आहे. या बैठकीत या साऱ्या प्रकाराची चौकशी होण्याची शक्यता आहे.