शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

बाजार समिती निवडणुकीत मतदारांत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 01:27 IST

कोरोना महामारीच्या कालावधीत अनेक ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. तेथे राज्य सरकारने प्रशासकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत कोण मतदान करणार हा गोंधळ निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देभुसे यांना निवेदन : ग्रामपंचायत सदस्यांबाबत गोंधळाची स्थिती

कळवण : कोरोना महामारीच्या कालावधीत अनेक ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. तेथे राज्य सरकारने प्रशासकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत कोण मतदान करणार हा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे सहकार प्राधिकरणने त्याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख व कळवण बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छाव, बेबीलाल पालवी यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात नामदार भुसे व सहकार प्राधिकरण निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात याबाबत स्पष्ट निर्देश देण्याची मागणी केली असून सध्या सहकार प्राधिकरणाकडून नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील चाळीस टक्के ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमलेले आहेत. मागील सहा महिन्यांपूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे कोणते सदस्य निवडणुकीत मतदान करू शकतील व कसे, याचा निवडणूक आदेशात स्पष्ट उल्लेख केलेला नाही.

मागील निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायत गटातील मतदार संख्या प्रशासक मुळे कमी झाली आहे हे मतदार याद्यामुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांचा मतदान हक्क हिरवला गेल्याने खळबळ उडाली आहे.

इन्फो

निवडणुकीला स्थगितीची मागणी

गेल्या सहा महिन्यांपूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना निवडणुकीत मतदार समजण्यात यावे. तसे शासकीय नियमात नसेल तर तूर्तास कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडणुकांना स्थगिती देण्यात यावी. निवडणुका होईपर्यंत बाजार समित्यांवर प्रशासक नेमण्यात यावेत. अन्यथा बाजार समित्यांच्या निवडणुकीवर त्याचा निश्चितच परिणाम होईल. अनेक ग्रामपंचायत सदस्यांवर अन्याय होऊन ते आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहतील. त्यामुळे या निवडणुकींना स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूक