शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

कळवणला जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: July 11, 2016 23:49 IST

अर्जुनसागर : लाभक्षेत्रात २४० मिमी, तर चणकापूरमध्ये १५२ मिमी पाऊस

 कळवण : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाला सुरुवात झाली असून, शनिवारी व रविवारी दिवसभर कळवण शहर व तालुक्याच्या आदिवासीसह ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या १२ तासात कळवण शहरात १५३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून, अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्प लाभक्षेत्रात २४० मिमी, तर चणकापूर प्रकल्प लाभक्षेत्रात १५२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तालुक्यातील जलप्रकल्पांच्या साठ्यात वाढ झाली आहे.पावसामुळे कळवण शहरातील व तालुक्यातील जनजीवन दोन दिवसांपासून विस्कळीत झाले आहे. शहरातील रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. शेतात तुडुंब पाणी भरल्याने अनेक बांध फुटले. त्यात शेतातील रोपे वाहून गेली. सप्तशृंगगडावर तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गडावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या आठवड्यात घाटात दरड कोसळली होती; परंतु सप्तशृंगगडाचे उपसरपंच राजेश गवळी यांनी रस्त्यावरील अडथळे दूर करून वाहतूक सुरळीत केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कळवण तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात गुरुवारी रात्रीपासून जोरदार पाऊस झाला. चणकापूरसह अर्जुनसागर धरणाच्या व नांदुरी, गोबापूर, मार्कंड पिंप्री, मळगाव, खिराड, मुळाणे, जामले, भेगू, धनोली आदि लघुपाटबंधारे प्रकल्पांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. कळवण, अभोणा, कनाशी, जयदर, सप्तशृंगगड, साकोरे, शिरसमणी, नवी बेज, ओतूर, नांदुरी, मोकभणगी, देसराणे, दळवट, खर्डे दिगर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने दोन दिवसांपासून तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. कळवण शहरातील विविध भागात व रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. कळवण शहरात सर्वत्र पाण्याचे तळे व डबके निर्माण झाले असून, गटारी तुडुंब भरल्या आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्याने कळवण शहर जलमय झाले आहे. तीन-चार दिवसांपासून जोरदार पावसाने कळवण तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. तालुक्यातील आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागातील स्त्यांवरील अनेक छोटे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. जाण्या-येण्याचा मार्गच बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. (वार्ताहर)