शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आवास योजनेत गोंधळात गोंधळ

By admin | Updated: March 3, 2017 01:57 IST

नाशिक : प्रधानमंत्री आवास योजना नेमकी कोणासाठी आणि कशासाठी, याबाबत महापालिकेने पुरेशी जनजागृती न केल्याने गेल्या चार दिवसांपासून विभागीय कार्यालयांमध्ये नागरिकांची झुंबड उडत आहे.

 नाशिक : प्रधानमंत्री आवास योजना नेमकी कोणासाठी आणि कशासाठी, याबाबत महापालिकेने पुरेशी जनजागृती न केल्याने गेल्या चार दिवसांपासून विभागीय कार्यालयांमध्ये नागरिकांची झुंबड उडत आहे. त्यातच शासन मान्यताप्राप्त ई-सेवा केंद्रांवर यापूर्वी अर्ज दाखल करणाऱ्या नागरिकांच्या अर्जांची पुनर्पडताळणी महापालिकेमार्फत केली जाणार असल्याने नेमका अर्ज कोठे करायचा, याबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. झोपडपट्टीतील रहिवाशांचे सर्वेक्षण थेट जागेवर होणार असतानाही झोपडीधारक रांगेत उभे राहत असल्यानेही विभागीय कार्यालयांमध्ये गर्दी दिसून येत आहे.केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरे या अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना नाशिक महापालिकेमार्फत राबविली जाणार आहे. त्यासाठी चार घटक निश्चित करण्यात आले असून, महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांत त्यासाठी अर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत. पहिल्या घटकात झोपडपट्ट्यांचा ‘आहे तिथेच पुनर्विकास’ करण्याची योजना आहे. मात्र, त्यासाठी झोपडीधारकांचे सर्वेक्षण त्यांच्या घरी जाऊन केले जाणार असून, त्यासाठी महापालिकेने खास एजन्सी नियुक्त केली आहे. त्यानुसार, पश्चिम विभागात सध्या सर्वेक्षणाचे कामही सुरू आहे. आतापर्यंत पश्चिम विभागातील १० झोपडपट्ट्यांचे मॅपिंग करण्यात आले असून, यानंतर त्याठिकाणी टॅबमार्फत लाभार्थ्यांची माहिती भरून घेतली जाणार आहे. या घटकात लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनामार्फत दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. झोपडीधारकांचे जागेवर जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार असले तरी गेल्या तीन-चार दिवसांपासून विभागीय कार्यालयांसमोर झोपडपट्टीतील रहिवाशांचीच अधिक गर्दी होताना दिसून येत आहे. अन्य घटकांसाठी त्याठिकाणी अर्जासाठी नागरिकांची गर्दी तुरळक आहे. याचबरोबर नोव्हेंबर २०१६ पासून शहरातील शासन मान्य ई-सेवा केंद्रांवरही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नागरिकांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेतले जात आहेत. परंतु, आता महापालिकेनेही त्याची सुरुवात केल्याने यापूर्वी ई-सेवा केंद्रांवर भरलेले अर्ज वैध की अवैध याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनपाच्या विभागीय कार्यालयांमध्येच भरून घेणारे अर्ज वैध असल्याचे आणि ई-सेवा केंद्रात भरलेल्या अर्जांची मनपामार्फत पुनर्पडताळणी केली जाणार असल्याचे म्हटले आहे. एकूणच या योजनेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती असून, महापालिकेने त्याबाबत पुरेशी जागृतीच केली नसल्यानेच हा गोंधळ उडाल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)