शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

गोंधळाची आयोगाकडून दखल

By admin | Updated: February 22, 2017 23:57 IST

सोमवारी बैठक : मतदार याद्यांची होणार पडताळणी

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदार यादीतील गोंधळामुळे लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिल्याने राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून, येत्या सोमवारी राज्यातील सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत मतदारांची नावे यादीतून गायब होण्याचे, तसेच अन्य मतदान केंद्रात स्थलांतरित झाल्यामागची कारणे शोधण्यात येणार आहेत. मंगळवारी राज्यातील दहा महापालिका व २५ जिल्हा परिषदांसाठी सर्वत्र मतदान घेण्यात आले. त्यासाठी प्रशासकीय जय्यत तयारी करण्यात आली असली तरी, जवळपास दहा ते पंधरा टक्के मतदारांना त्यांची नावेच मतदार यादीत सापडली नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. एकट्या मुंबईत अकरा लाख मतदारांची नावे यादीत नसल्याने त्यांना मतदान न करताच घरी परतावे लागले आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही असाच प्रकार घडला असून, मतदारांना त्यांची नावे अन्य गटात व लगतच्या गावात स्थलांतरित झाल्याचे तर काहींची नावे दुसऱ्याच मतदान केंद्रात आढळली आहेत. अनेक मतदारांना मतदार यादीच्या गोंधळामुळे मतदानापासून वंचित राहून मनस्ताप सहन करावा लागला आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात तर थेट प्रभागही बदलण्यात आल्यामुळे अनेकांनी मतदानासाठी घराबाहेर पडण्यासही नकार दिला. वर्षानुवर्षे ज्या मतदान केंद्रावर मतदान केले त्याठिकाणच्या केंद्रावर नाव न सापडल्यामुळे मतदान केंद्र शोधण्यासाठी पायपीटही करावी लागली आहे. या साऱ्या गोष्टींचा मतदानाच्या टक्केवारीवरही परिणाम झाल्याचा अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. त्यापार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बोलविली आहे. या बैठकीत या साऱ्या प्रकाराची चौकशी होण्याची शक्यता आहे.