शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

आवास योजनेत गोंधळात गोंधळ

By admin | Updated: March 3, 2017 01:57 IST

नाशिक : प्रधानमंत्री आवास योजना नेमकी कोणासाठी आणि कशासाठी, याबाबत महापालिकेने पुरेशी जनजागृती न केल्याने गेल्या चार दिवसांपासून विभागीय कार्यालयांमध्ये नागरिकांची झुंबड उडत आहे.

 नाशिक : प्रधानमंत्री आवास योजना नेमकी कोणासाठी आणि कशासाठी, याबाबत महापालिकेने पुरेशी जनजागृती न केल्याने गेल्या चार दिवसांपासून विभागीय कार्यालयांमध्ये नागरिकांची झुंबड उडत आहे. त्यातच शासन मान्यताप्राप्त ई-सेवा केंद्रांवर यापूर्वी अर्ज दाखल करणाऱ्या नागरिकांच्या अर्जांची पुनर्पडताळणी महापालिकेमार्फत केली जाणार असल्याने नेमका अर्ज कोठे करायचा, याबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. झोपडपट्टीतील रहिवाशांचे सर्वेक्षण थेट जागेवर होणार असतानाही झोपडीधारक रांगेत उभे राहत असल्यानेही विभागीय कार्यालयांमध्ये गर्दी दिसून येत आहे.केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरे या अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना नाशिक महापालिकेमार्फत राबविली जाणार आहे. त्यासाठी चार घटक निश्चित करण्यात आले असून, महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांत त्यासाठी अर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत. पहिल्या घटकात झोपडपट्ट्यांचा ‘आहे तिथेच पुनर्विकास’ करण्याची योजना आहे. मात्र, त्यासाठी झोपडीधारकांचे सर्वेक्षण त्यांच्या घरी जाऊन केले जाणार असून, त्यासाठी महापालिकेने खास एजन्सी नियुक्त केली आहे. त्यानुसार, पश्चिम विभागात सध्या सर्वेक्षणाचे कामही सुरू आहे. आतापर्यंत पश्चिम विभागातील १० झोपडपट्ट्यांचे मॅपिंग करण्यात आले असून, यानंतर त्याठिकाणी टॅबमार्फत लाभार्थ्यांची माहिती भरून घेतली जाणार आहे. या घटकात लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनामार्फत दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. झोपडीधारकांचे जागेवर जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार असले तरी गेल्या तीन-चार दिवसांपासून विभागीय कार्यालयांसमोर झोपडपट्टीतील रहिवाशांचीच अधिक गर्दी होताना दिसून येत आहे. अन्य घटकांसाठी त्याठिकाणी अर्जासाठी नागरिकांची गर्दी तुरळक आहे. याचबरोबर नोव्हेंबर २०१६ पासून शहरातील शासन मान्य ई-सेवा केंद्रांवरही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नागरिकांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेतले जात आहेत. परंतु, आता महापालिकेनेही त्याची सुरुवात केल्याने यापूर्वी ई-सेवा केंद्रांवर भरलेले अर्ज वैध की अवैध याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनपाच्या विभागीय कार्यालयांमध्येच भरून घेणारे अर्ज वैध असल्याचे आणि ई-सेवा केंद्रात भरलेल्या अर्जांची मनपामार्फत पुनर्पडताळणी केली जाणार असल्याचे म्हटले आहे. एकूणच या योजनेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती असून, महापालिकेने त्याबाबत पुरेशी जागृतीच केली नसल्यानेच हा गोंधळ उडाल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)