शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

संघर्ष सभा-सांस्कृतिक दहशतवादाची आव्हाने

By admin | Updated: March 7, 2015 01:18 IST

संघर्ष सभा-सांस्कृतिक दहशतवादाची आव्हाने

नाशिक : गोविंद पानसरे यांनी इतिहास हा सामान्य माणसांमुळे लिहिला गेला. हे सांगण्यास सुरुवात केली होती. इतिहास नेत्यांमुळे नव्हे तर सामान्य माणसांमुळेच लिहिला जातो. पानसरे यांनी नेमके तेच इतिहासातून सामान्य माणसाला मोठे करण्याबरोबरच आधुनिकतेची कास धरण्याचा सल्ला देण्याचे काम सुरू होते. त्यामुळेच पानसरे यांची हत्त्या ही आधुनिकतेला विरोध करणाऱ्यांनी केली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले.प. सा. नाट्यमंदिरात कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय व सामाजिक अत्याचार प्रतिबंधक कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संघर्ष सभा-सांस्कृतिक दहशतवादाची आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, सीटूचे नेते डॉ. डी. एल. कराड आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गोविंद पानसरे यांची समाजवाद चळवळीवर भाष्य करणारी २० मिनिटांची प्रकट मुलाखत पडद्यावर दाखविण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविकात डॉ. डी. एल. कराड यांनी सामाजिक चळवळींवर होणारे अत्याचार व हल्ले चिंताजनक असल्याचे सांगितले. त्यानंतर मार्गदर्शन करताना रावसाहेब कसबे म्हणाले की, अलीकडे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की धर्म नावाच्या गोष्टीला शेवटची घर घर लागली आहे. आधी दाभोलकर व आता पानसरे यांची हत्त्या ही अशाच सामाजिक चळवळ पुढे नेणाऱ्या क्रांतिकारी विचारवंतांची हत्त्या आहे. या हत्त्यांचा शेवटपर्यंत तपास लागणार नाही. कारण या हत्त्या अत्यंत जाणीवपूर्वक करण्यात आल्या आहेत. नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाच्या नव्हे, तर ओबीसीच्या कार्डवर सत्ता मिळवली असून, त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांचा एक छुपा अजेंडा आहे, तो लोकांना कळेलच. ज्या विचारवंताने आयुष्यभर माणसावर प्रेम केले अशा विचारवंताची हत्त्या का व्हावी.? काय सांगत होते, पानसरे की ज्यामुळे त्यांची हत्त्या झाली. ते तुम्हा आम्हाला माहित नसलेला सत्य इतिहास सांगत होते, असे कसबे यांनी सांगितले. पानसरे यांनी डाव्या चळवळीला दलित चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी डावी चळवळ दलित चळवळीला जोडली जाईल, त्या दिवशी क्रांती होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी उत्तम कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन महादेव खुडे, तर आभार प्रा. डॉ. विवेक खरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू देसले, दत्तू तुपे, संजय जाधव, सुनील मालुसरे, राजू नाईक आदिंनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)