शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

बाजार समिती निवडणुकीत मतदारांत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 01:27 IST

कोरोना महामारीच्या कालावधीत अनेक ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. तेथे राज्य सरकारने प्रशासकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत कोण मतदान करणार हा गोंधळ निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देभुसे यांना निवेदन : ग्रामपंचायत सदस्यांबाबत गोंधळाची स्थिती

कळवण : कोरोना महामारीच्या कालावधीत अनेक ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. तेथे राज्य सरकारने प्रशासकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत कोण मतदान करणार हा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे सहकार प्राधिकरणने त्याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख व कळवण बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छाव, बेबीलाल पालवी यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात नामदार भुसे व सहकार प्राधिकरण निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात याबाबत स्पष्ट निर्देश देण्याची मागणी केली असून सध्या सहकार प्राधिकरणाकडून नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील चाळीस टक्के ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमलेले आहेत. मागील सहा महिन्यांपूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे कोणते सदस्य निवडणुकीत मतदान करू शकतील व कसे, याचा निवडणूक आदेशात स्पष्ट उल्लेख केलेला नाही.

मागील निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायत गटातील मतदार संख्या प्रशासक मुळे कमी झाली आहे हे मतदार याद्यामुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांचा मतदान हक्क हिरवला गेल्याने खळबळ उडाली आहे.

इन्फो

निवडणुकीला स्थगितीची मागणी

गेल्या सहा महिन्यांपूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना निवडणुकीत मतदार समजण्यात यावे. तसे शासकीय नियमात नसेल तर तूर्तास कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडणुकांना स्थगिती देण्यात यावी. निवडणुका होईपर्यंत बाजार समित्यांवर प्रशासक नेमण्यात यावेत. अन्यथा बाजार समित्यांच्या निवडणुकीवर त्याचा निश्चितच परिणाम होईल. अनेक ग्रामपंचायत सदस्यांवर अन्याय होऊन ते आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहतील. त्यामुळे या निवडणुकींना स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूक