शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

चारा छावण्यांसाठी संस्थांची प्रशासनाकडून मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:02 IST

नाशिक : दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला असून, त्यावर शासनाकडून उपाययोजना केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची बाब चारा छावण्यांवरून स्पष्ट झाली आहे. नाशिक जिल्ह्णात जनावरांच्या चारा छावण्यांची मागणी ग्रामीण भागातून होत असली तरी, छावणी सुरू करण्यास कोणीही पुढे येत नसल्याने जिल्हा प्रशासन अडचणीत सापडले असून, त्यातूनच बाजार समित्या, खासगी संस्थांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देकोणी पुढे येईना :। तुटपुंजे अनुदान, चाऱ्याची कमतरता

नाशिक : दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला असून, त्यावर शासनाकडून उपाययोजना केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची बाब चारा छावण्यांवरून स्पष्ट झाली आहे. नाशिक जिल्ह्णात जनावरांच्या चारा छावण्यांची मागणी ग्रामीण भागातून होत असली तरी, छावणी सुरू करण्यास कोणीही पुढे येत नसल्याने जिल्हा प्रशासन अडचणीत सापडले असून, त्यातूनच बाजार समित्या, खासगी संस्थांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे.शासनाने शेतकरी मागेल त्याठिकाणी जनावरांसाठी चार छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी लहान जनावरांसाठी ४५ रुपये व मोठ्या जनावरांसाठी ९० रुपये अनुदान जाहीर केले आहे. एका शेतकºयाचा फक्त पाच जनावरांना छावणीत प्रवेश देण्यात यावा, तसेच छावणी चालकानेच चारा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर शासनाकडे दहा लाख रुपये अनामत रक्कम भरणे सक्तीचे केले आहे. छावण्यांमधील यापूर्वी चारा घोटाळ्याचा अनुभव लक्षात घेता वेळोवेळी छावणीची विविध यंत्रणांमार्फत तपासणी केली जाणार आहे. बाजार समित्या, सहकारी संस्था, सामाजिक संस्था, व्यक्तिगत व्यक्तीलाही छावणी सुरू करण्याची मुभा आहे, परंतु त्यासाठी उपरोक्त यंत्रणांचा अनुभवही लक्षात घेण्याची अट टाकण्यात आली आहे़संपूर्ण एप्रिल महिन्यात चारा छावणीसाठी चालकाची प्रतीक्षा करण्यात आली, परंतु कोणी पुढे आले नाही. अखेर जिल्हा प्रशासनानेच प्रत्येक बाजार समित्यांना तसेच खरेदी-विक्री संघांना संपर्क साधून त्यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी गळ घालण्यास सुरुवात केली आहे.काही बाजार समित्यांनी त्यासाठी होकारही कळविला असला तरी, तसा प्रस्ताव मात्र सादर केलेला नाही. संस्थांच्या मते एका जनावराच्या मागे दिवसाकाठी मिळणारे ९० रुपयांचे अनुदान कमी असून, ग्रामीण भागात छावणीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी व कोठून करणार, असा प्रश्न आहे. शिवाय नाशिक जिल्ह्णात तसेच लगतच्या कोणत्याही जिल्ह्णात चारा शिल्लक नाही, त्याची पर जिल्हा-राज्यांतून वाहतूक करणे खर्चिक बाब आहे. छावण्यांची वाढती मागणीनाशिक जिल्ह्णातील नांदगाव, बागलाण, सिन्नर, येवला, मालेगाव आदी तालुक्यांमधून जनावरांसाठी चारा वा चारा छावण्यांची मागणी केली जात असून, जनावरांच्या चाºयाची कमतरता दिवसागणिक वाढत चालली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही चारा छावणी सुरू करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे.