शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

कळवणला जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: July 11, 2016 23:49 IST

अर्जुनसागर : लाभक्षेत्रात २४० मिमी, तर चणकापूरमध्ये १५२ मिमी पाऊस

 कळवण : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाला सुरुवात झाली असून, शनिवारी व रविवारी दिवसभर कळवण शहर व तालुक्याच्या आदिवासीसह ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या १२ तासात कळवण शहरात १५३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून, अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्प लाभक्षेत्रात २४० मिमी, तर चणकापूर प्रकल्प लाभक्षेत्रात १५२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तालुक्यातील जलप्रकल्पांच्या साठ्यात वाढ झाली आहे.पावसामुळे कळवण शहरातील व तालुक्यातील जनजीवन दोन दिवसांपासून विस्कळीत झाले आहे. शहरातील रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. शेतात तुडुंब पाणी भरल्याने अनेक बांध फुटले. त्यात शेतातील रोपे वाहून गेली. सप्तशृंगगडावर तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गडावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या आठवड्यात घाटात दरड कोसळली होती; परंतु सप्तशृंगगडाचे उपसरपंच राजेश गवळी यांनी रस्त्यावरील अडथळे दूर करून वाहतूक सुरळीत केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कळवण तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात गुरुवारी रात्रीपासून जोरदार पाऊस झाला. चणकापूरसह अर्जुनसागर धरणाच्या व नांदुरी, गोबापूर, मार्कंड पिंप्री, मळगाव, खिराड, मुळाणे, जामले, भेगू, धनोली आदि लघुपाटबंधारे प्रकल्पांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. कळवण, अभोणा, कनाशी, जयदर, सप्तशृंगगड, साकोरे, शिरसमणी, नवी बेज, ओतूर, नांदुरी, मोकभणगी, देसराणे, दळवट, खर्डे दिगर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने दोन दिवसांपासून तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. कळवण शहरातील विविध भागात व रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. कळवण शहरात सर्वत्र पाण्याचे तळे व डबके निर्माण झाले असून, गटारी तुडुंब भरल्या आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्याने कळवण शहर जलमय झाले आहे. तीन-चार दिवसांपासून जोरदार पावसाने कळवण तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. तालुक्यातील आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागातील स्त्यांवरील अनेक छोटे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. जाण्या-येण्याचा मार्गच बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. (वार्ताहर)