शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

गोंधळाची आयोगाकडून दखल

By admin | Updated: February 22, 2017 23:57 IST

सोमवारी बैठक : मतदार याद्यांची होणार पडताळणी

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदार यादीतील गोंधळामुळे लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिल्याने राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून, येत्या सोमवारी राज्यातील सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत मतदारांची नावे यादीतून गायब होण्याचे, तसेच अन्य मतदान केंद्रात स्थलांतरित झाल्यामागची कारणे शोधण्यात येणार आहेत. मंगळवारी राज्यातील दहा महापालिका व २५ जिल्हा परिषदांसाठी सर्वत्र मतदान घेण्यात आले. त्यासाठी प्रशासकीय जय्यत तयारी करण्यात आली असली तरी, जवळपास दहा ते पंधरा टक्के मतदारांना त्यांची नावेच मतदार यादीत सापडली नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. एकट्या मुंबईत अकरा लाख मतदारांची नावे यादीत नसल्याने त्यांना मतदान न करताच घरी परतावे लागले आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही असाच प्रकार घडला असून, मतदारांना त्यांची नावे अन्य गटात व लगतच्या गावात स्थलांतरित झाल्याचे तर काहींची नावे दुसऱ्याच मतदान केंद्रात आढळली आहेत. अनेक मतदारांना मतदार यादीच्या गोंधळामुळे मतदानापासून वंचित राहून मनस्ताप सहन करावा लागला आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात तर थेट प्रभागही बदलण्यात आल्यामुळे अनेकांनी मतदानासाठी घराबाहेर पडण्यासही नकार दिला. वर्षानुवर्षे ज्या मतदान केंद्रावर मतदान केले त्याठिकाणच्या केंद्रावर नाव न सापडल्यामुळे मतदान केंद्र शोधण्यासाठी पायपीटही करावी लागली आहे. या साऱ्या गोष्टींचा मतदानाच्या टक्केवारीवरही परिणाम झाल्याचा अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. त्यापार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बोलविली आहे. या बैठकीत या साऱ्या प्रकाराची चौकशी होण्याची शक्यता आहे.