शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष सभा-सांस्कृतिक दहशतवादाची आव्हाने

By admin | Updated: March 7, 2015 01:18 IST

संघर्ष सभा-सांस्कृतिक दहशतवादाची आव्हाने

नाशिक : गोविंद पानसरे यांनी इतिहास हा सामान्य माणसांमुळे लिहिला गेला. हे सांगण्यास सुरुवात केली होती. इतिहास नेत्यांमुळे नव्हे तर सामान्य माणसांमुळेच लिहिला जातो. पानसरे यांनी नेमके तेच इतिहासातून सामान्य माणसाला मोठे करण्याबरोबरच आधुनिकतेची कास धरण्याचा सल्ला देण्याचे काम सुरू होते. त्यामुळेच पानसरे यांची हत्त्या ही आधुनिकतेला विरोध करणाऱ्यांनी केली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले.प. सा. नाट्यमंदिरात कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय व सामाजिक अत्याचार प्रतिबंधक कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संघर्ष सभा-सांस्कृतिक दहशतवादाची आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, सीटूचे नेते डॉ. डी. एल. कराड आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गोविंद पानसरे यांची समाजवाद चळवळीवर भाष्य करणारी २० मिनिटांची प्रकट मुलाखत पडद्यावर दाखविण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविकात डॉ. डी. एल. कराड यांनी सामाजिक चळवळींवर होणारे अत्याचार व हल्ले चिंताजनक असल्याचे सांगितले. त्यानंतर मार्गदर्शन करताना रावसाहेब कसबे म्हणाले की, अलीकडे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की धर्म नावाच्या गोष्टीला शेवटची घर घर लागली आहे. आधी दाभोलकर व आता पानसरे यांची हत्त्या ही अशाच सामाजिक चळवळ पुढे नेणाऱ्या क्रांतिकारी विचारवंतांची हत्त्या आहे. या हत्त्यांचा शेवटपर्यंत तपास लागणार नाही. कारण या हत्त्या अत्यंत जाणीवपूर्वक करण्यात आल्या आहेत. नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाच्या नव्हे, तर ओबीसीच्या कार्डवर सत्ता मिळवली असून, त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांचा एक छुपा अजेंडा आहे, तो लोकांना कळेलच. ज्या विचारवंताने आयुष्यभर माणसावर प्रेम केले अशा विचारवंताची हत्त्या का व्हावी.? काय सांगत होते, पानसरे की ज्यामुळे त्यांची हत्त्या झाली. ते तुम्हा आम्हाला माहित नसलेला सत्य इतिहास सांगत होते, असे कसबे यांनी सांगितले. पानसरे यांनी डाव्या चळवळीला दलित चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी डावी चळवळ दलित चळवळीला जोडली जाईल, त्या दिवशी क्रांती होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी उत्तम कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन महादेव खुडे, तर आभार प्रा. डॉ. विवेक खरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू देसले, दत्तू तुपे, संजय जाधव, सुनील मालुसरे, राजू नाईक आदिंनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)