शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

गोंधळाची आयोगाकडून दखल

By admin | Updated: February 22, 2017 23:57 IST

सोमवारी बैठक : मतदार याद्यांची होणार पडताळणी

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदार यादीतील गोंधळामुळे लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिल्याने राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून, येत्या सोमवारी राज्यातील सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत मतदारांची नावे यादीतून गायब होण्याचे, तसेच अन्य मतदान केंद्रात स्थलांतरित झाल्यामागची कारणे शोधण्यात येणार आहेत. मंगळवारी राज्यातील दहा महापालिका व २५ जिल्हा परिषदांसाठी सर्वत्र मतदान घेण्यात आले. त्यासाठी प्रशासकीय जय्यत तयारी करण्यात आली असली तरी, जवळपास दहा ते पंधरा टक्के मतदारांना त्यांची नावेच मतदार यादीत सापडली नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. एकट्या मुंबईत अकरा लाख मतदारांची नावे यादीत नसल्याने त्यांना मतदान न करताच घरी परतावे लागले आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही असाच प्रकार घडला असून, मतदारांना त्यांची नावे अन्य गटात व लगतच्या गावात स्थलांतरित झाल्याचे तर काहींची नावे दुसऱ्याच मतदान केंद्रात आढळली आहेत. अनेक मतदारांना मतदार यादीच्या गोंधळामुळे मतदानापासून वंचित राहून मनस्ताप सहन करावा लागला आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात तर थेट प्रभागही बदलण्यात आल्यामुळे अनेकांनी मतदानासाठी घराबाहेर पडण्यासही नकार दिला. वर्षानुवर्षे ज्या मतदान केंद्रावर मतदान केले त्याठिकाणच्या केंद्रावर नाव न सापडल्यामुळे मतदान केंद्र शोधण्यासाठी पायपीटही करावी लागली आहे. या साऱ्या गोष्टींचा मतदानाच्या टक्केवारीवरही परिणाम झाल्याचा अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. त्यापार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बोलविली आहे. या बैठकीत या साऱ्या प्रकाराची चौकशी होण्याची शक्यता आहे.